शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

पाली परिसरात भातावर करपा रोग

By admin | Updated: October 12, 2014 23:31 IST

शेतकरी संकटात : खोडकिडीसह निळ्या भुंंगेऱ्याचे प्रमाण अधिक

रत्नागिरी : पाली परिसरात उशिरा झालेल्या भात लावणीमुळे अद्याप तयार न झालेल्या भातपिकावर खोडकिडींसह निळे भुंगेरे, करपा आदी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे अखेरच्या टप्प्यात असलेल्या भातपिकाला त्याचा फटका बसण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.सध्याच्या बदलत्या वातावरणात पाऊस लांबल्याने लावणीची कामे खोळंबली होती. त्यामुळे नियोजनाच्या एक महिना उशिरा भात लावणी झाल्याने ते परिपक्व होण्याचाही कालावधीही लांबला. पण, सध्या पंधरा दिवस पावसाने मारलेली दडी, बदलते मळभी वातावरण, यामुळे खोडकिडी, निळे भुंगेरे, करपा यांचा बहुतांश ठिकाणी प्रादुर्भाव झाल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे भाताच्या पातींवर बारीक ठिपके दिसणे, पाने वाळणे असे प्रकार आढळून येत आहेत. तसेच भाताच्या लोंबीही आता तयार झालेल्या असल्याने निळ्या भुंग्यांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. तसेच काही ठिकाणी भातपिकावर भूरकट पांढऱ्या रंगाची अळीही पडलेली दिसत आहे. विविध रोग या ढगाळ आणि अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे पडलेले आहेत. या करपा रोगावर संबंधित यंत्रणेने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.कृषी सहाय्यक प्रशिक्षणासाठी बाहेरगावी असल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. निवळी, चरवेली, नागलेवाडी, कापडगाव, पाली, साठरेबांबर, कशेळी, नाणीज आदी गावांमध्ये या रोगाची लागण झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. कृषी भागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन पीक वाचवण्याची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)