शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

प्रकल्पाबाबत जनसुनावणीची मागणी

By admin | Updated: December 23, 2014 23:41 IST

जामदा धरण : धर्मराज्य शेतकरी संघटनेने दिले निवेदन...

रत्नागिरी : जामदा पाटबंधारे प्रकल्पामध्ये प्रकल्पग्रस्तांची फसवणूक करण्यात आली असून, याप्रकरणी पुन्हा जनसुनावणी घ्यावी, अशी मागणी धर्मराज्य शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात पुनर्वसन आराखड्यासह पुनर्वसन, भूसंपादन तसेच विहिरी, घरांची मोजणीही अयोग्य असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.जामदा पाटबंधारे प्रकल्प राबवताना बुडीत क्षेत्रातील काजिर्डा आणि राणेवाडी गावातील ग्रामस्थांना विश्वासात घेण्यात आले नाही. या ठिकाणी वर्षाचे ३६५ दिवस मुबलक पाणी असताना तेथे धरणाची गरजच नसल्याचे धर्मराज्य शेतकरी संघटनेचे मत आहे.भूसंपादन करताना कलम ४ ते ११नुसार सर्व कलमांची कार्यवाही करणे गरजेचे होते. मात्र, आजवर करण्यात आलेल्या घरे, विहिरी, शेतजमिनी व वनजमिनी यांची मोजणीही व्यवस्थित झालेली नाही. काजिर्डा राणेवाडीतील झाडांचीही योग्य मोजणी झाली नाही. रस्ते, घरे, शाळा व इतर सुविधांसाठी घ्यावयाचे एकूण भूखंड क्षेत्र निश्चित करण्यात आलेले नाही, असा आरोप या शेतकरी संघटनेने केला आहे.हा प्रकल्प मुद्दामहून रेगाळत ठेवण्यात आला आहे. त्यामुळे प्रकल्पावरील खर्च दहापटीपेक्षा अधिक वाढला आहे. या एकूणच प्रकल्पामध्ये अतोनात पैसा ठेकेदाराच्या घशात घालण्यात आल्याचा आरोपही संघटनेने दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.प्रकल्पग्रस्तांना देयक क्षेत्र जमीन, पर्यायासाठी लागणारी शेतजमीन योग्य पद्धतीने देण्यात आली नसल्याचा आरोपही संघटनेच्या निवेदनात करण्यात आला आहे. ग्रामस्थांनी याबाबत वेळोवेळी हरकतीही घेतल्या आहेत. मात्र, त्याची दखल प्रशासनाने घेतलेली नाही. असा आरोप संघटनेने केला असून, हा प्रकल्प रद्द करावा तसेच काजिर्डा - राणेवाडी येथील ग्रामस्थांची जनसुनावणी घेण्याबाबत येत्या १५ दिवसांत बैठक बोलवावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे. (प्रतिनिधी)