शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

लोटेबाबत यंत्रणांच्या दुर्लक्षावर तीव्र संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:30 IST

आवाशी : इतका मोठा प्रकार झाला तरी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसीचे अधिकारी मात्र उशिरापर्यंत घटनास्थळी दाखल होत नाहीत, ...

आवाशी : इतका मोठा प्रकार झाला तरी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसीचे अधिकारी मात्र उशिरापर्यंत घटनास्थळी दाखल होत नाहीत, हे दुर्दैव असल्याची सणसणीत टीका आमदार भास्कर जाधव यांनी शनिवारी केली. काम करण्याची इच्छा नाही, अशा अधिकाऱ्यांना आपण त्यांना समजेल, अशा प्लॅटफॉर्मवरून उत्तर देऊ, असेही त्यांनी सांगितले.

लोटेतील घरडा केमिकल्स कंपनीला आग लागल्यानंतर आमदार जाधव यांनी लगेचच कंपनीला भेट दिली. त्यांच्यासमवेत जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव, शिवसेनेचे उत्तर रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्यासह अनेक पदाधिकारी होते.

चिपळूणला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय आहे. एमआयडीसीचे कार्यालय आहे; पण एवढी मोठी घटना घडूनही तेथील अधिकारी घटनास्थळी हजर नाहीत. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूर रिजनल मॅनेजर यांचा मोबाईल बंद आहे. त्यांच्या सायन येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन अर्धा तास व्यस्त आहे. या यंत्रणांना घटनेचे गांभीर्य कळत नाही का, असा प्रश्न आमदार जाधव यांनी केला.

या सर्व यंत्रणांना आपण त्यांना समजेल अशा प्लॅटफॉर्मवरून उत्तर देऊ. आम्ही काही करायला गेलो की सरकारी कामात व्यत्यय आणल्याचा गुन्हा दाखल करायला हे अधिकारी तयारच असतात आणि पोलिसांनाही तेच हवे असते. त्यामुळे त्यांना समजेल, अशा ठिकाणावरूनच उत्तर देऊ, असे ते म्हणाले.