शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

माेडकाआगर पुलाच्या राजकारणातून तालुकावासीयांच्या माथी त्रासच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:41 IST

गुहागर / संकेत गोयथळे : गुहागर तालुका हा राजकारणाबरोबरच इतर क्षेत्रातही शांत व संयमी तालुका म्हणून ओळखला जातो. मोडकाआगर ...

गुहागर / संकेत गोयथळे : गुहागर तालुका हा राजकारणाबरोबरच इतर क्षेत्रातही शांत व संयमी तालुका म्हणून ओळखला जातो. मोडकाआगर पूल व त्यातून घडलेले राजकारण यातून तालुकावासीयांचा संयम पुन्हा एकदा दिसून आला. गेली तीन वर्षे या पुलाच्या राजकारणातून तालुकावासीयांना मोठा त्रास सोसावा लागला, ही वस्तुस्थिती आहे. जनता व राजकारणी यामध्ये ‘कौन जीता कौन हारा’ हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहे.

तालुक्यात १९७२ साली मोडकाआगर पूल बांधण्यात आला. पंधरा वर्षांपूर्वी या पुलाची दुरुस्ती करण्यात आली असून, या पुलाला तब्बल ४८ वर्षे झाली आहेत. तीन वर्षांपूर्वी हा पूल धोकादायक असल्याचे समाेर आल्यानंतर प्रशासनाने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला. त्यानंतर वाहनचालकांना तब्बल बारा किलोमीटर अधिकचा प्रवास रानवी - पालपेणेमार्गे शृंगारतळी असा करावा लागला. वाहनचालकांनी यातूनच जवळचे मार्गही शोधले. सुरुवातीच्या काळात बंद केलेल्या पुलाच्या बाजूला भराव करून काही महिने वाहतूक सुरू होती. त्यानंतर सुमारे वर्षभरानंतर गुहागर - विजापूर महामार्ग अंतर्गत प्रत्यक्ष पुलाचे काम सुरु झाल्यानंतर येथील वाहतूक पुन्हा बंद झाली. अशावेळी पहिल्यांदा धरणाशेजारील भागातून काही महिने रस्ता सुरू होता. याठिकाणी वाहने रुतण्याचे प्रकार वाढल्याने वरवेलीमार्गे जंगल पायवाटेतून रस्ता सुरू झाला. त्या रस्त्याने अनेकांचे अपघात झाल्याने वरवेली ग्रामस्थांनी स्वखर्चाने जेसीबीच्या सहाय्याने रस्ता मोठा केला.

तब्बल दोन वर्षानंतर अखेर प्रत्यक्ष पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली. पूल वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर तत्कालिन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन वरवेली रस्त्यासाठी २० लाखांचा निधी मंजूर केला. त्यानंतर माजी आमदार विनय नातू यांनी या पुलाच्या कामासाठी आपण वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करत असल्याचे अनेकदा जाहीर केले. त्यातूनच खऱ्या अर्थाने श्रेयवादाच्या लढाईतून राजकारण सुरू झाले. त्याचवेळी आमदार भास्कर जाधव यांनी सुरुवातीलाच या पुलाचे काम सुरू असताना वाहतूक सुरळीत होऊ शकते, इतर पक्षाचे नेते यामध्ये लक्ष घालत आहेत मग मी कशाला लक्ष घालू, असे अनेकवेळा सूचक विधान केले. अनेक महिने वाहनचालकांनी आर्थिक व मानसिक त्रास सहन केल्यानंतर अखेर पुलाच्या बाजूला भराव टाकून रस्ता सुरू झाला. याला भास्कर जाधव समर्थकांनी ‘भास्कर सेतू’ असे नाव देत हे काम फक्त आमदार करू शकतात इतर कोणाला जमणार नाही, असाच इशारा दिला. पूल वाहतुकीसाठी बंद झाल्यानंतर या पुलाबाबत आपल्याकडे कोणीच व्यथा घेऊन एकदाही आले नाही, अशी कैफियत भास्कर जाधव यांनी अनेकदा मांडली व ही वस्तुस्थिती आहे.

---------------------

धाेकादायक पूल बनला सुरक्षित

तीन वर्षांपूर्वी मोडकाआगर पूल वाहतुकीसाठी बंद केला एवढेच नव्हे तर या पुलावरून चालण्यासही परवानगी नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या पुलावरून एवढे मोठे रामायण - महाभारत झाले त्याच पुलावरून नव्या पुलाचे बांधकाम होताना लागणारे रेती, स्टील असे अवजड टनावारी साहित्य तसेच नियमित वाहतूक आजही सुरू आहे. तीन वर्षांपूर्वी अचानकपणे धोकादायक झालेला पूल त्यानंतरच्या काळात सुरक्षित कसा झाला, हे न सुटणारे कोडे आहे.