शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

खार जमिनीतील भातलागवड पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:34 IST

पाऊस सुरू झाल्यावर बी फेकून पेरावे आणि मातीचा थर थोडासा हलवावा. सरी पाडून पेरल्यास रुजवा कमी येतो. बी ...

पाऊस सुरू झाल्यावर बी फेकून पेरावे आणि मातीचा थर थोडासा हलवावा. सरी पाडून पेरल्यास रुजवा कमी येतो. बी उगवल्यानंतर त्यास ८ ते १० दिवसांनी प्रतिगुंठ्यावर एक ते दीड किलो युरिया खत द्यावे. खर जमिनीत क्षारांचा निचरा होण्याच्या दृष्टीने भात लागवडीपूर्वी चिखलणी सुरू करू नये. चिखलणी केल्याने क्षारांचा निचरा होण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो. खार जमिनीत भात खाचरे समपातळीत असणे आवश्यक आहे. त्यामुळे खाचरातील पाण्याची पातळीही सारखी राहते व क्षारांचा निचरा होण्यास मदत होते. रोपे २५ ते ३० दिवसांची झाल्यावर सरळ व उथळ लागवणी करावी. यामुळे फुटवा लवकर येण्यास मदत होते. तसेच एका चुडात चार ते पाच रोपे लावावी. निमगरव्या जातीसाठी दोन ओळींतील अंतर २० सेंटीमीटर व दोन चुडांतील अंतर १५ सेंटीमीटर ठेवून लावणी करावी. हळ्या जातींची लागवड १५ बाय १५ सेंटीमीटर अंतरावर करावी.

खार जमिनीमध्ये मुख्यत्वेकरून सुरुवातीला लव्हाळा व लोणकट हे तण आढळतात. जमीन ट्रॅक्टरच्या साहाय्याने साधारणत: २५ ते ३० सेंटिमीटर खोलीपर्यंत नांगरली तर तणांचा उपद्रव पुष्कळसा कमी होतो. नंतर शेतात पाण्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केल्यास हे तण नाहीशी होतात. खार जमिनीमध्ये हार नावाचे एक जलतण आढळते. या तणाचे पुनर्जीवन स्पोअर्सने होत असते. तसेच ते पाण्याखाली असल्याने कोणत्याही तणनाशकाचा त्याच्यावर योग्य तो परिणाम होत नाही. त्यामुळे हार तण आढळल्यास ताबडतोब बेणणी करावी. खार जमिनीत आंतरमशागत करणे गरजेचे आहे.

मत्स्यसंवर्धन

खार जमिनी पावसाळ्यामध्ये सतत पाण्याखाली असल्यामुळे भाताबरोबर मत्स्योत्पादन करणे शक्य आहे. खार जमिनीत क्षारांचा निचरा होण्यासाठी शेताच्या सभोवताली चरी काढाव्यात. पावसाळ्याच्या शेवटी शेतातील पाणी कमी झाले तरी अशा चरींत पाणी राहते. त्यामुळे या चरींचा मत्स्यसंवर्धनासाठी उपयोग करून घेता येतो. सिप्रिनस या माशांचे संवर्धन केल्यास भात पीक काळात बऱ्यापैकी वाढ होते.

भूपृष्ठावरील तळी

खार जमिनीत पावसाळ्यात फक्त भाताचे पीक घेता येते. सिंचनाच्या सोयी उपलब्ध नसल्यामुळे रब्बी हंगामात पिके घेता येत नाहीत. खरीप हंगामातही खार जमिनीत भाताचे पीक रोपावस्थेत असताना पावसाचा आठ ते दहा दिवसांचा खंड जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढते व रोपे करपतात. तळ्यांमध्ये पावसाळ्यातील गोडे पाणी साठवून त्याचा उपयोग शेतीसाठी करता येतो.

लागवडीबाबत काळजी

लागवडीच्या मानाने रहू किंवा आवटणी कमी खर्चाच्या असल्याने सुरुवातीला परवडतात; परंतु जसजशी जमीन सुधारत जाईल, तसतशी नेहमीच्या पद्धतीने गादीवाफ्यावर रोपे करून लावणी करणेच हितावह ठरते. लावणी करताना रोपांचा चूड फार खोलवर लावू नये. चूड जास्त खोलवर लावला तर जमिनीच्या खालच्या थरात असलेल्या जास्त क्षारामुळे ते जळून जाण्याचा संभव असतो. खार जमिनीत विरळ पिकांचे मुख्य कारण हेच आहे.