शहरं
Join us  
Trending Stories
1
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
2
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
3
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
4
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
5
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
6
Bobby Darling : "माझ्या आईच्या मृत्यूला मी जबाबदार, मला माफ कर...", ढसाढसा रडली बॉबी डार्लिंग
7
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
8
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
9
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
10
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
11
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
12
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
13
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
14
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
15
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
16
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
17
Chaturmas 2025 Rangoli: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
18
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
20
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार

साठवणूक क्षमतेअभावी भातखरेदी थांबली

By admin | Updated: May 23, 2015 00:36 IST

लिलाव पध्दतीने भात विक्री : उंदिर, घुशींकडून भाताचे नुकसान

रत्नागिरी : गोदामांची साठवणूक क्षमता संपल्यामुळे यावर्षी भात खरेदी करण्यात आली नाही. २०१३-१४ मध्ये खरेदी करण्यात आलेले भात अद्याप तालुका संघाच्या गोदामात पडून आहे. उंदिर आणि घुशींकडून भाताचे नुकसान करण्यात आले आहे. मिलिंगमध्ये अखंड तांदूळ येण्याऐवजी तुकडा होणार आहे. शासनाचे यामध्ये नुकसान होणार असल्याने लिलाव पध्दतीने भात विक्रीचा निर्णय घेण्यात आला आहे.दि महाराष्ट्र स्टेट को - आॅप. मार्केटिंग फेडरेशनतर्फे जिल्ह्यातील १६ खरेदी - विक्री केंद्रांवर १९५९ शेतकऱ्यांकडून २४ हजार ४९८.४६ क्विंटल भात खरेदी करण्यात आली होती. शेतकऱ्यांकडून १३१० रूपये प्रतिक्विंटल अधिक दोनशे रूपये बोनस देऊन खरेदी करण्यात आलेला भात मिलिंग प्रक्रिया रखडल्यामुळे अद्याप तालुका संघांच्या गोदामांमध्ये पडून राहिला आहे. भाताला दोन वर्षे झाल्यामुळे भात भरडण्यास योग्य राहिले नाही. मिलिंगवेळी तुकडा पडण्याची शक्यता असून, यामध्ये शासनाचे नुकसान होणार आहे. जिल्हाभरात कुठेही भरडाईकरिता मिलिंग मिल नसल्यामुळे कोल्हापूर किंवा रायगड जिल्ह्यात पाठवावे लागते. मात्र, यावर्षी मिलिंगचा क्विंटलचा दर न ठरल्यामुळे भात पडून राहिले आहे. २०१३-१४चे भात शिल्लक राहिल्यामुळे २०१४-१५ मध्ये खरेदी झालेली नाही. भात पडून राहिल्यामुळे नवीन खरेदी झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शिवाय नवीन हंगाम आता पुन्हा सुरू होत आहे. मे अखेरपर्यंत लिलाव पध्दतीने विक्री व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.दि महाराष्ट्र स्टेट को - आॅप. मार्केटिंग फेडरेशनतर्फे भात खरेदी करण्यात आल्यानंतर संबंधित भात मिलिंग करून आलेला तांदूळ भारतीय अन्न महामंडळातर्फे तांदूळ खरेदी करण्यात येतो. मात्र, एफसीआयने तांदूळ खरेदीच बंद केली आहे. रेशन दुकानामध्ये विक्रीस ठेवण्यात येतो. परंतु दोन वर्षे भात गोदामातून पडून राहिल्यामुळे ते भात प्रोसेसिंगसाठी योग्य राहिलेले नाही. तांदळाचा योग्य दर्जा मिळाला नाही तर वाहतूक खर्चाचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. त्यामुळेच भात गोदामाध्ये अद्याप पडून आहे. भाताचा उठाव न झाल्यामुळे लिलाव पध्दतीने विक्रीचा निर्णय घेण्यात आला आहे.एफसीआयने भाताची उचल न केल्यामुळे भात पडून राहिले आहे. जिल्ह्यातील आठ गोदामांतील भातासाठी ई निविदा प्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, प्रतिसादाअभावी फेरनिविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे प्रभारी जिल्हा मार्केटिंग अधिकारी प्रभाकर किल्ले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. साधारणत: नोव्हेंबरमध्ये भात कापणी पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर ते मार्चपर्यंत भात खरेदी करण्यात येते. २०१४-१५ साठी १३६० रूपये प्रतिक्विंटलला दर निश्चित करण्यात आला होता. शिवाय जिल्ह्याला २५००० क्विंटलचे उद्दिष्ट देण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वीचे भात गोदामामध्ये पडून राहिले आणि गोदामाची साठवणूक क्षमता नसल्यामुळे तालुका खरेदी - विक्री संघाने भात खरेदी करण्यास नकार दिला. परिणामी भात खरेदीची प्रकिया थांबली. हंगामात पिकवलेले भात स्वत:पुरते ठेवून शेतकरी विकून काही पैसे मिळवतात. परंतु खरेदीची प्रक्रियाच थांबल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यावर्षी भातपीक घ्यावे वा नाही, या विवंचनेत शेतकरीवर्ग पडलेला दिसून येत आहे. मे महिनाअखेर लिलाव प्रक्रिया झाली तर भात खरेदी सुरू करण्यात येईल. एकीकडे शासन ‘अच्छे दिन’चे आमिष दाखवत असताना दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेले दिसून येत आहे. यावर्षी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातील पीक वाया गेले तरीही शासन अद्याप नुकसानभरपाई देण्याच्या मन:स्थितीत नाही. त्याचप्रमाणे भातही शेतकऱ्यांकडे अद्याप पडून राहिला आहे. विक्रीबाबात शासनाने योग्य निर्णय न घेतल्यास शेतकऱ्यांपुढे आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही. शेतकऱ्यांच्या हिताकडे शासन डोळेझाक करीत असलेले दिसून येत आहे. (प्रतिनिधी) भात खरेदी केंद्र शेतकरीभात१खेड२७५४५३०२दापोली१११९५३.६०३केळशी१५३१०७७.०१४गुहागर१९७१६५९.६०५रत्नागिरी१२२११०५.६०६संगमेश्वर१७२२५०७.६०७लांजा१८१२८.४०८राजापूर१२८१९९४.४०भात खरेदी केंद्र शेतकरी भात९पाचल९३११५६.८०१०चिपळूण११८१९९४.४०११निवळी३१५६०.४०१२मिरवणे१२५२०२१.२०१३आकले४१४४३.६०१४शिरगाव१९०१७८०.४०१५शिरळ११३१५०१.१०१६देवरूख७२९०९.९५