शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
3
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
4
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
5
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
6
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
7
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
8
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
9
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
10
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
11
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
12
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
13
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
14
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
15
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
16
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
17
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
18
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
19
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
20
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी

एसटीला पंढरीची ओढ, सलग दुसऱ्या वर्षी १२ लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:22 IST

मेहरून नाकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यात शेतीची कामे सुरू असल्याने आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोजकीच ...

मेहरून नाकाडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : जिल्ह्यात शेतीची कामे सुरू असल्याने आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोजकीच आहे. त्यामुळे या वारीला रत्नागिरी विभागातून जादा गाड्या सुटत नसल्या, तरी पुणे विभागाच्या मदतीसाठी दरवर्षी ५० गाड्या पाठविल्या जातात, परंतु कोरोनामुळे गतवर्षीप्रमाणे या वर्षीही वारी होणार नसल्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी गाड्या पाठविण्यात आलेल्या नाहीत. महामंडळाला जादा गाड्यांमुळे मिळणारे उत्पन्न मात्र थांबले आहे.

अन्य जिल्ह्यातून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या अधिक आहे. पुणे विभागाच्या मागणीनुसार दरवर्षी पन्नास गाड्या रत्नागिरी विभागातून पाठविल्या जातात. सलग आठवडाभर गाड्या पंढरपूर मार्गावर धावत असल्याने मिळणारे उत्पन्न महामंडळाच्या खात्यात जमा होते.

कार्तिकीला जादा गाड्या

कार्तिकी एकादशीला जिल्ह्यातून भाविक दरवर्षी पंढरपूरला जातात. त्यामुळे रत्नागिरी विभागातून १२५ ते १५० जादा गाड्या सोडण्यात येतात, शिवाय काही भाविक दिंडी किंवा वारी घेऊन पायी पंढरपूरला जातात. मात्र, येताना एसटीने गावी परततात. त्यामुळे कार्तिकी एकादशीला जादा गाड्यांच्या वाहतुकीमुळे उत्पन्न प्राप्त होते. मात्र, तेही थांबले आहे.

वारीअभावी उत्पन्नावर परिणाम

गेले दोन वर्षे कोरोनामुळे आषाढी एकादशीची वारी बंद असल्याने एसटीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. सलग आठवडाभर जादा गाड्यांमुळे १२ लाखांचे प्राप्त होणारे उत्पन्न थांबले आहे.

गतवर्षी दिवाळीत मंदिरे खुली करण्यात आली. मात्र, गर्दी टाळण्यासाठी यात्रेला बंदी होती. कार्तिकी एकादशीसाठी विभागातून सुटणाऱ्या जादा गाड्या गतवर्षी न गेल्याने उत्पन्नावर परिणाम झाला.

कोरोनामुळे गतवर्षी आषाढी एकादशीची वारी झाली नव्हती. या वर्षीही वारीसाठी परवानगी नाही. दरवर्षी न चुकता दर्शनासाठी पंढरपूरला जातो, परंतु सलग दोन वर्षे वारी नसल्याने दर्शनाची खंत तर आहे, शिवाय वारी काळातील वातावरण व अनुभूती याची प्रखर आठवण होते.

- श्यामल पाटील, रत्नागिरी

आषाढी एकादशीला जिल्ह्यातून जाणारे भाविक मोजकेच असल्याने जादा गाड्या साेडल्या जात नाहीत, परंतु कार्तिकी एकादशीला जादा गाड्या सोडतो.

आषाढीला पुणे विभागासाठी पाठविल्या जाणाऱ्या बसेस दोन वर्षे बंद असल्याने उत्पन्न घटले आहे.

- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक