शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

चक्रीवादळाबाबत पोलीस दलाकडून मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:30 IST

रत्नागिरी : अरबी समुद्रात तयार होत असलेले तोक्ते चक्रीवादळ १५ आणि १६ मेदरम्यान रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवरून पुढे सरकण्याची शक्यता ...

रत्नागिरी : अरबी समुद्रात तयार होत असलेले तोक्ते चक्रीवादळ १५ आणि १६ मेदरम्यान रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवरून पुढे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टी भागातील लोकांनी, मच्छीमारांनी सतर्क राहावे, अशी सूचना पोलीस खात्याकडूनही देण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी पोलीस खात्याने किनारी भागात गस्त सुरू ठेवली होती.

हवामान खात्याकडून अरबी समुद्रात ताेक्ते चक्रीवादळ हाेणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हे वादळ रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवरून पुढे सरकण्याचीही शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर किनारी भागातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबराेबर मच्छीमारांनाही सावधानतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी शुक्रवारी पाेलिसांनी समुद्रात गस्त घातली.

पाेलिसांनी किनारी भागात किंवा समुद्रात असणाऱ्या बोटींना किनाऱ्यालगत येऊन थांबण्याचा सूचना दिल्या. पोलिसांनी आपल्या स्पीड बोटीव्दारे समुद्रात जाऊन मच्छीमारांना सावधानतेच्या सूचना दिल्या. रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा, जयगड येथे ही मोहीम राबवण्यात आली. वादळादरम्यान ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत मच्छीमारांनी किनाऱ्यालगत राहावे, असे सांगण्यात आले. यावेळी गस्ती नौकेवर पोलीस निरीक्षक शैलेजा सावंत, पोलीस उपनिरीक्षक संदीप वांगणेकर, रमेश दळवी, पोलीस नाईक राहुल गायकवड, पोलीस काॅन्स्टेबल सचिन सुर्वे व कर्मचारी होते.