शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

पोलीसच धावले पोलिसांचे संसार वाचविण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : संकटाच्या वेळी स्वत:चे घर पाण्यात असताना दुसऱ्यांच्या मदतीला धावलेले चिपळुणातील पोलीस आणि होमगार्डस्‌च्या मदतीला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : संकटाच्या वेळी स्वत:चे घर पाण्यात असताना दुसऱ्यांच्या मदतीला धावलेले चिपळुणातील पोलीस आणि होमगार्डस्‌च्या मदतीला अख्खे पोलीस दल धावून आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतलेल्या पुढाकारामुळे पूरबाधित पोलीस आणि होमगार्डस् अशा ३१ जणांना रोख रक्कम, तसेच वस्तूंचे वाटप करण्यात आले.

जुलै महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे आलेल्या महापुरात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. यामध्ये पोलीस दलातील २४ अमलदार व ७ होमगार्डस्‌ यांचा संसारही पाण्याखाली गेला. जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांनी पोलीस अधिकारी व अंमलदारांना मदतीसाठी आवाहन केले. त्यानंतर प्रत्येक पोलीस अधिकारी व अंमलदारांनी जशी जमेल तशी मदत पोलीस खात्याकडे सुपूर्द केली. या मदतीमध्ये जीवनावश्यक वस्तू व रोख रक्कम देण्यात आली आहे. ही सर्व मदत स्वातंत्र्यदिनी चिपळूण येथे जाऊन त्या अंमलदारांना व होमगार्डस्‌ना सुपूर्द करण्यात आली.

या सर्व वस्तू देताना जिल्हा पोलीस अधीक्षकही भावुक झाले होते. तुमचे दु:ख खूप मोठे आहे. त्यातून सावरायला वेळ लागेल; पण आता हळूहळू सावरायला हवे. काहीही मदत लागली तरीही आवर्जून सांगा, अशा शब्दांत डाॅ. गर्ग यांनी त्या अंमलदारांना व होमगार्डस्‌ना धीर दिला.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, चिपळूण उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, देवेंद्र पोळ, जाधव, पोलीस उपनिरीक्षक समद बेग व अमलदार उपस्थित होते.

........................

अश्रू अनावर झाले

ज्या अंमलदारांची घरे पाण्याखाली गेली होती, अशांना जिल्हा पोलीस दलामार्फत मदत देण्यात आली तेव्हा ही मदत घेणाऱ्या अंमलदारांना अश्रू अनावर झाले होते. आमचे दुःख स्वतःचे मानून अशी तत्पर मदत करणारे आमचे कुटुंबप्रमुख पोलीस अधीक्षक आतापर्यंत आम्ही पाहिले नव्हते, असे उद्गार त्यांच्या तोंडून निघाले.