शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

अर्जुना कालव्याचा भाग गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:22 IST

पाचल : अवघ्या तीन महिन्यांपूर्वी पाचल - कोंडवाडी येथे अर्जुना कालव्याचे बांधकाम पहिल्याच पावसात वाहून गेले आहे. या कालव्याच्या ...

पाचल : अवघ्या तीन महिन्यांपूर्वी पाचल - कोंडवाडी येथे अर्जुना कालव्याचे बांधकाम पहिल्याच पावसात वाहून गेले आहे. या कालव्याच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी केला असून, याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमध्ये पाचल - कोंडवाडी येथील अर्जुना धरणाचा १ किलाेमीटर लांबीचा उजवा कालवा वाहून गेला आहे. कालव्यातील सिमेंट अस्तरीकरण वाहून गेले आहे. पावसाचा जोर आणखी वाढल्यास कालवा फुटून आजुबाजूच्या वस्तीला धोका निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी या कालव्याचे काम करण्यात आले होते. मात्र, पहिल्याच पावसात हा कालवा वाहून गेल्याने बाेगस काम समाेर आले आहे.

तळवडे ब्राह्मणदेव येथील कालव्याची संरक्षक भिंत कोसळली असून, येथील शेतकऱ्यांच्या घरात पाणी घुसले आहे. पहिल्याच पावसात या कालव्याची दुरवस्था व दुर्दशा झाल्याने या कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भविष्यात हे काम कसे काय टिकणार? व यावरील फुटब्रीजचे कामदेखील निकृष्ट दर्जाचे झाले आहे. जिल्ह्यातील हा सर्वात मोठा प्रकल्प असून, यावर शासनाचे करोडो रुपये खर्च झालेले आहेत. मात्र, या प्रकल्पाच्या कालव्याचे काम अतिशय संथगतीने सुरु आहे. त्यामुळे येथील शेतकरी आजही पाण्यापासून वंचित आहेत. आतापर्यंत या प्रकल्पाचा एकाही शेतकऱ्याला उपयोग झालेला नाही. त्यामुळे नेमका हा प्रकल्प कोणासाठी शेतकऱ्यांसाठी की ठेकेदार, अधिकारी यांना पोसण्यासाठी, असा प्रश्नही सौंदळकर यांनी उपस्थित केला आहे.