शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

तरंच ते शक्य आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:31 IST

एकीकडे प्रशासन आपत्ती व्यवस्थापनातील टप्प्यानुसार मदतकार्य करतच आहे तर दुसरीकडे खासगी संस्था आणि वैयक्तिकरित्या लोक मदत करत आहेत. एकट्या ...

एकीकडे प्रशासन आपत्ती व्यवस्थापनातील टप्प्यानुसार मदतकार्य करतच आहे तर दुसरीकडे खासगी संस्था आणि वैयक्तिकरित्या लोक मदत करत आहेत. एकट्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दोन हजार कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. ही बाब संपूर्ण कोकणचे आर्थिक कंबरडे मोडणारी आहे. म्हणून येत्या काही वर्षांमध्ये निर्माण होणाऱ्या संभाव्य महापूर, भूकंप, दरड कोसळणे यासारख्या नैसर्गिक आपत्तींवर आत्तापासूनच विचार करून उपाययोजना आखणे गरजेचे आहे. जसे की आम्ही २००५मध्ये राज्य सरकार व केंद्र सरकारला वाशिष्ठी नदीच्या पाण्याचा उपयोग सायकल पद्धतीने परशुरामच्या टेकडीपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत आणि उत्तरेकडे ठाण्यापर्यंत कसे पाणी नेता येईल, याविषयी सुचविले होते. अर्थात मोफत दिलेल्या सल्ल्याचा इथे काही उपयोग होत नाही हे त्यावेळीही आणि आताही लक्षात येत आहे. तरीही आता राहावत नाही म्हणून राज्य सरकार व केंद्र सरकार यांनी कोयना धरणाच्या पश्चिमेकडून पश्चिमेकडे येणारे पाणी परत एका टप्प्यामध्ये आणून त्यातून वीजनिर्मिती करून ते पाणी शेतीसाठी कालवे पद्धतीने जर वापरण्याची योजना केली. तसेच सायकल पद्धतीने हे पाणी दक्षिणेकडे व उत्तरेकडे वळवले तर कदाचित चिपळूणला बसणाऱ्या महापुराचा धोका टळेल. शिवाय कोकणच नव्हे तर सर्वत्र राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण होत आहे. या चौपदरीकरणामुळे पाणी मोठ्या प्रमाणात अडवले जात आहे. त्यासाठीची उपायोजना रस्तेबांधणीपूर्वी करणं गरजेचं होते. पण ते केलं नसल्याने आज सर्वत्र पाण्याच्या निचऱ्याचा अभाव दिसून येत आहे. तर त्यासंदर्भात राज्य व केंद्र सरकारने फेरविचार करावा. शिवाय नद्यांच्या पात्रांचे रुंदीकरण करणे, पात्रांची स्वच्छता करून घेणे हे सुद्धा गरजेचे आहे. पुढच्या चाळीस-पन्नास वर्षांमध्ये पश्चिम किनारपट्टीवर पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता संशोधक वर्तवत आहेत. तेव्हा समुद्रालगत असलेल्या लोकवस्तीला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यांचे आपत्तीपूर्व व्यवस्थापन आजच करणे गरजेचे आहे. या सगळ्या समस्यांचा विचार करून प्रशासनाने जर त्यासाठी उपाययोजना राबविल्या तर कदाचित येत्या काही वर्षांमध्ये संपूर्ण कोकण किनारपट्टी आपत्तीमुक्त होईल. शिवाय या कोकण किनारपट्टीचा कॅलिफोर्नियाच काय त्याच्यापुढेसुद्धा ती भविष्यात जाऊ शकेल. पण हा मोफत सल्ला मनावर घेऊन राबविला तरंच ते शक्य आहे.

- डॉ. गजानन पाटील