शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

राजापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:21 IST

राजापूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत काहीसा सुरक्षित राहिलेला राजापूर तालुका दुसऱ्या लाटेत मात्र पुरता असुरक्षित झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित ...

राजापूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत काहीसा सुरक्षित राहिलेला राजापूर तालुका दुसऱ्या लाटेत मात्र पुरता असुरक्षित झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतच असून, ग्रामीण भागात गाव, वाडी आणि वस्तीवर कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. तालुक्यातील अपुऱ्या आरोग्यविषयक सेवा-सुविधा आणि साधनसामग्रीत वाढती कोरोना रुग्णसंख्या चिंतेची बाब आहे. कडक लॉकडाऊनमध्येही तालुक्यात रुग्णांचा आकडा वेगाने वाढल्याने स्थानिक पातळीवर प्रशासन अपयशी ठरल्याचे दिसत आहे.

ग्रामीण भागातील या वाढत्या कोरोना संसर्गाच्या आकडेवारीमुळे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी, माझे गाव, माझी जबाबदारी’ ही अभियाने पुरती फसल्याचेही पुढे आले आहे. ग्रामीण भागातील ग्रामकृतीदलांना अधिक सतर्क करून जनतेमध्ये याबाबत जनजागृती करतानाच पुन्हा एकदा गावनिहाय आरोग्य तपासणी मोहीम राबविणे आवश्यक आहे.

प्रारंभी लॉकडाऊन आणि त्यानंतर ३ जून ते ९ जून या काळात प्रशासनाने लागू केलेले कडक लॉकडाऊनही फसल्याचेच पुढे आले आहे. उलट या कडक लॉकडाऊनच्या कार्यकाळात तालुक्यात २ जून ते ८ जून या काळात तालुक्यात तब्बल ५२८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कडक लाॅकडाऊनची मर्यादा केवळ शहरापुरतीच मर्यादित राहिली व ग्रामीण भागात प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग थांबण्याऐवजी वाढतच गेल्याचे आकडेवारीने सिध्द केले आहे.

तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरापेक्षा ग्रामीण भागात संसर्ग अधिक वाढला आहे. मंगळवार ८ जूनअखेर तालुक्यात एकूण २९३५ कोरोनाबाधित रुग्णांची नोद झाली आहे. यातील १८४१ रुग्ण हे उपचारांती बरे झाले आहेत; तर सध्या ९७५ रुग्ण ॲक्टिव्ह असून, ते विविध ठिकाणी उपचार घेत आहेत; तर आजपर्यंत तालुक्यात दुर्दैवाने ११९ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद शासकीय दप्तरी आहे. मात्र कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत रुग्ण व मृत्यू वाढीचा दर हा वेगवान आहे.

गेल्या वर्षभरात तालुक्यात शासकीय कोरोना रुग्णालय व कोरोना प्रतिबंधक चांगल्या आरोग्य सेवाही तालुक्यात उपलब्ध झाल्या नाहीत़. रायपाटण व धारतळे येथे कोविड सेंटर सुरू झाली, पण सेवा-सुविधांची त्या ठिकाणी वानवा आहे. तर आता ओणी व रायपाटण येथे कोविड रुग्णालये झाली; पण तेथे पुरेसे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नसल्याचेही पुढे आले आहे. त्यामुळे केवळ औपचारिकता पूर्ण करणे हाच हेतू आहे की काय, अशीही शंका उपस्थित केली जात आहे.

------------------------

कोराेना चाचणीत आपला अहवाल पॉझिटिव्ह आला, तर आपल्याला कोविड सेंटरला नेतील; पण तेथे तर काहीच सुविधा नाहीत, आपल्याला रत्नागिरीत अथवा कोल्हापूरला उपचारासाठी जावे लागेल; पण आपली तर तेवढी आर्थिक परिस्थितीही नाही. या विवंचनेमुळे आणि काळजीमुळे मग अनेकांनी सर्दी, ताप-खोकला यांसारखे आजार अंगावरच काढले आहेत. अंतिम टप्प्यात त्याचे व्हायचे तेच परिणाम झाले.