शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
3
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
4
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
5
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
7
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
8
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
9
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
10
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
12
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
13
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
14
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
15
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
16
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
17
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
18
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
19
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

वीज गेली... पुणे, मुंबई येथे संपर्क साधा

By admin | Updated: July 15, 2014 00:14 IST

नवा फतवा : उपनगराध्यक्ष शहा यांनी दिला आंदोलनाचा इशारा

चिपळूण : जीवनावश्यक वस्तूंसह आज ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत विजेची गरज भासू लागली आहे. हातावर पोट भरणाऱ्या व्यक्तीच्या घरातही आता वीज आली आहे. यापूर्वी वीज ग्राहकांची काही तक्रार असल्यास स्थानिक पातळीवर कार्यालयाशी संपर्क साधल्यास काही वेळातच तक्रारीचे निवारण केले जात होते. मात्र, आता वीज गेल्यास मुंबई, पुणे येथे संपर्क साधावा, या नव्या फतव्याने सर्वसामान्य ग्राहकांत नाराजीचा सूर उमटत आहे. महावितरण कंपनीच्या या कारभाराविरोधात सर्वपक्षीय आंदोलन छेडण्याचा इशारा उपनगराध्यक्ष लियाकत शाह यांनी आज (सोमवारी) पत्रकारांशी बोलताना दिला आहे.यापूर्वी एखाद्या ग्राहकाने चिपळूण येथे २५२८७४ या दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधल्यास त्याच्या तक्रारीचे निवारण काही तासातच केले जात असे. मात्र, सध्या आपल्या घरातील वीज गेल्यास १८००२३३३४३५ (मुंबई), १८००२००३४३५ (पुणे) येथे संपर्क साधण्याचा सल्ला ग्राहकांना दिला जात आहे. हे क्रमांक टोल फ्री असले तरी व्यस्त असल्याचे सांगितले जाते. या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर आपला ग्राहक क्रमांक व काय आहे, लाईट कशी गेली याचे कारणही नमूद करावे लागत आहे. त्यानंतर संबंधितांकडून जो ग्राहक त्या ठिकाणी राहात असेल त्याच्या जवळच्या कार्यालयात एसएमएसद्वारे तक्रार निवारण करण्याचा संदेश दिला जातो. मात्र, या प्रक्रियेला १२ तासांहून अधिक वेळ जात असून, ज्याच्या घरी फोन नाही, त्याने कोणाशी संपर्क साधायचा, असाही ग्राहकांमध्ये संभ्रम होत आहे, असे शाह यांनी सांगितले.महावितरण कंपनीची तक्रार निवारण्याबाबतची टोल फ्री क्रमांकाची सुविधाही फार अडचणीची असून, एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण राहणार? स्थानिक गाव पातळीवरच पूर्वीप्रमाणे ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण होणे आवश्यक आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सर्व पक्षीयांतर्फे निवेदन दिले जाणार आहे. योग्य प्रतिसाद मिळाला नाही तर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शाह यांनी दिला आहे. (वार्ताहर)