शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
6
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
7
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
8
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
9
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
10
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
11
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
12
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
13
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
14
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
15
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
16
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
17
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
18
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
19
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
20
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!

जनतेची गैरसोय कायमची संपण्याची शक्यता

By admin | Updated: January 15, 2015 23:35 IST

दापोलीत दोन पूल : गैरसोय संपणार, १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर

आंजर्ले : दापोली शहरातील केळसकर नाक्याच्या अलिकडे दापोली - हर्णै रस्त्यावरच्या दोन अरूंद व जीर्ण झालेल्या पुलांमुळे होणारी गैरसोय आता लवकरच थांबणार आहे. दोन नवीन रूंद पूल उभारण्यासाठी १ कोटी २० लाखाचा निधी मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली आहे. दापोली शहराचा विस्तार झपाट्याने वाढत चालला आहे. शहराच्या सीमा विस्तारत चालल्या आहेत. दापोली शहर जालगाव, गिम्हवणे, मौजे दापोली, टाळसुरे या लगतच्या गावांना कधीच जोडले गेले आहे. शहराचा होणारा विस्तार व वाढती वाहन संख्या लक्षात घेऊन शहरातील मुख्य दापोली बसस्थानक ते मेहंदळे आश्रम व खोंडा ते हॉटेल जयंत-पद्मजा या रस्त्याचे रूंदीकरण पूर्ण झालेले आहे. मात्र, बसस्थानक ते मेहंदळे आश्रम या दापोली-हर्णै रस्त्यावरच्या झालेल्या रूंदीकरणात एक समस्या निर्माण झाली होती. निधीअभावी केळसकर नाक्याजवळ जोग नदीवरील दोन जुने पूल तसेच ठेवण्यात आले होते. ९ मीटरपेक्षा जास्त रूंद रस्ता व मध्येच ५ मीटरपेक्षा कमी रूंदीचे दोन पूल यामुळे मूळ रूंदीकरणाचाच हेतू अपूर्ण राहिला होता. या अरूंंद पुलांमुळे रूंदीकरण करूनही काहीच फायदा होत नव्हता. उलट अशा पुलांमुळे किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढले होते. त्यातच हे दोन्ही अरूंद पूल जीर्ण झाले होते. आता या दोन पुलांमुळे होणारी गैरसोय लवकरच थांबणार आहे. या दोन पुलांसाठी प्रत्येकी ६० लाख रूपये असा १ कोटी २० लाखाचा निधी उपलब्ध झाला आहे. या कामाची निविदा प्रसिध्द होऊन याचा ठेका एका प्रतिष्ठीत कॉन्टॅ्रक्टरला देऊन प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली आहे. हे दोन पूल नव्याने बांधले नाहीत, तर रस्ता रूंदीकरण करूनही काहीच फायदा होणार नाही. उलट अपघातांचे प्रमाण वाढेल, असे मुद्दे माजी पालकमंत्री भास्कर जाधव दापोली नगरपंचायत निवडणूक होण्याआधी दापोलीत आले असता मांडले गेले. त्यावेळी भास्कर जाधव यांनी या कामाकडे लक्ष देईन व निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करेन, असे आश्वासन दिले होते. त्यांनी पाळले आहे. याबाबत करण्यात आलेला पाठपुरावा सार्वजनिक बांधकाम विभाग, दापोलीचे उपअभियंता सुब्बुराज यांनी तातडीने दिलेली कागदपत्र व तांत्रिक बाजूंची पूर्तता यामुळे ही समस्या आता मार्गी लागली आहे.दोन पूल नव्याने होणार असल्याने रस्ता रूंदीकरणानंतर विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे आता या दोन्ही पुलांच्या उभारणीसाठी निधीची तरतूद झाल्याने परिसरातील बहुतांश लोकांची गैरसोय दूर होणार आहे. यापूर्वी अरूंद पुलामुळे रूंदीकरण होऊनही त्याचा फायदा वाहनाना होत नव्हता व गैरसोय होत होती. मात्र, आता ही गैरसोय दूर होणार आहे.केळसकर नाक्याजवळ जोग नदीवरील दोन जुने पूल तसेच ठेवण्यात आले होते. हे दोन पूल तसेच राहिल्याने मूळ रूंदीकरणाचा हेतू अपूर्ण राहिला होता आता तो पूर्ण झाला आहे. (वार्ताहर)