शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी ३६० प्रस्ताव प्रलंबित

By admin | Updated: April 22, 2016 01:03 IST

फलोत्पादन अभियान : अनुदानासाठी ९० लाखाची मागणी

रत्नागिरी : राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाकडे जिल्ह्यातील यांत्रिकीकरणासाठी ६ कोटी १० लाखांचा आराखडा पाठवण्यात आला होता. मात्र, २ कोटी ३० लाखांचाच निधी मंजूर करण्यात आला आहे. तूटपुंज्या निधीमुळे ७८० प्रस्तावांपैकी अद्याप ३६० प्रस्ताव प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांनी अवजारे खरेदी केली असून, त्यांच्या अनुदानासाठी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने ९० लाखांची मागणी केली आहे. सहा कोटी दहा लाखांच्या आराखड्यापैकी २ कोटी ३० लाखांचा आराखडा मंजूर करून डिसेंबरअखेर १ कोटी ८२ लाख खर्च करता येईल, असे राष्ट्रीय फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळातर्फे कळवण्यात आले आहे. मात्र, कृषी विभागाने २ कोटी ३० लाखांची यांत्रिक अवजारे घेण्यासाठी शेतकऱ्यांना पूर्वसंमत्ती दिली असल्याने अद्याप ३६० शेतकऱ्यांना अनुदान न मिळाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यांत्रिकीकरणासाठी शेतकऱ्यांना आॅनलाईन अर्ज पाठवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार ७८० शेतकऱ्यांनी प्रस्ताव पाठवले. कृषी विभागाने शेतकऱ्यांना अवजारे खरेदीसाठी पूर्वसंमत्ती दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज काढून अवजारे विकत घेतली. मंडळाच्या आडमुठ्या धोरणामुळे ४२० शेतकऱ्यांना अवजारांचे अनुदान त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. परंतु, ३६० शेतकरी अद्याप अनुदानापासून वंचित आहेत.यांत्रिकी अवजारांमध्ये पॉवर टिलर, रोटरी टिलर, २० अश्वशक्तीचे ट्रॅक्टर, पॉवर स्प्रेअर आदिंचा समावेश होता. मार्चअखेर शेतकऱ्यांना पैसे मिळतील, अशी आशा होती. मात्र, तीही फोल ठरली आहे. कृषी विभागाच्या आश्वासनामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अनुदानच उपलब्ध होत नसल्यामुळे मंडळाने पूर्व संमत्तीवरही बंदी आणली आहे. त्यामुळे उर्वरित ३६० शेतकऱ्यांना बहुधा नवीन आर्थिक वर्षात पुन्हा नव्याने अर्ज भरावे लागणार आहेत. (प्रतिनिधी)आर्थिक संकट : कर्ज काढून अवजारे खरेदीपावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांना ही अवजारे मिळणे गरजेचे आहे. कृषी विभागाच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी कर्ज काढून अवजारे घेतली आहेत. त्यामुळे आर्थिक संकट ओढवले आहे.नव्याने पुन्हा अर्ज?अनुदान नसल्याने मंडळाने पूर्वसंमत्तीवरही बंदी आणली आहे. त्यामुळे ३६० शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने अर्ज करावे लागण्याची शक्यता आहे.