शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
5
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
6
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
7
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
8
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
9
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
10
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
11
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
12
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
13
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
14
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
15
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
16
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
17
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
18
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

आंबा घाटात रस्त्यावर मधाेमध खाेल खड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:21 IST

सागर पाटील/टेंभ्ये : कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा महत्त्वपूर्ण घाट म्हणून आंबा घाटाकडे पाहिले जाते. गेल्या ...

सागर पाटील/टेंभ्ये : कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा महत्त्वपूर्ण घाट म्हणून आंबा घाटाकडे पाहिले जाते. गेल्या काही वर्षांपासून या घाटामध्ये सातत्याने भूस्खलनाचे प्रकार हाेत आहेत. सध्या साखरप्यापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या बाजूलाच एक मोठा खड्डा तयार झाला आहे. या खड्डय़ाचे स्वरूप पाहता हा भूस्खलनाचा प्रकार असावा, अशी शक्यता प्रवाशांमधून व्यक्त केली जात आहे. हा खड्डा बरोबर वळणावर रस्त्याच्या बाजूला असल्याने जीवघेणा ठरू शकतो.

या घाटातून होणारी वाहतूक ही अन्य घाटमार्गांच्या तुलनेत अधिक आहे. परंतु, गेल्या काही वर्षांपासून या घाटात भूस्खलनाचे प्रकार घडत आहेत. सध्या साखरप्यापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर जवळपास एक ते सव्वा फूट व्यास असणारा व दाेन ते अडीच फूट खोलीचा एक खड्डा तयार झाला आहे. या खड्डय़ाचे स्वरूप पाहता हा भूस्खलनाचा प्रकार असण्याची शक्यता प्रवाशांनी व्यक्त केली आहे. सध्या अडीच ते तीन फूट व्यास असणारी जमीन खचली आहे. परंतु, या खड्ड्याशेजारची जमीन अजून खचणार आहे का, याबाबत बांधकाम खात्याने लक्ष देणे आवश्यक आहे. तसे झाले तर या महामार्गावर मोठा अनर्थ होऊ शकतो. सध्या निर्माण झालेला खड्डाही वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही वर्षांपूर्वी या घाटामधील कठडा कोसळल्याने अनेक दिवस घाटातील वाहतूक एकेरी करण्यात आली होती. सध्या या खड्ड्याच्या आजुबाजूची जमीन खचल्यास वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते.

--------------------------

रत्नागिरी - काेल्हापूर मार्गावरील आंबा घाटात रस्त्यावर माेठा खड्डा पडला असून, भूस्खलनाची शक्यता व्यक्त हाेत आहे. हा खड्डा धाेकादायक ठरत आहे. (छाया : सागर पाटील)