शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

एमआरईजीएस अंतर्गत सव्वा हेक्टर क्षेत्र लागवडीखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:32 IST

रत्नागिरी : कोरोनामुळे अनेक मुंबईकर गावाकडे आले असून, काहीजण शेतीकडे वळले आहेत. त्यामुळे पडीक क्षेत्रही लागवडीखाली आले आहे. ...

रत्नागिरी : कोरोनामुळे अनेक मुंबईकर गावाकडे आले असून, काहीजण शेतीकडे वळले आहेत. त्यामुळे पडीक क्षेत्रही लागवडीखाली आले आहे. सलग दुसऱ्या वर्षी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (एमआरईजीएस) फळबाग लागवडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात एक हजार २२९.१६ हेक्टरवर आंबा, काजूची लागवड करण्यात आली आहे.

रत्नागिरी फलोत्पादन जिल्हा म्हणून घोषित झालेला आहे. त्यानुसार स्थानिक फळझाडांच्या लागवडीला चालना दिली जात आहे. दहा वर्षांपूवी विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. एमआरईजीएसमधून दहा हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा, काजूच्या लागवडीसाठी विशेष प्रयत्न करण्यात आले, त्यामध्ये यशही मिळाले आहे. गेल्या दहा वर्षांत १५ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे.

गतवर्षी कोरोनामुळे व्यवहार कोलमडले होते. त्यामुळे अनेक मुंबईकर गावाकडे परतले होते. घरी बसून काम नसल्यामुळे पडीक जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. काहींनी भातशेती केली तर अनेकांनी फळ लागवडीला प्राधान्य दिले. डोंगर, माळरानावर आंबा, काजू लागवडीला प्रारंभ केला.

गतवर्षी जिल्हा कृषी अधीक्षक विभागाकडून दोन हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली होती. त्यात काजू लागवडीचे प्रमाण अधिक होते. यावर्षी फळ लागवडीकडे लोकांचा कल असून, आतापर्यंत एक हजार २२९ हेक्टरवर लागवड झाली आहे. अद्याप भात लागवडीची कामे सुरू असल्यामुळे फळझाड लागवड काहींनी सुरू केलेली नसली तरी भातशेती लागवडीनंतर रोपांची लागवड मात्र केली जाणार आहे. त्यामुळे सप्टेंबर अखेरपर्यंत यावर्षी लागवडीखालील क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनीही एमआरईजीएस अंतर्गत येणाऱ्या कामांवर लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन केले आहे. तालुकास्तरावर होत असलेल्या बैठकांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधत लागवडीचे आवाहन करण्यात येत आहे.

-----------------------

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (एमआरईजीएस) गावातल्या गावात रोजगार मिळवून देण्यासाठी फळबाग लागवडीचे आवाहन करण्यात आले आहे. फळबाग लागवडीच्या कामांना चालना देण्यासाठी तालुकानिहाय सूचना करण्यात आल्या आहेत. जॉबकार्डही काढून घेण्याचे काम सुरू आहे. पंचायत समिती स्तरावर तर सातत्याने आढावा घेण्यात येत आहे.

- उर्मिला चिखले, प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक, रत्नागिरी

---------------------

तालुकानिहाय लागवड केलेले क्षेत्र पुढीलप्रमाणे :

तालुका लागवडीखालील क्षेत्र

मंडणगड १२३.२०, दापोली २०१.३०, खेड ३४४.४५, चिपळूण ८२.३०, गुहागर १३३.३८, संगमेश्वर ५८.७०, रत्नागिरी १०८.९६, लांजा ९८.८७, राजापूर ७८.००.