शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

प्राध्यापक करताहेत गणिताचा अभ्यास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:21 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क सागर पाटील / टेंभ्ये : कोविड-१९ चा प्रादुर्भाव विद्यार्थ्यांमध्ये होऊ नये यासाठी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

सागर पाटील / टेंभ्ये : कोविड-१९ चा प्रादुर्भाव विद्यार्थ्यांमध्ये होऊ नये यासाठी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा शासन स्तरावरून रद्द करण्यात आली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेची मूल्यमापन पद्धत नुकतीच जाहीर केली आहे. सध्या राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये बारावीचे मूल्यमापन सुरू आहे. हे मूल्यमापन तंत्र प्राध्यापकांसाठी डोकेदुखी ठरत असून सरासरी, शेकडा गुण आणि टक्केवारी या गणितातील अवघड संकल्पनांची पुन्हा एकदा प्राध्यापकांना उजळणी करावी लागत आहे.

उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी निश्चित करण्यात आलेल्या मूल्यमापन तंत्रामध्ये दहावी, अकरावी व बारावीमधील गुणांना भारांश देण्यात आला आहे. मूल्यमापन तंत्रामध्ये सरासरी, शेकडेवारी व टक्केवारी या गणितामधील कठीण संकल्पनांचा समावेश असल्याने प्राध्यापकांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.

----------------------

नियमित विद्यार्थ्यांसाठी दहावीच्या वर्गांमध्ये सर्वाधिक गुण मिळविलेल्या तीन विषयांतील गुणांच्या बेरजेला ३ ने भागून त्याची सरासरी १०० गुणांपैकी काढावयाची आहे. या सरासरीमध्ये प्राप्त झालेल्या गुणांना ३० टक्के भारांश दिला देण्यात आला आहे. त्याचे रूपांतर २४ पैकी गुणांमध्ये करावयाचे आहे. त्यानंतर अकरावीच्या वर्गामध्ये प्रत्येक विषयाला प्राप्त झालेल्या १०० पैकी गुणांना ३० टक्के भारांश देण्यात आला असून, त्याचे रूपांतर २४ पैकी गुणांमध्ये करावयाचे आहे. तसेच बारावीचे वर्षभरातील प्रथमसत्र, सराव परीक्षा, सराव चाचण्या अथवा तत्सम मूल्यमापनासाठी निर्धारित केलेल्या एकूण गुणांपैकी प्राप्त गुणांना ४० टक्के भारांश देण्यात आला असून त्याचे रूपांतर ३२ पैकी गुणांमध्ये करावयाचे आहे. अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक, प्रकल्प व अंतर्गत मूल्यमापनासाठी २० गुण निश्चित करण्यात आले आहेत. या पद्धतीने नियमित विद्यार्थ्यांसाठी १०० गुण निश्चित करण्यात आले आहेत.

------------------------------

पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापन तंत्रात बदल करण्यात आला आहे. दहावीच्या वर्गांमध्ये सर्वाधिक गुण मिळविलेल्या तीन विषयांतील गुणांच्या बेरजेला ३ ने भागून त्याची सरासरी १०० गुणांपैकी काढावयाची आहे. या सरासरीमध्ये प्राप्त झालेल्या गुणांना ५० टक्के भारांश देण्यात आला आहे. तसेच अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षेसाठी २० गुणांची तरतूद करण्यात आली आहे. शाखानिहाय या गुणांमध्ये बदल होत असल्याचे पाहायला मिळते. यापूर्वीच्या बारावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विषयाच्या लेखी परीक्षेतील गुणांचा तपशील मंडळाला स्वतंत्रपणे कळवायचा आहे. उर्वरित ३० गुण उत्तीर्ण झालेल्या विषयाच्या लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे मंडळाकडून देण्यात येणार आहे. खासगी विद्यार्थी, तुरळक विषय घेऊन बसणारे विद्यार्थी व एम.सी.व्ही.सी.च्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र मूल्यमापन तंत्र तयार करण्यात आले आहे.