शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

आंबा घाटात रस्त्यावर मधाेमध खाेल खड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:21 IST

सागर पाटील/टेंभ्ये : कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा महत्त्वपूर्ण घाट म्हणून आंबा घाटाकडे पाहिले जाते. गेल्या ...

सागर पाटील/टेंभ्ये : कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा महत्त्वपूर्ण घाट म्हणून आंबा घाटाकडे पाहिले जाते. गेल्या काही वर्षांपासून या घाटामध्ये सातत्याने भूस्खलनाचे प्रकार हाेत आहेत. सध्या साखरप्यापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या बाजूलाच एक मोठा खड्डा तयार झाला आहे. या खड्डय़ाचे स्वरूप पाहता हा भूस्खलनाचा प्रकार असावा, अशी शक्यता प्रवाशांमधून व्यक्त केली जात आहे. हा खड्डा बरोबर वळणावर रस्त्याच्या बाजूला असल्याने जीवघेणा ठरू शकतो.

या घाटातून होणारी वाहतूक ही अन्य घाटमार्गांच्या तुलनेत अधिक आहे. परंतु, गेल्या काही वर्षांपासून या घाटात भूस्खलनाचे प्रकार घडत आहेत. सध्या साखरप्यापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर जवळपास एक ते सव्वा फूट व्यास असणारा व दाेन ते अडीच फूट खोलीचा एक खड्डा तयार झाला आहे. या खड्डय़ाचे स्वरूप पाहता हा भूस्खलनाचा प्रकार असण्याची शक्यता प्रवाशांनी व्यक्त केली आहे. सध्या अडीच ते तीन फूट व्यास असणारी जमीन खचली आहे. परंतु, या खड्ड्याशेजारची जमीन अजून खचणार आहे का, याबाबत बांधकाम खात्याने लक्ष देणे आवश्यक आहे. तसे झाले तर या महामार्गावर मोठा अनर्थ होऊ शकतो. सध्या निर्माण झालेला खड्डाही वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही वर्षांपूर्वी या घाटामधील कठडा कोसळल्याने अनेक दिवस घाटातील वाहतूक एकेरी करण्यात आली होती. सध्या या खड्ड्याच्या आजुबाजूची जमीन खचल्यास वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते.

--------------------------

रत्नागिरी - काेल्हापूर मार्गावरील आंबा घाटात रस्त्यावर माेठा खड्डा पडला असून, भूस्खलनाची शक्यता व्यक्त हाेत आहे. हा खड्डा धाेकादायक ठरत आहे. (छाया : सागर पाटील)