शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

चिपळुणातील २५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:29 IST

रत्नागिरी : अतिवृष्टी व पुरामुळे चिपळूण शहर व परिसरातील वीजपुरवठा बंद पडला होता. गेले दोन दिवस पावसाने ...

रत्नागिरी : अतिवृष्टी व पुरामुळे चिपळूण शहर व परिसरातील वीजपुरवठा बंद पडला होता. गेले दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने पूरही ओसरला असून, जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. महावितरणची यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येत आहे. पुरामुळे ५० हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा ठप्प होता, मात्र २५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा रविवारी सुरू करण्यात आला आहे.

पुरामुळे ओढवलेल्या परिस्थितीत वीजपुरवठा सुरू करणे अतिशय धोकादायक होते. दोन दिवसात पुराचे पाणी ओसरत चालल्यावर विद्युत यंत्रणेची हानी झाल्याचे निदर्शनास येत आहे. पुरामुळे पन्नास हजार वीजजोडण्या बंद पडल्या होत्या. चिपळूण विभागातील २२४ उच्चदाब आणि १६६ लघुदाबाचे खांब बाधित झाल्याने १९ फीडर बंद पडले आहेत.

कोकण परिमंडळाचे मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा वीज यंत्रणा सुरळीत करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. सर्वप्रथम आठ कोरोना रुग्णालयांचा वीजपुरवठा तसेच मुख्य पाणी यंत्रणेचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी गती प्राप्त झाली असून, रविवारी रात्री उशिरापर्यंत दोन उपकेंद्रे सुरू करण्याचा मानस मुख्य अभियंता सायनेकर यांनी व्यक्त केला. संपूर्ण परिस्थितीवर सातत्याने मुख्य कार्यालय मुंबई येथून विशेष लक्ष पुरविण्यात येत असून, कामात कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार असल्याचे आश्वासन सहमुख्य प्रादेशिक संचालक प्रसाद रेशमे यांनी दिले आहे.