शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्प समर्थकांची शिवसेनेकडून गळचेपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:21 IST

या प्रकल्पाची जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द झाल्यानंतर या भागातून प्रकल्पविरोधी भावना भडकविण्यात अग्रेसर असणाऱ्या स्वयंसेवी संघटनांनी काढता पाय घेतला. ...

या प्रकल्पाची जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द झाल्यानंतर या भागातून प्रकल्पविरोधी भावना भडकविण्यात अग्रेसर असणाऱ्या स्वयंसेवी संघटनांनी काढता पाय घेतला. प्रकल्प समर्थकांनी या संघटनांवर प्रश्नचिन्हे उभी करण्यास सुरुवात केल्याने अणुऊर्जा प्रकल्पापासून बस्तान मांडून बसलेले काही स्वयंघोषित समाजासुधारक कार्यकर्ते स्थानिकांची ढाल करुन प्रकल्पविरोधाचे विष पेरतच राहिले. नाणार येथे उभा राहणाऱ्या या रिफायनरी प्रकल्पाची जमीन अधिग्रहण अधिसूचना रद्द झाल्यानंतर येथील स्थानिक शेतकऱ्यांनी आम्हाला प्रकल्प हवा, आम्ही रिफायनरी समर्थक म्हणत २० जुलै २०१९ रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर रिफायनरी समर्थन मोर्चा काढला व आपल्या मागण्या मांडल्या.

एखाद्या प्रकल्पाच्या समर्थनासाठी निघालेला व प्रकल्पाची मागणी करणारा हा कोकणातील पहिलाच मोर्चा होता. मात्र, या मोर्चाच्या निमित्ताने नाणारमधील स्थानिक शेतकऱ्यांनी केलेली मागणी शासनापर्यंत आजपर्यंत पोहोचू शकलेली नाही किंबहुना सत्ताधाऱ्यांनी विशेषत: शिवसेनेने ती स्वत:पर्यंत पोहोचू दिली नाही, यासारखे कोकणवासीयांचे दुसरे दुर्दैव नाही, असेच म्हणावे लागेल. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या या समर्थन मोर्चानंतर खऱ्या अर्थाने प्रकल्प समर्थनाच्या आंदोलनांना सुरुवात झाली. पण प्रकल्प विरोधासाठी खोलात पाय फसलेल्या शिवसेनेने या समर्थकांची सतत दलाल म्हणून हेटाळणी केली. नाणार होणार नाही, असे म्हणत अक्षरशः गळचेपी केली. प्रकल्प समर्थकांवर सातत्याने अन्याय करण्याचे काम करण्यात आले, त्यांच्या प्रकल्पाच्या मागणीकडे शिवसेनेने व इतर राजकीय पक्षांनी फक्त राजकीय स्वार्थापोटी दुर्लक्ष केले.

या प्रकल्पाला कधीही विरोध न केलेल्या भाजपने हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असतानाही या प्रकल्प समर्थकांच्या मागणीकडे बहुतांश दुर्लक्षच केले. प्रकल्पाची मागणी करणारे दलाल असल्याचा आरोप शिवसेना नेत्यांनी करायला सुरुवात केल्यावर अखेर प्रकल्प समर्थक शेतकऱ्यांनी प्रकल्प परिसरात डोंगर तिठा येथे ०२ मार्च २०२० रोजी समर्थन सभा घेऊन आपण स्थानिक शेतकरीच असल्याचे दाखवून दिले व याचठिकाणी या नाणार परिसरातील सुमारे एक हजार पाचशे कुटुंबांनी आठ हजार पाचशे एकर जमिनीची संमत्तीपत्रे मीडियासमोर आणली. याचवेळी या परिसरातील शिवसेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधी व शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या प्रकल्पविरोधी भूमिकेविरोधात उघडपणे आपले मत व्यक्त केले. मात्र, त्यानंतर या शिवसेनेच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची हकालपट्टी करुन प्रकल्प समर्थकांची गळचेपी कायम सुरु ठेवली.

शिवसेनेने नाणार येथे प्रस्तावित असणाऱ्या प्रकल्पाविरोधातली आपली भूमिका कायम ठेवली व आजच्या घडीला इतर राजकीय पक्ष प्रकल्पाच्या समर्थनार्थ उभे राहत असताना व प्रकल्पाचे समर्थन वाढत असतानाही केवळ आपल्या हट्टापायी शिवसेनेने या प्रकल्पाचे घोंगडे अद्यापही भिजत ठेवले आहे. त्यामुळे ज्या कोकणी जनतेने शिवसेनेला आजपर्यंत भरभरून दिले ती शिवसेना कोकणवासीयांचे विकासाचे स्वप्न सत्यात उतरवणार की धुळीस मिळवणार, हे येणारा काळच ठरवणार आहे. पण एक मात्र नक्की की आजपर्यंत येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करणारी राजापूरची जनता आता रोजगारासाठी व विकासासाठी प्रकल्पाची मागणी करत आहे. त्यामुळे होय !... राजापूर (कोकण) बदलतयं ! असेच म्हणावे लागेल.