शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

पोसरे दुर्घटनेतील १६ मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी जागा देण्यास विरोध, ही गंभीर बाब : बसपा प्रदेशाध्यक्षांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:29 IST

रत्नागिरी : अस्मानी संकटात मृत्यूमुखी पडलेल्या पोसरे (ता. खेड) येथील मागासवर्गीय समाजातील १६ लोकांवर अंत्यविधी करण्यासाठी गावातील सवर्णांनी जागा ...

रत्नागिरी : अस्मानी संकटात मृत्यूमुखी पडलेल्या पोसरे (ता. खेड) येथील मागासवर्गीय समाजातील १६ लोकांवर अंत्यविधी करण्यासाठी गावातील सवर्णांनी जागा दिली नाही, ही बाब गंभीर असून याबाबत जिल्हा प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणी बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ॲड. संदीप ताजने यांनी केली आहे. शुक्रवारी त्यांनी या गावाला पदाधिकाऱ्यांसह भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. यावेळी दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांना पक्षाकडून ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली. पोसरे - बौध्दवाडी आणि आदिवासी वाडीतील कुटुंबांना धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही करण्यात आले.

राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुराच्या संकटात सापडलेल्या चिपळूणला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण लवाजम्यासह भेट दिली. परंतु, चिपळूणपासून अगदी ३० किलोमीटर अंतरावर खेड तालुक्यात असलेल्या पोसरे बौद्धवाडीत दरड कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या १६ जणांच्या कुटुंबीयांना भेट देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही का? असा प्रश्न करत त्यांनी मुख्यमंत्र्यांची जातीयवादी मानसिकता दिसून येत असल्याची टीका केली.

अस्मानी संकटात मृत्यूमुखी पडलेल्या या वाडीतील १६ लोकांवर अंत्यविधी करण्यासाठी गावातील सवर्णांनी जागासुद्धा दिली नाही, ही बाब लाजिरवाणी आहे. देशाला स्वातंत्र मिळून ७५ वर्ष झाली आहेत. हे वर्ष आपण स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव म्हणून साजरे करणार आहोत. असे असताना मागासवर्गीयांच्या अंत्यविधीसाठी जागा दिली जात नसेल, तर महाराष्ट्राला पुरोगामी कसे म्हणायचे? असा प्रश्न त्यांनी केला. स्थानिक आमदार भास्कर जाधव यांच्याकडून या मृतांच्या अंत्यविधीसाठी जागा देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. परंतु, प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारची जागा अंत्यविधीसाठी देण्यात आली नव्हती. उलट वाडीतील व्यक्तीच यासाठी पुढे आल्याचे ताजने यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी यासंबंधी संवेदनशीलता दाखवून पीडित कुटुंबीयांना न्याय द्यावा, मृतांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करत सरकारी नोकरीत समाविष्ट करावे आणि त्याच गावात सर्वांचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणीदेखील त्यांनी केली. यावेळी त्यांच्यासमवेत बसपाचे प्रदेश महासचिव प्रशांत इंगळे, प्रदेश सचिव राजेंद्र आयरे, जिल्हा प्रभारी अनिकेत पवार, जिल्हा प्रभारी सचिन मोहिते, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रवीण मर्चंडे तसेच जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि गावातील सरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.