शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

पोलिसांनी समाजाभिमुख व्हाव

By admin | Updated: February 13, 2015 00:55 IST

कुलसचिव नारखेडे : कोकण कृषी विद्यापीठात सेवा प्रतिमा कार्यशाळा रंगलीे

दापोली : जनता व पोलीस यांच्यातील नाते वृध्दिंगत होऊन बदलत्या काळानुरुप पोलीस यंत्रणा समाजाभिमुख होणे काळाची गरज आहे, असे मत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृ षी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. नारखेडे यांनी व्यक्त केले.कोकण कृषी विद्यापीठात दापोली, गुहागर, मंडणगड या तीन तालुक्यांतील पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी ‘सेवा प्रतिमा एक गरज’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. सिद्धेश नातू, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास भोसले, दापोली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी यादव, नवनाथ जगताप, शुभांगी म्हस्के उपस्थित होते.जनतेच्या मनात पोलीस खात्याबद्दलचा जो गैरसमज आहे तो दूर व्हायला हवा. लोकांमध्ये खात्याची चांगली प्रतिमा निर्माण होण्यासाठी जनता व पोलीस यातील दरी कमी व्हायला हवी. संकटात माणूस देवाचा धावा करतो. देवाप्रमाणेच गुन्हा घडला की, संकटात त्यांना पोलीस स्टेशनचा रस्ताही दिसतो. त्यांच्या मनात देवाबद्दलची जी प्रतिमा आहे, त्यासारखीच प्रतिमा पोलिसांचीसुद्धा आहे. म्हणून पोलिसांचा धावा केला जातो. पोलिसांकडून न्याय मिळेल, असे वाटते. समाजाला चांगली सेवा दिल्यास जनतेमध्ये पोलिसांची प्रतिमा उंचावेल. समाज व पोलीस यांच्यातील नाते सुधारल्यास समाजावर येणाऱ्या प्रत्येक संकटाची माहिती पोलिसांना मिळते. पोलीस हा आपला शत्रू नसून मित्र असल्याची खात्री पटते. जनता व पोलीस यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण झाल्यास न्याय मागण्यांसाठी जनता पोलिसांकडे स्वत: येऊ लागतील. परंतु त्यासाठी चांगली सेवा मिळायला हवी. समाजात पोलिसांची प्रतिमा बदलायला हवी, असे ते म्हणाले.समाज बदलतोय, त्याप्रमाणे पोलीसही बदलतोय. पूर्वी पोलिसांची चुकीची इमेज जनतेत निर्माण केली होती. बदलत्या काळात पोलिसांची इमेज समाजाभिमुख होत असून, जनता व पोलीस यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण होत असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास भोसले म्हणाले. पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी आभार मानले. दोन दिवस चाललेल्या या कार्यशाळेत पोलिसांचे ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न केला गेला. जनता व पोलीस यांचे नाते सुधारण्यावर भर देण्याचे शिकविण्यात आले. या कार्यशाळेला पोलीस कर्मचारी, अधिकारी यांची मोठी उपस्थिती राहिली होती. (प्रतिनिधी)