शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
2
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
3
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
4
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
5
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
6
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
7
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
8
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
9
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
10
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
11
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
12
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
13
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
14
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
15
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
16
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
17
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
18
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
19
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
20
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”

केंद्रप्रमुखांच्या समस्या, प्रश्न तातडीने साेडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:22 IST

रत्नागिरी : केंद्र प्रमुखांच्या १५ प्रलंबित समस्यान, प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख ...

रत्नागिरी : केंद्र प्रमुखांच्या १५ प्रलंबित समस्यान, प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ, रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत करण्यात आली. यावेळी केंद्रप्रमुखांच्या या विविध मागण्यांवर जोरदार चर्चा झाली.

ऑनलाईन घेण्यात आलेल्या या सभेचे उद्घाटन राज्य संघाचे कार्याध्यक्ष जयंतराव डुबे यांनी केले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्याध्यक्ष अशोकराव महाले होते.

यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील ७८ केंद्र प्रमुख उपस्भित होते. त्यामध्ये प्रामुख्याने सर्व तालुकाध्यक्ष महेंद्र वळवी, सुनील कारखेळे, शेषराज गर्जे, श्रीकांत वेल्हाळ, राहुल मोहिते, संतोष करंबळेकर, सीताराम कोरगावकर, राज्य महिला प्रमुख सुनीता देखणे, सुप्रिया मोहिते, शैजेला आखाडे, सायली शिंदे, माधवी काटवटे, मयूरी जोशी, स्वाती साखरकर, स्मिता मांजरेकर, नेहा कांबळे, सुप्रिया कदम उपस्थित होते.

जिल्हा सचिव सुनील जाधव यांनी जिल्हा संघटनेचा आढावा सादर केला. जिल्हाध्यक्ष बाबाजी शिर्के यांनी संघटनेच्या माध्यमातून प्रलंबित प्रश्न प्रास्ताविकेत सादर केले. रत्नागिरी जिल्ह्यात केंद्र प्रमुखांच्या रिक्त पदांची भरती तत्काळ करण्याबाबत आक्रमक भूमिका मांडली तर केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी देय एक वेतनवाढ न दिल्यास संघटनात्मक धरणे आंदोलन करण्याबाबत निर्णय घ्यावा लागेल, अशीही भूमिका शिर्के यांनी मांडली.

जिल्हा शिक्षक समितीवर केंद्रप्रमुख केडरचा प्रतिनिधी घेणेबाबत आग्रह धरून राज्य संघटनेने यासाठी मार्गदर्शन व सहकार्य करावी, अशी अपेक्षा शिर्के यांनी व्यक्त केली. ‘डायट’मार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांबाबत जिल्हाध्यक्ष शिर्के यांनी माहिती दिली. ऑनलाईन व तत्काळ माहिती मागितली जाते याबाबत जिल्हा प्रशासनाजवळ चर्चा केली जाईल, असेही शिर्के यांनी सांगितले.

राज्याध्यक्ष अशोकराव महाले यांनी एकूण केंद्रप्रमुख यांच्या १५ प्रलंबित समस्या, प्रश्न यांच्यावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करून वेळ पडल्यास आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला.

कोविड कालावधी संपल्यानंतर राज्यस्तरीय संघटनेचा मेळावा रत्नागिरी येथे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. त्याचे नियोजन लवकरच करण्यात येईल, असे अभिवचन जिल्ह्यातर्फे जिल्हाध्यक्ष बाबाजी शिर्के यांनी दिले.