शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

एका वर्षात डिझेल ३० टक्के, तर किराणा ४० टक्क्यांनी वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:32 IST

मेहरुन नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गेल्या वर्षभरात इंधन दरवाढ सातत्याने सुरू आहे. वर्षभरात डिझेलच्या दरात ३० ...

मेहरुन नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गेल्या वर्षभरात इंधन दरवाढ सातत्याने सुरू आहे. वर्षभरात डिझेलच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. इंधन दरात वाढ झाली की, वाहतूक भाडे वाढते. रत्नागिरीत जीवनावश्यक वस्तू वाशी (मुंबई), कोल्हापूर येथून येतात. साहजिकच वाहतूक भाड्यामध्ये किलोमागे ३० पैशांची वाढ होते. खाद्यतेल, डाळी, कडधान्यांच्या दरात सातत्याने वाढ सुरू आहे.

तांदूळ, बेसनाच्या दरातही वाढ झाली असली तरी गूळ व साखरेचे दर मात्र स्थिर आहेत. खाद्यतेल मलेशियातून भारतात आयात होत आहे. कच्चा माल भारतातून निर्यात केला जात असला तरी रिफाईंड तेल मात्र भारतात आल्यानंतरच त्याचे पॅकिंग केले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दरवाढीचा फटका किरकोळ, घाऊक विक्रीवर झाला आहे. दिवाळीपासून तर खाद्यतेलाच्या किमतीत प्रचंड बदल झाला आहे. दरवाढीमुळे दैनंदिन बजेट कोलमडले आहे.

डाळी, कडधान्य व तांदूळाच्या किमतीतही वाढ झाली आहे. कोरोनामुळे लाॅकडाऊन घोषित करण्यात आले. त्यामुळे गेली दोन वर्षे उद्योग-व्यवसायावर परिणाम झाला आहे. अनेकांना रोजगार गमवावे लागले आहेत. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या वेतनात गेल्या दोन वर्षात वाढ झाली नाही. परिणामी मिळणाऱ्या मोजक्या पैशातच उदरनिर्वाह व अन्य खर्च भागावावे लागत असल्याने डाळभातही महागला आहे.

लाॅकडाऊनचे परिणाम सोसत असतानाच महागाईचा सामनाही करावा लागत आहे. उत्पन्न जेमतेम तेच आहे. मात्र, महागाईमुळे खर्चात वाढ झाली आहे. दैनंदिन खर्च भागविणे अवघड बनले आहे. महागाईवर नियंत्रण असणे आवश्यक आहे.

- शमिका रामाणी, गृहिणी.

दीपावलीपासून बाजारातील खाद्यतेलाच्या किमती भडकल्या आहेत. अशाचप्रकारे तेलाच्या किमतीतील वाढ जर सुरूच राहिली तर भविष्यात तेलाची फोडणी न देता पाण्याची द्यावी लागणार आहे. दरवाढ करताना सर्वसामान्यांचा विचार करणे गरजेचे आहे.

- सायली पवार, गृहिणी.

कोरोनाचे पडसाद सोसावे लागत आहेत. दोन वर्षांत तर महागाईने कहर केला आहे. शासनाचे महागाईवर नियंत्रण राहिलेले नसल्यामुळेच डाळी, खाद्यतेल, कडधान्यांच्या दरात वाढ सुरूच आहे. त्यामुळे दैनंदिन स्वयंपाकात उसळ किंवा डाळपैकी एकच करावे लागत आहे. भाज्यांचे दर वाढल्यामुळे डाळभातालाही महागाईची झळ बसली आहे.

- दीपश्री पाटील, गृहिणी.