शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

गडनदी धरणातील वीजनिर्मितीचे काम लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:30 IST

- उंची ७२.७० मीटर - प्रकल्पीय एकूण सिंचन क्षमता ३१११ हेक्टर - पीकक्षेत्र ४२९६ हेक्टर - २०१३ /१४ साली ...

- उंची ७२.७० मीटर

- प्रकल्पीय एकूण सिंचन क्षमता ३१११ हेक्टर

- पीकक्षेत्र ४२९६ हेक्टर

- २०१३ /१४ साली ५ हेक्टर सिंचन

- सन २०१४/१५ २ हेक्टर सिंचन

- सन २०१५/१६ साली २ हेक्टर सिंचन

लाेकमत न्यूज नेटवर्क

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरणाच्या बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे काम वेगाने हाती घेण्यात आले आहे. गडनदी धरणावर १.६० मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. अद्याप या कामाला सुरुवात नसली तरी प्रकल्पाची रचना करताना वीजनिर्मिती प्रकल्प करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मात्र, संध्या बंदिस्त नलिकेचे काम सुरू असल्याने वीजनिर्मितीचे काम लांबणीवर पडले आहे.

गडनदी धरणाला २० ऑगस्ट १९८३ रोजी मूळ प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. यावेळी प्रकल्पाची किंमत १०.३७ कोटी एवढी होती. त्यानंतर प्रकल्प खर्चात वाढ होत गेली आणि २५ फेब्रुवारी २००० रोजी १२२.८० कोटी रुपये किमतीला प्रथम प्रशासकीय मान्यता देण्यात आली. ५ सप्टेंबर २००९ रोजी द्वितीय प्रशासकीय मान्यता देत प्रकल्पाची किंमत ४१९.८१ कोटींवर गेली. २७ सप्टेंबर २०११ रोजी ६५१.४२ कोटींच्या रकमेला तृतीय प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यानंतर ९२५.७६ कोटींना चतुर्थ सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

गडनदी धरणाच्या दोन्ही बाजूने कालवे काढण्यात आले आहेत. डावा कालवा २७ किलाेमीटरपर्यंत मातीकाम करण्यात आले आहे. मात्र बंदिस्त पाइपलाइनमुळे या कालव्याच्या लांबीत फरक पडला आहे. पाईपलाइनमुळे या कालव्याची लांबी २२.०७ किलाेमीटर राहणार आहे. उजवा कालवा ४७ किलाेमीटर एवढा आहे. मात्र, आता कालव्यांची कामे बंदिस्त पाइपलाइनच्या माध्यमातून करण्यात येत आहेत त्यामुळे या कालव्याच्या लांबीत फरक पडल्याची माहिती कालवे उपविभागाचे उपविभागीय अभियंता दीपक जोशी यांनी दिली आहे.

..................................

उजव्या कालव्या अंतर्गत २५०० हेक्टर पीकक्षेत्र आहे तर १७८६ आयसीए उजवा कालवा चिपळूण तालुक्यातील कुटरे, येगाव, नांदगाव खु., नांदगाव बु., कुशिवडे, असुर्डे, कोकरे, नायशी, वडेरु, खेरशेत, तर संगमेश्वर तालुक्यातील कुटगिरी, कळंबुशी, कासे, आसवे आदी गावांमधून जातो तर डावा कालवा आरवली, कोंडीवरे, बुरंबाड, सरंद, मुरडव, कुंभारखाणी, कुचांबे आदी गावांमधून जातो यापैकी बहुतांश कामे हे अपूर्ण अवस्थेत आहेत.

............................

गडनदी धरण प्रकल्प कालव्यासंदर्भात स्थानिकांच्या मनात संभ्रम आहेत. बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे काम करत असताना जो चर खणला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीतून जात असलेल्या पाइपलाइनला शेतकऱ्यांचा विरोध नाही मात्र शेतीच्या नुकसानाबद्दल कोणी बोलायला तयार नाही.

- संतोष येडगे, सामाजिक कार्यकर्ते