शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

गडनदी धरणातील वीजनिर्मितीचे काम लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:30 IST

- उंची ७२.७० मीटर - प्रकल्पीय एकूण सिंचन क्षमता ३१११ हेक्टर - पीकक्षेत्र ४२९६ हेक्टर - २०१३ /१४ साली ...

- उंची ७२.७० मीटर

- प्रकल्पीय एकूण सिंचन क्षमता ३१११ हेक्टर

- पीकक्षेत्र ४२९६ हेक्टर

- २०१३ /१४ साली ५ हेक्टर सिंचन

- सन २०१४/१५ २ हेक्टर सिंचन

- सन २०१५/१६ साली २ हेक्टर सिंचन

लाेकमत न्यूज नेटवर्क

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरणाच्या बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे काम वेगाने हाती घेण्यात आले आहे. गडनदी धरणावर १.६० मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. अद्याप या कामाला सुरुवात नसली तरी प्रकल्पाची रचना करताना वीजनिर्मिती प्रकल्प करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मात्र, संध्या बंदिस्त नलिकेचे काम सुरू असल्याने वीजनिर्मितीचे काम लांबणीवर पडले आहे.

गडनदी धरणाला २० ऑगस्ट १९८३ रोजी मूळ प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. यावेळी प्रकल्पाची किंमत १०.३७ कोटी एवढी होती. त्यानंतर प्रकल्प खर्चात वाढ होत गेली आणि २५ फेब्रुवारी २००० रोजी १२२.८० कोटी रुपये किमतीला प्रथम प्रशासकीय मान्यता देण्यात आली. ५ सप्टेंबर २००९ रोजी द्वितीय प्रशासकीय मान्यता देत प्रकल्पाची किंमत ४१९.८१ कोटींवर गेली. २७ सप्टेंबर २०११ रोजी ६५१.४२ कोटींच्या रकमेला तृतीय प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यानंतर ९२५.७६ कोटींना चतुर्थ सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

गडनदी धरणाच्या दोन्ही बाजूने कालवे काढण्यात आले आहेत. डावा कालवा २७ किलाेमीटरपर्यंत मातीकाम करण्यात आले आहे. मात्र बंदिस्त पाइपलाइनमुळे या कालव्याच्या लांबीत फरक पडला आहे. पाईपलाइनमुळे या कालव्याची लांबी २२.०७ किलाेमीटर राहणार आहे. उजवा कालवा ४७ किलाेमीटर एवढा आहे. मात्र, आता कालव्यांची कामे बंदिस्त पाइपलाइनच्या माध्यमातून करण्यात येत आहेत त्यामुळे या कालव्याच्या लांबीत फरक पडल्याची माहिती कालवे उपविभागाचे उपविभागीय अभियंता दीपक जोशी यांनी दिली आहे.

..................................

उजव्या कालव्या अंतर्गत २५०० हेक्टर पीकक्षेत्र आहे तर १७८६ आयसीए उजवा कालवा चिपळूण तालुक्यातील कुटरे, येगाव, नांदगाव खु., नांदगाव बु., कुशिवडे, असुर्डे, कोकरे, नायशी, वडेरु, खेरशेत, तर संगमेश्वर तालुक्यातील कुटगिरी, कळंबुशी, कासे, आसवे आदी गावांमधून जातो तर डावा कालवा आरवली, कोंडीवरे, बुरंबाड, सरंद, मुरडव, कुंभारखाणी, कुचांबे आदी गावांमधून जातो यापैकी बहुतांश कामे हे अपूर्ण अवस्थेत आहेत.

............................

गडनदी धरण प्रकल्प कालव्यासंदर्भात स्थानिकांच्या मनात संभ्रम आहेत. बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे काम करत असताना जो चर खणला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीतून जात असलेल्या पाइपलाइनला शेतकऱ्यांचा विरोध नाही मात्र शेतीच्या नुकसानाबद्दल कोणी बोलायला तयार नाही.

- संतोष येडगे, सामाजिक कार्यकर्ते