शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

राजापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:21 IST

राजापूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत काहीसा सुरक्षित राहिलेला राजापूर तालुका दुसऱ्या लाटेत मात्र पुरता असुरक्षित झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित ...

राजापूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत काहीसा सुरक्षित राहिलेला राजापूर तालुका दुसऱ्या लाटेत मात्र पुरता असुरक्षित झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतच असून, ग्रामीण भागात गाव, वाडी आणि वस्तीवर कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. तालुक्यातील अपुऱ्या आरोग्यविषयक सेवा-सुविधा आणि साधनसामग्रीत वाढती कोरोना रुग्णसंख्या चिंतेची बाब आहे. कडक लॉकडाऊनमध्येही तालुक्यात रुग्णांचा आकडा वेगाने वाढल्याने स्थानिक पातळीवर प्रशासन अपयशी ठरल्याचे दिसत आहे.

ग्रामीण भागातील या वाढत्या कोरोना संसर्गाच्या आकडेवारीमुळे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी, माझे गाव, माझी जबाबदारी’ ही अभियाने पुरती फसल्याचेही पुढे आले आहे. ग्रामीण भागातील ग्रामकृतीदलांना अधिक सतर्क करून जनतेमध्ये याबाबत जनजागृती करतानाच पुन्हा एकदा गावनिहाय आरोग्य तपासणी मोहीम राबविणे आवश्यक आहे.

प्रारंभी लॉकडाऊन आणि त्यानंतर ३ जून ते ९ जून या काळात प्रशासनाने लागू केलेले कडक लॉकडाऊनही फसल्याचेच पुढे आले आहे. उलट या कडक लॉकडाऊनच्या कार्यकाळात तालुक्यात २ जून ते ८ जून या काळात तालुक्यात तब्बल ५२८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कडक लाॅकडाऊनची मर्यादा केवळ शहरापुरतीच मर्यादित राहिली व ग्रामीण भागात प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग थांबण्याऐवजी वाढतच गेल्याचे आकडेवारीने सिध्द केले आहे.

तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरापेक्षा ग्रामीण भागात संसर्ग अधिक वाढला आहे. मंगळवार ८ जूनअखेर तालुक्यात एकूण २९३५ कोरोनाबाधित रुग्णांची नोद झाली आहे. यातील १८४१ रुग्ण हे उपचारांती बरे झाले आहेत; तर सध्या ९७५ रुग्ण ॲक्टिव्ह असून, ते विविध ठिकाणी उपचार घेत आहेत; तर आजपर्यंत तालुक्यात दुर्दैवाने ११९ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद शासकीय दप्तरी आहे. मात्र कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत रुग्ण व मृत्यू वाढीचा दर हा वेगवान आहे.

गेल्या वर्षभरात तालुक्यात शासकीय कोरोना रुग्णालय व कोरोना प्रतिबंधक चांगल्या आरोग्य सेवाही तालुक्यात उपलब्ध झाल्या नाहीत़. रायपाटण व धारतळे येथे कोविड सेंटर सुरू झाली, पण सेवा-सुविधांची त्या ठिकाणी वानवा आहे. तर आता ओणी व रायपाटण येथे कोविड रुग्णालये झाली; पण तेथे पुरेसे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नसल्याचेही पुढे आले आहे. त्यामुळे केवळ औपचारिकता पूर्ण करणे हाच हेतू आहे की काय, अशीही शंका उपस्थित केली जात आहे.

------------------------

कोराेना चाचणीत आपला अहवाल पॉझिटिव्ह आला, तर आपल्याला कोविड सेंटरला नेतील; पण तेथे तर काहीच सुविधा नाहीत, आपल्याला रत्नागिरीत अथवा कोल्हापूरला उपचारासाठी जावे लागेल; पण आपली तर तेवढी आर्थिक परिस्थितीही नाही. या विवंचनेमुळे आणि काळजीमुळे मग अनेकांनी सर्दी, ताप-खोकला यांसारखे आजार अंगावरच काढले आहेत. अंतिम टप्प्यात त्याचे व्हायचे तेच परिणाम झाले.