शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

गडनदी धरणातील वीजनिर्मितीचे काम लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:30 IST

- उंची ७२.७० मीटर - प्रकल्पीय एकूण सिंचन क्षमता ३१११ हेक्टर - पीकक्षेत्र ४२९६ हेक्टर - २०१३ /१४ साली ...

- उंची ७२.७० मीटर

- प्रकल्पीय एकूण सिंचन क्षमता ३१११ हेक्टर

- पीकक्षेत्र ४२९६ हेक्टर

- २०१३ /१४ साली ५ हेक्टर सिंचन

- सन २०१४/१५ २ हेक्टर सिंचन

- सन २०१५/१६ साली २ हेक्टर सिंचन

लाेकमत न्यूज नेटवर्क

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरणाच्या बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे काम वेगाने हाती घेण्यात आले आहे. गडनदी धरणावर १.६० मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. अद्याप या कामाला सुरुवात नसली तरी प्रकल्पाची रचना करताना वीजनिर्मिती प्रकल्प करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मात्र, संध्या बंदिस्त नलिकेचे काम सुरू असल्याने वीजनिर्मितीचे काम लांबणीवर पडले आहे.

गडनदी धरणाला २० ऑगस्ट १९८३ रोजी मूळ प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. यावेळी प्रकल्पाची किंमत १०.३७ कोटी एवढी होती. त्यानंतर प्रकल्प खर्चात वाढ होत गेली आणि २५ फेब्रुवारी २००० रोजी १२२.८० कोटी रुपये किमतीला प्रथम प्रशासकीय मान्यता देण्यात आली. ५ सप्टेंबर २००९ रोजी द्वितीय प्रशासकीय मान्यता देत प्रकल्पाची किंमत ४१९.८१ कोटींवर गेली. २७ सप्टेंबर २०११ रोजी ६५१.४२ कोटींच्या रकमेला तृतीय प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यानंतर ९२५.७६ कोटींना चतुर्थ सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

गडनदी धरणाच्या दोन्ही बाजूने कालवे काढण्यात आले आहेत. डावा कालवा २७ किलाेमीटरपर्यंत मातीकाम करण्यात आले आहे. मात्र बंदिस्त पाइपलाइनमुळे या कालव्याच्या लांबीत फरक पडला आहे. पाईपलाइनमुळे या कालव्याची लांबी २२.०७ किलाेमीटर राहणार आहे. उजवा कालवा ४७ किलाेमीटर एवढा आहे. मात्र, आता कालव्यांची कामे बंदिस्त पाइपलाइनच्या माध्यमातून करण्यात येत आहेत त्यामुळे या कालव्याच्या लांबीत फरक पडल्याची माहिती कालवे उपविभागाचे उपविभागीय अभियंता दीपक जोशी यांनी दिली आहे.

..................................

उजव्या कालव्या अंतर्गत २५०० हेक्टर पीकक्षेत्र आहे तर १७८६ आयसीए उजवा कालवा चिपळूण तालुक्यातील कुटरे, येगाव, नांदगाव खु., नांदगाव बु., कुशिवडे, असुर्डे, कोकरे, नायशी, वडेरु, खेरशेत, तर संगमेश्वर तालुक्यातील कुटगिरी, कळंबुशी, कासे, आसवे आदी गावांमधून जातो तर डावा कालवा आरवली, कोंडीवरे, बुरंबाड, सरंद, मुरडव, कुंभारखाणी, कुचांबे आदी गावांमधून जातो यापैकी बहुतांश कामे हे अपूर्ण अवस्थेत आहेत.

............................

गडनदी धरण प्रकल्प कालव्यासंदर्भात स्थानिकांच्या मनात संभ्रम आहेत. बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे काम करत असताना जो चर खणला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीतून जात असलेल्या पाइपलाइनला शेतकऱ्यांचा विरोध नाही मात्र शेतीच्या नुकसानाबद्दल कोणी बोलायला तयार नाही.

- संतोष येडगे, सामाजिक कार्यकर्ते