शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीकरांना लवकरच शुद्ध पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:30 IST

रत्नागिरी : शहरवासीयांना आता बारमाही स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी पावणेदोन कोटी रुपये खर्च करून साळवी स्टॉप येथील जलशुद्धिकरण ...

रत्नागिरी : शहरवासीयांना आता बारमाही स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी पावणेदोन कोटी रुपये खर्च करून साळवी स्टॉप येथील जलशुद्धिकरण केंद्राची दुरूस्ती सुरू आहे. नगरपरिषदेतर्फेे लवकरच शंभर टक्के शुद्ध पाणीपुरवठा केला जाणार आहे. पाणी तपासण्यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे.

शहरातील साळवी स्टॉप येथे असलेल्या नगरपरिषदेच्या जलशुध्दिकरण केंद्रात दिवसाला १५ एमएलडी पाणी शुद्ध करण्याची क्षमता आहे. मात्र, गेल्या २५ वर्षांत जलशुध्दिकरण केंद्राची दुरूस्ती न झाल्याने जलशुध्दिकरणाचा दर्जा खालावला आहे. शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने नगराध्यक्ष प्रदीप साळवी, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे आणि पाणी अभियंता अविनाश भोईर यांच्या संयुक्त बैठकीत जलशुध्दिकरण केंद्र दुरूस्तीचा निर्णय घेण्यात आला. एरिएशन फाऊंटन दुरूस्ती, वॉटर चॅनल, फ्लॅश मिक्सर, फिल्टर बेल्ट, बॅकवॉश युनिट, व्हॉल्व्ह, क्लोरिन युनिटची यांत्रिक व विद्युत दुरूस्ती यामुळे हे जलशुद्धिकरण केंद्र नगर परिषदेचे अत्याधुनिक फिल्टर हाऊस बनणार आहे. सध्या दिवसाला ११ एमएलडी पाणी शुद्ध करून पुरवठा केला जात आहे. मात्र, नवीन विद्युत पंप बसविल्यामुळे क्षमता १५ ते ते १८ एमएलडी इतकी होणार आहे.

शुद्धिकरण प्रक्रिया

शीळ जॅकवेलमधून पाणी एरिएशन फाैंटनमध्ये येते ते पाणी वॉटर फ्लॅश मिक्सरमध्ये सोडल्यावर पाण्यातील कार्बंनडाय ऑक्साईड व इतर गॅस निघून जाण्यास मदत होते. मात्र, ऑक्सिजन मिसळेल, याची काळजी घेण्यात येते. वॉटर फ्लॅश मिक्सरमध्ये काही घटक पाण्यात मिसळले जातात नंतर पाणी मोठ्या टाकीत सोडण्यात येते. पाण्यातील गढूळपणा निघून जाऊन स्वच्छ पाणी वॉटर चॅनलद्वारे फिल्टर बेल्टमध्ये येते, या बेल्टला चार थर असतात. त्यामध्ये फिल्टर होऊन साठवणूक टाकीत शंभर टक्के शुद्ध पाणी येते. पाण्यात क्लोरिन मिसळल्याने पाणी पिण्यासाठी सुरक्षित होते.

...........................

फिल्टर हाऊसच्या दुरूस्तीसाठी एक कोटी ७५ लाखांचा निधी देण्यात आला असून संपूर्ण जलशुध्दिकरण केंद्राची दुरूस्ती करण्यात आली आहे. येत्या दोन आठवड्यात जलशुध्दिकरण केंद्रातून शहरवासीयांना शुद्ध पाणी पाणीपुरवठा केला जाणार आहे. पावसाळ्यात गढूळ पाणीही फिल्टर झाल्यानंतर शंभर टक्के शुद्ध स्वरुपात लोकांपर्यंत जाईल.

- प्रदीप साळवी, नगराध्यक्ष, रत्नागिरी