शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुना कालव्याचा भाग गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:22 IST

पाचल : अवघ्या तीन महिन्यांपूर्वी पाचल - कोंडवाडी येथे अर्जुना कालव्याचे बांधकाम पहिल्याच पावसात वाहून गेले आहे. या कालव्याच्या ...

पाचल : अवघ्या तीन महिन्यांपूर्वी पाचल - कोंडवाडी येथे अर्जुना कालव्याचे बांधकाम पहिल्याच पावसात वाहून गेले आहे. या कालव्याच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी केला असून, याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमध्ये पाचल - कोंडवाडी येथील अर्जुना धरणाचा १ किलाेमीटर लांबीचा उजवा कालवा वाहून गेला आहे. कालव्यातील सिमेंट अस्तरीकरण वाहून गेले आहे. पावसाचा जोर आणखी वाढल्यास कालवा फुटून आजुबाजूच्या वस्तीला धोका निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी या कालव्याचे काम करण्यात आले होते. मात्र, पहिल्याच पावसात हा कालवा वाहून गेल्याने बाेगस काम समाेर आले आहे.

तळवडे ब्राह्मणदेव येथील कालव्याची संरक्षक भिंत कोसळली असून, येथील शेतकऱ्यांच्या घरात पाणी घुसले आहे. पहिल्याच पावसात या कालव्याची दुरवस्था व दुर्दशा झाल्याने या कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भविष्यात हे काम कसे काय टिकणार? व यावरील फुटब्रीजचे कामदेखील निकृष्ट दर्जाचे झाले आहे. जिल्ह्यातील हा सर्वात मोठा प्रकल्प असून, यावर शासनाचे करोडो रुपये खर्च झालेले आहेत. मात्र, या प्रकल्पाच्या कालव्याचे काम अतिशय संथगतीने सुरु आहे. त्यामुळे येथील शेतकरी आजही पाण्यापासून वंचित आहेत. आतापर्यंत या प्रकल्पाचा एकाही शेतकऱ्याला उपयोग झालेला नाही. त्यामुळे नेमका हा प्रकल्प कोणासाठी शेतकऱ्यांसाठी की ठेकेदार, अधिकारी यांना पोसण्यासाठी, असा प्रश्नही सौंदळकर यांनी उपस्थित केला आहे.