शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

पंतप्रधान पीक विमा योजनेला २३ जुलैपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:23 IST

रत्नागिरी : पंतप्रधान पीक विमा योजनेची मुदत वाढवून मिळावी, या समविचारी मंचच्या मागणीला अखेर यश आले असून या योजनेला ...

रत्नागिरी : पंतप्रधान पीक विमा योजनेची मुदत वाढवून मिळावी, या समविचारी मंचच्या मागणीला अखेर यश आले असून या योजनेला २३ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

पंतप्रधान पीक विमा योजनेची मुदत १५ मेपर्यंत ग्राह्य धरल्याने त्याचा फटका तौक्ते वादळातील हानी झालेल्या कोकणातील आंबा व्यावसायिकांना बसला होता. नेमलेली मुदत वाढवावी अन्यथा आंदोलन करण्याची तयारी महाराष्ट्र समविचारी मंचचे प्रमुख बाबा ढोल्ये, राज्य सरचिटणीस संजय पुनसकर, रत्नागिरी तालुकाध्यक्ष अनिल नागवेकर, रघुनंदन भडेकर, नीलेश आखाडे मनोहर गुरव, आदींनी केली होती. कोरोना निर्बंध काळात आंदोलन थांबविण्यात आले असले तरी या सर्वांनी केंद्र शासनापर्यंत आपला पत्रव्यवहार सुरूच ठेवला होता. याबाबत खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांना निवेदन पाठविण्यात आले.

सहस्त्रबुद्धे यांनी याची दखल घेण्याची ग्वाही समविचारी मंचच्या पदाधिकाऱ्यांना दिली. त्याप्रमाणे संबंधित वरिष्ठ स्तरावर प्रयत्न झाल्याने सहस्त्रबुद्धे यांच्या प्रयत्नाने तसेच महाराष्ट्र समविचारी मंचच्या मागणीने पंतप्रधान पीक विमा योजनेला दि. २३ जुलैपर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबत तालुकाध्यक्ष अनिल नागवेकर यांनी जातीने लक्ष घालून प्रयत्न केले.