शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

प्रकल्पाबाबत जनसुनावणीची मागणी

By admin | Updated: December 23, 2014 23:41 IST

जामदा धरण : धर्मराज्य शेतकरी संघटनेने दिले निवेदन...

रत्नागिरी : जामदा पाटबंधारे प्रकल्पामध्ये प्रकल्पग्रस्तांची फसवणूक करण्यात आली असून, याप्रकरणी पुन्हा जनसुनावणी घ्यावी, अशी मागणी धर्मराज्य शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात पुनर्वसन आराखड्यासह पुनर्वसन, भूसंपादन तसेच विहिरी, घरांची मोजणीही अयोग्य असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.जामदा पाटबंधारे प्रकल्प राबवताना बुडीत क्षेत्रातील काजिर्डा आणि राणेवाडी गावातील ग्रामस्थांना विश्वासात घेण्यात आले नाही. या ठिकाणी वर्षाचे ३६५ दिवस मुबलक पाणी असताना तेथे धरणाची गरजच नसल्याचे धर्मराज्य शेतकरी संघटनेचे मत आहे.भूसंपादन करताना कलम ४ ते ११नुसार सर्व कलमांची कार्यवाही करणे गरजेचे होते. मात्र, आजवर करण्यात आलेल्या घरे, विहिरी, शेतजमिनी व वनजमिनी यांची मोजणीही व्यवस्थित झालेली नाही. काजिर्डा राणेवाडीतील झाडांचीही योग्य मोजणी झाली नाही. रस्ते, घरे, शाळा व इतर सुविधांसाठी घ्यावयाचे एकूण भूखंड क्षेत्र निश्चित करण्यात आलेले नाही, असा आरोप या शेतकरी संघटनेने केला आहे.हा प्रकल्प मुद्दामहून रेगाळत ठेवण्यात आला आहे. त्यामुळे प्रकल्पावरील खर्च दहापटीपेक्षा अधिक वाढला आहे. या एकूणच प्रकल्पामध्ये अतोनात पैसा ठेकेदाराच्या घशात घालण्यात आल्याचा आरोपही संघटनेने दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.प्रकल्पग्रस्तांना देयक क्षेत्र जमीन, पर्यायासाठी लागणारी शेतजमीन योग्य पद्धतीने देण्यात आली नसल्याचा आरोपही संघटनेच्या निवेदनात करण्यात आला आहे. ग्रामस्थांनी याबाबत वेळोवेळी हरकतीही घेतल्या आहेत. मात्र, त्याची दखल प्रशासनाने घेतलेली नाही. असा आरोप संघटनेने केला असून, हा प्रकल्प रद्द करावा तसेच काजिर्डा - राणेवाडी येथील ग्रामस्थांची जनसुनावणी घेण्याबाबत येत्या १५ दिवसांत बैठक बोलवावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे. (प्रतिनिधी)