शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसन वसाहतीमधील भूखंड गैरकारभाराची लक्तरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:31 IST

राजापूर : येथील पूरग्रस्तांसाठी १९८४ साली सरकारने राबवलेल्या पुनर्वसन योजनेची चौकशी सुरू होताच गैरकारभाराची लक्तरेच बाहेर पडली आहेत. शासनाने ...

राजापूर : येथील पूरग्रस्तांसाठी १९८४ साली सरकारने राबवलेल्या पुनर्वसन योजनेची चौकशी सुरू होताच गैरकारभाराची लक्तरेच बाहेर पडली आहेत. शासनाने वितरित केलेल्या एकूण ३२४ भूखंडांपैकी अवघ्या ८२ भूखंडांवर मूळ पूरग्रस्त मालक वास्तव्यास असून, तब्बल ११० भूखंड हे मूळ मालकांनी अन्य व्यक्तीस भाड्याने दिलेले आहेत. त्याही पुढे जाऊन तब्बल १३२ भूखंड गेल्या ३६ वर्षांत बांधकामाविना पडून असल्याची माहिती पुढे आली आहे.

राजापूर शहरात दरवर्षी भरणाऱ्या पुराच्या पार्श्वभूमीवर शासनाने पुनर्वसन योजना राबवली. १९८३ मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार एकूण ४८५ बाधित पूरग्रस्तांच्या यादीत शहरातील २१४ मूळ जागा मालक तर तब्बल २७१ भाडेकरू होते. पुनर्वसन योजना राबवून तब्बल ३६ वर्षे उलटली तरी अजूनही प्रतीक्षा यादीवर असल्यांपैकी सात जणांनी उपोषणाचे हत्यार उपसल्यानंतर या गैरकारभाराला वाचा फुटली.

यापूर्वी अनेक वर्षे यासाठी विविध नागरिक आंदोलने करीतच होते. मात्र, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी या विषयावर गांभीर्याने लक्ष घातल्याने यंत्रणा जागी झाली. तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी पुनर्वसन योजनेतील रहिवाशांना विविध प्रकारच्या चौकशीसाठी नोटीस बजावली. राजापूरलगत कोदवली येथे राबवण्यात आलेल्या पुनर्वसन योजनेत ४८५ बाधित पूरग्रस्त होते. सुरुवातीला एकाचवेळी ३३० भूखंड पाडण्यात आले. त्यातील ३२४ भूखंडांचे वितरण करण्यात आले तर सहा भूखंड रिक्त होते. वितरित ३२४ भूखंडांपैकी ८२ ठिकाणी पूरग्रस्त स्वत: बांधकाम करून राहत असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. यामध्ये ७२ निवासी, तीन वाणिज्य तर सहा निवासी-वाणिज्य बांधकामांचा समावेश आहे.

मूळ मालकाने भाड्याने अन्य व्यक्तीस दिलेल्या ११० भूखंडांपैकी ९२ निवासी, १६ वाणिज्य व दोन निवासी-वाणिज्य बांधकामांचा समावेश आहे. ३६ वर्षे उलटूनही १३२ भूखंडांवर अद्याप बांधकामच करण्यात आलेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक पूरग्रस्त प्रतीक्षा यादीवर असताना ३६ वर्षे बांधकाम न केलेल्या भूखंडांकडे महसूल विभागाचे लक्षच गेलेले नाही.

जे मूळ मालक राहत आहेत, त्यांना पुरावे सादर करण्याच्या तर ज्यांनी ३६ वर्षांत बांधकाम केलेले नाही, अशा १३२ लाभार्थींना भूखंड परत घेण्याबाबत कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्या आहेत. शर्तभंग करणाऱ्या ५२ पूरग्रस्तांना एक हजार रुपये दंडाची नोटीस देण्यात आली आहे. भूखंड मिळूनही पूररेषेत राहणारे लाभार्थी तसेच आपला भूखंड भाड्याने देणारे लाभार्थी यांनाही नोटीस बजावण्यात आलेली आहे. ज्यांना अद्याप भूखंड मिळालेले नाहीत, त्यांना पुरावे सादर करण्याबाबत कळवण्यात आले आहे.