शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
2
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
3
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
4
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
5
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
6
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
7
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
8
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
9
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
10
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
11
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
12
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
13
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
14
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
15
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
16
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
17
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
18
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
19
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
20
पत्नीच्या हत्येचा आरोपी NSG कमांडो, 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली बचाव करत होता, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?

योजनांची प्रगती असमाधानकारक

By admin | Updated: December 2, 2014 00:30 IST

अपेक्षा वाढल्या : पतपुरवठा घेणाऱ्यांची संख्या कमी

श्रीकांत चाळके - खेड -राज्यातील अन्नधान्याची हेक्टरी उत्पादनक्षमता खालावली आहे. त्यासाठी उपाययोजना करूनही उत्पादनक्षमतेत वाढ होत नाही. शेतकऱ्यांचे कृषीविषयक ज्ञान वाढले पाहिजे. मात्र अनेक योजना असूनही त्यांची प्रगती, वाटचाल आणि अंमलबजावणी असमाधारकारकच राहिली आहे.कृषीविषयक सर्व योजनांची अंमलबजावणी थेट शेतकरी गटांमार्फतच करण्याचे आघाडी शासनाने ठरविले होते़ मात्र, गेल्या दोन वर्षात तसे प्रयत्न झाले नाहीत. येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्जपुवठा करताना हेच अधिकारी विविध प्रकारची अवघड कागदपत्र आणण्याचे संकट लादत असल्याने शेतकऱ्यांना आधुनिक शेतीपासून परावृत्त करण्याचे काम केले जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारचा आदेश असूनही अनेक बँका आजही शेतकऱ्यांना पतपुरवठा करीत नाहीत़ रत्नागिरी जिल्हा फलोद्यान जिल्हा म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर राज्य सरकारचे याकडे विविध प्रकारे दुर्लक्ष झाल्याने आंबा बागायतदार संकटात सापडले आहेत़ सरकारने याकडे डोळेझाक करू नये, असे मत व्यक्त करण्यात येत आहे. कोकणातील नाचणी पिकाच्या शेतीलाही आता मोठ्या प्रमाणात उतरती कळा लागली आहे़ खेडमध्ये काहीशी हीच अवस्था आहे. मात्र, गेल्या वर्र्षभरात तिळाची शेती काहीअंशी बहरली आहे. नाचणीची जागा तिळाच्या शेतीने घेतल्याने यावर्षी हे उत्पादन अधिक प्रमाणात होणार आहे़ या शेतीकरिता आवश्यक असे पोषक वातावरण आणि तंत्रज्ञान याविषयी खेड तालुक्यातील शेतकरी अनभिज्ञ असल्याने या पिकाविषयी साशंकता आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ नजीक असूनही तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याबाबत येथील तज्ज्ञांची विविध मते असल्याचे जाणवते़ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळपास १० तालुक्यात तिळाची शेती केली जात आहे. कोकणात भात, नाचणीबरोबरच आता तिळाची शेती दिसू लागली आहे. तिळाला बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते़ मात्र, याकरिता राज्य सरकारने या पिकाला संरक्षण देत कर्जपुरवठा करण्याचे आदेश दिले पाहिजेत. दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुमारे ८३ एकरवर तिळाची लागवड केली आहे. कृषीविषयक आणि त्यावर आधारित शेतीचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आणि विद्यापीठ नजीक असतानाही खेड तालुक्यातील शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचत नसल्याची ओरड कायम आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहायाने प्रशिक्षण देणारी स्वायत्त संस्था दापोलीत आहे़ त्याचा पुरेसा लाभ खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतीबाबतीत तालुका मागास राहीला आहे. याबाबत शासनाने गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी होत आहे. बाजारपेठ आवश्यक शेतीमालाला बाजारपेठ आवश्यक.विद्यापीठाचे तंत्र बांधावर कधी जाणार.तीळाच्या शेतीला वाव.कोकणात फलोद्यानाला अधिक वाव. शासनाचे कृषी तंत्रज्ञान बांधापर्यंत पोहोचवण्याची गरज.