शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

रत्नागिरीकरांना लवकरच शुद्ध पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:30 IST

रत्नागिरी : शहरवासीयांना आता बारमाही स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी पावणेदोन कोटी रुपये खर्च करून साळवी स्टॉप येथील जलशुद्धिकरण ...

रत्नागिरी : शहरवासीयांना आता बारमाही स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी पावणेदोन कोटी रुपये खर्च करून साळवी स्टॉप येथील जलशुद्धिकरण केंद्राची दुरूस्ती सुरू आहे. नगरपरिषदेतर्फेे लवकरच शंभर टक्के शुद्ध पाणीपुरवठा केला जाणार आहे. पाणी तपासण्यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे.

शहरातील साळवी स्टॉप येथे असलेल्या नगरपरिषदेच्या जलशुध्दिकरण केंद्रात दिवसाला १५ एमएलडी पाणी शुद्ध करण्याची क्षमता आहे. मात्र, गेल्या २५ वर्षांत जलशुध्दिकरण केंद्राची दुरूस्ती न झाल्याने जलशुध्दिकरणाचा दर्जा खालावला आहे. शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने नगराध्यक्ष प्रदीप साळवी, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे आणि पाणी अभियंता अविनाश भोईर यांच्या संयुक्त बैठकीत जलशुध्दिकरण केंद्र दुरूस्तीचा निर्णय घेण्यात आला. एरिएशन फाऊंटन दुरूस्ती, वॉटर चॅनल, फ्लॅश मिक्सर, फिल्टर बेल्ट, बॅकवॉश युनिट, व्हॉल्व्ह, क्लोरिन युनिटची यांत्रिक व विद्युत दुरूस्ती यामुळे हे जलशुद्धिकरण केंद्र नगर परिषदेचे अत्याधुनिक फिल्टर हाऊस बनणार आहे. सध्या दिवसाला ११ एमएलडी पाणी शुद्ध करून पुरवठा केला जात आहे. मात्र, नवीन विद्युत पंप बसविल्यामुळे क्षमता १५ ते ते १८ एमएलडी इतकी होणार आहे.

शुद्धिकरण प्रक्रिया

शीळ जॅकवेलमधून पाणी एरिएशन फाैंटनमध्ये येते ते पाणी वॉटर फ्लॅश मिक्सरमध्ये सोडल्यावर पाण्यातील कार्बंनडाय ऑक्साईड व इतर गॅस निघून जाण्यास मदत होते. मात्र, ऑक्सिजन मिसळेल, याची काळजी घेण्यात येते. वॉटर फ्लॅश मिक्सरमध्ये काही घटक पाण्यात मिसळले जातात नंतर पाणी मोठ्या टाकीत सोडण्यात येते. पाण्यातील गढूळपणा निघून जाऊन स्वच्छ पाणी वॉटर चॅनलद्वारे फिल्टर बेल्टमध्ये येते, या बेल्टला चार थर असतात. त्यामध्ये फिल्टर होऊन साठवणूक टाकीत शंभर टक्के शुद्ध पाणी येते. पाण्यात क्लोरिन मिसळल्याने पाणी पिण्यासाठी सुरक्षित होते.

...........................

फिल्टर हाऊसच्या दुरूस्तीसाठी एक कोटी ७५ लाखांचा निधी देण्यात आला असून संपूर्ण जलशुध्दिकरण केंद्राची दुरूस्ती करण्यात आली आहे. येत्या दोन आठवड्यात जलशुध्दिकरण केंद्रातून शहरवासीयांना शुद्ध पाणी पाणीपुरवठा केला जाणार आहे. पावसाळ्यात गढूळ पाणीही फिल्टर झाल्यानंतर शंभर टक्के शुद्ध स्वरुपात लोकांपर्यंत जाईल.

- प्रदीप साळवी, नगराध्यक्ष, रत्नागिरी