शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

तरंच ते शक्य आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:31 IST

एकीकडे प्रशासन आपत्ती व्यवस्थापनातील टप्प्यानुसार मदतकार्य करतच आहे तर दुसरीकडे खासगी संस्था आणि वैयक्तिकरित्या लोक मदत करत आहेत. एकट्या ...

एकीकडे प्रशासन आपत्ती व्यवस्थापनातील टप्प्यानुसार मदतकार्य करतच आहे तर दुसरीकडे खासगी संस्था आणि वैयक्तिकरित्या लोक मदत करत आहेत. एकट्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दोन हजार कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. ही बाब संपूर्ण कोकणचे आर्थिक कंबरडे मोडणारी आहे. म्हणून येत्या काही वर्षांमध्ये निर्माण होणाऱ्या संभाव्य महापूर, भूकंप, दरड कोसळणे यासारख्या नैसर्गिक आपत्तींवर आत्तापासूनच विचार करून उपाययोजना आखणे गरजेचे आहे. जसे की आम्ही २००५मध्ये राज्य सरकार व केंद्र सरकारला वाशिष्ठी नदीच्या पाण्याचा उपयोग सायकल पद्धतीने परशुरामच्या टेकडीपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत आणि उत्तरेकडे ठाण्यापर्यंत कसे पाणी नेता येईल, याविषयी सुचविले होते. अर्थात मोफत दिलेल्या सल्ल्याचा इथे काही उपयोग होत नाही हे त्यावेळीही आणि आताही लक्षात येत आहे. तरीही आता राहावत नाही म्हणून राज्य सरकार व केंद्र सरकार यांनी कोयना धरणाच्या पश्चिमेकडून पश्चिमेकडे येणारे पाणी परत एका टप्प्यामध्ये आणून त्यातून वीजनिर्मिती करून ते पाणी शेतीसाठी कालवे पद्धतीने जर वापरण्याची योजना केली. तसेच सायकल पद्धतीने हे पाणी दक्षिणेकडे व उत्तरेकडे वळवले तर कदाचित चिपळूणला बसणाऱ्या महापुराचा धोका टळेल. शिवाय कोकणच नव्हे तर सर्वत्र राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण होत आहे. या चौपदरीकरणामुळे पाणी मोठ्या प्रमाणात अडवले जात आहे. त्यासाठीची उपायोजना रस्तेबांधणीपूर्वी करणं गरजेचं होते. पण ते केलं नसल्याने आज सर्वत्र पाण्याच्या निचऱ्याचा अभाव दिसून येत आहे. तर त्यासंदर्भात राज्य व केंद्र सरकारने फेरविचार करावा. शिवाय नद्यांच्या पात्रांचे रुंदीकरण करणे, पात्रांची स्वच्छता करून घेणे हे सुद्धा गरजेचे आहे. पुढच्या चाळीस-पन्नास वर्षांमध्ये पश्चिम किनारपट्टीवर पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता संशोधक वर्तवत आहेत. तेव्हा समुद्रालगत असलेल्या लोकवस्तीला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यांचे आपत्तीपूर्व व्यवस्थापन आजच करणे गरजेचे आहे. या सगळ्या समस्यांचा विचार करून प्रशासनाने जर त्यासाठी उपाययोजना राबविल्या तर कदाचित येत्या काही वर्षांमध्ये संपूर्ण कोकण किनारपट्टी आपत्तीमुक्त होईल. शिवाय या कोकण किनारपट्टीचा कॅलिफोर्नियाच काय त्याच्यापुढेसुद्धा ती भविष्यात जाऊ शकेल. पण हा मोफत सल्ला मनावर घेऊन राबविला तरंच ते शक्य आहे.

- डॉ. गजानन पाटील