शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
4
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
5
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
6
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
7
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
8
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
10
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
11
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
12
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
13
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
14
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
15
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
16
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
17
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
18
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
19
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
20
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश

केंद्रप्रमुखांच्या समस्या, प्रश्न तातडीने साेडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:22 IST

रत्नागिरी : केंद्र प्रमुखांच्या १५ प्रलंबित समस्यान, प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख ...

रत्नागिरी : केंद्र प्रमुखांच्या १५ प्रलंबित समस्यान, प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ, रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत करण्यात आली. यावेळी केंद्रप्रमुखांच्या या विविध मागण्यांवर जोरदार चर्चा झाली.

ऑनलाईन घेण्यात आलेल्या या सभेचे उद्घाटन राज्य संघाचे कार्याध्यक्ष जयंतराव डुबे यांनी केले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्याध्यक्ष अशोकराव महाले होते.

यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील ७८ केंद्र प्रमुख उपस्भित होते. त्यामध्ये प्रामुख्याने सर्व तालुकाध्यक्ष महेंद्र वळवी, सुनील कारखेळे, शेषराज गर्जे, श्रीकांत वेल्हाळ, राहुल मोहिते, संतोष करंबळेकर, सीताराम कोरगावकर, राज्य महिला प्रमुख सुनीता देखणे, सुप्रिया मोहिते, शैजेला आखाडे, सायली शिंदे, माधवी काटवटे, मयूरी जोशी, स्वाती साखरकर, स्मिता मांजरेकर, नेहा कांबळे, सुप्रिया कदम उपस्थित होते.

जिल्हा सचिव सुनील जाधव यांनी जिल्हा संघटनेचा आढावा सादर केला. जिल्हाध्यक्ष बाबाजी शिर्के यांनी संघटनेच्या माध्यमातून प्रलंबित प्रश्न प्रास्ताविकेत सादर केले. रत्नागिरी जिल्ह्यात केंद्र प्रमुखांच्या रिक्त पदांची भरती तत्काळ करण्याबाबत आक्रमक भूमिका मांडली तर केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी देय एक वेतनवाढ न दिल्यास संघटनात्मक धरणे आंदोलन करण्याबाबत निर्णय घ्यावा लागेल, अशीही भूमिका शिर्के यांनी मांडली.

जिल्हा शिक्षक समितीवर केंद्रप्रमुख केडरचा प्रतिनिधी घेणेबाबत आग्रह धरून राज्य संघटनेने यासाठी मार्गदर्शन व सहकार्य करावी, अशी अपेक्षा शिर्के यांनी व्यक्त केली. ‘डायट’मार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांबाबत जिल्हाध्यक्ष शिर्के यांनी माहिती दिली. ऑनलाईन व तत्काळ माहिती मागितली जाते याबाबत जिल्हा प्रशासनाजवळ चर्चा केली जाईल, असेही शिर्के यांनी सांगितले.

राज्याध्यक्ष अशोकराव महाले यांनी एकूण केंद्रप्रमुख यांच्या १५ प्रलंबित समस्या, प्रश्न यांच्यावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करून वेळ पडल्यास आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला.

कोविड कालावधी संपल्यानंतर राज्यस्तरीय संघटनेचा मेळावा रत्नागिरी येथे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. त्याचे नियोजन लवकरच करण्यात येईल, असे अभिवचन जिल्ह्यातर्फे जिल्हाध्यक्ष बाबाजी शिर्के यांनी दिले.