शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

एमआरईजीएस अंतर्गत सव्वा हेक्टर क्षेत्र लागवडीखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:32 IST

रत्नागिरी : कोरोनामुळे अनेक मुंबईकर गावाकडे आले असून, काहीजण शेतीकडे वळले आहेत. त्यामुळे पडीक क्षेत्रही लागवडीखाली आले आहे. ...

रत्नागिरी : कोरोनामुळे अनेक मुंबईकर गावाकडे आले असून, काहीजण शेतीकडे वळले आहेत. त्यामुळे पडीक क्षेत्रही लागवडीखाली आले आहे. सलग दुसऱ्या वर्षी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (एमआरईजीएस) फळबाग लागवडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात एक हजार २२९.१६ हेक्टरवर आंबा, काजूची लागवड करण्यात आली आहे.

रत्नागिरी फलोत्पादन जिल्हा म्हणून घोषित झालेला आहे. त्यानुसार स्थानिक फळझाडांच्या लागवडीला चालना दिली जात आहे. दहा वर्षांपूवी विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. एमआरईजीएसमधून दहा हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा, काजूच्या लागवडीसाठी विशेष प्रयत्न करण्यात आले, त्यामध्ये यशही मिळाले आहे. गेल्या दहा वर्षांत १५ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे.

गतवर्षी कोरोनामुळे व्यवहार कोलमडले होते. त्यामुळे अनेक मुंबईकर गावाकडे परतले होते. घरी बसून काम नसल्यामुळे पडीक जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. काहींनी भातशेती केली तर अनेकांनी फळ लागवडीला प्राधान्य दिले. डोंगर, माळरानावर आंबा, काजू लागवडीला प्रारंभ केला.

गतवर्षी जिल्हा कृषी अधीक्षक विभागाकडून दोन हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली होती. त्यात काजू लागवडीचे प्रमाण अधिक होते. यावर्षी फळ लागवडीकडे लोकांचा कल असून, आतापर्यंत एक हजार २२९ हेक्टरवर लागवड झाली आहे. अद्याप भात लागवडीची कामे सुरू असल्यामुळे फळझाड लागवड काहींनी सुरू केलेली नसली तरी भातशेती लागवडीनंतर रोपांची लागवड मात्र केली जाणार आहे. त्यामुळे सप्टेंबर अखेरपर्यंत यावर्षी लागवडीखालील क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनीही एमआरईजीएस अंतर्गत येणाऱ्या कामांवर लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन केले आहे. तालुकास्तरावर होत असलेल्या बैठकांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधत लागवडीचे आवाहन करण्यात येत आहे.

-----------------------

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (एमआरईजीएस) गावातल्या गावात रोजगार मिळवून देण्यासाठी फळबाग लागवडीचे आवाहन करण्यात आले आहे. फळबाग लागवडीच्या कामांना चालना देण्यासाठी तालुकानिहाय सूचना करण्यात आल्या आहेत. जॉबकार्डही काढून घेण्याचे काम सुरू आहे. पंचायत समिती स्तरावर तर सातत्याने आढावा घेण्यात येत आहे.

- उर्मिला चिखले, प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक, रत्नागिरी

---------------------

तालुकानिहाय लागवड केलेले क्षेत्र पुढीलप्रमाणे :

तालुका लागवडीखालील क्षेत्र

मंडणगड १२३.२०, दापोली २०१.३०, खेड ३४४.४५, चिपळूण ८२.३०, गुहागर १३३.३८, संगमेश्वर ५८.७०, रत्नागिरी १०८.९६, लांजा ९८.८७, राजापूर ७८.००.