शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
2
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
3
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
5
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
6
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
7
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
9
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
10
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
11
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
12
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
13
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
14
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
15
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
16
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
17
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
18
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
19
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
20
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   

एका वर्षात डिझेल ३० टक्के, तर किराणा ४० टक्क्यांनी वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:32 IST

मेहरुन नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गेल्या वर्षभरात इंधन दरवाढ सातत्याने सुरू आहे. वर्षभरात डिझेलच्या दरात ३० ...

मेहरुन नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गेल्या वर्षभरात इंधन दरवाढ सातत्याने सुरू आहे. वर्षभरात डिझेलच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. इंधन दरात वाढ झाली की, वाहतूक भाडे वाढते. रत्नागिरीत जीवनावश्यक वस्तू वाशी (मुंबई), कोल्हापूर येथून येतात. साहजिकच वाहतूक भाड्यामध्ये किलोमागे ३० पैशांची वाढ होते. खाद्यतेल, डाळी, कडधान्यांच्या दरात सातत्याने वाढ सुरू आहे.

तांदूळ, बेसनाच्या दरातही वाढ झाली असली तरी गूळ व साखरेचे दर मात्र स्थिर आहेत. खाद्यतेल मलेशियातून भारतात आयात होत आहे. कच्चा माल भारतातून निर्यात केला जात असला तरी रिफाईंड तेल मात्र भारतात आल्यानंतरच त्याचे पॅकिंग केले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दरवाढीचा फटका किरकोळ, घाऊक विक्रीवर झाला आहे. दिवाळीपासून तर खाद्यतेलाच्या किमतीत प्रचंड बदल झाला आहे. दरवाढीमुळे दैनंदिन बजेट कोलमडले आहे.

डाळी, कडधान्य व तांदूळाच्या किमतीतही वाढ झाली आहे. कोरोनामुळे लाॅकडाऊन घोषित करण्यात आले. त्यामुळे गेली दोन वर्षे उद्योग-व्यवसायावर परिणाम झाला आहे. अनेकांना रोजगार गमवावे लागले आहेत. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या वेतनात गेल्या दोन वर्षात वाढ झाली नाही. परिणामी मिळणाऱ्या मोजक्या पैशातच उदरनिर्वाह व अन्य खर्च भागावावे लागत असल्याने डाळभातही महागला आहे.

लाॅकडाऊनचे परिणाम सोसत असतानाच महागाईचा सामनाही करावा लागत आहे. उत्पन्न जेमतेम तेच आहे. मात्र, महागाईमुळे खर्चात वाढ झाली आहे. दैनंदिन खर्च भागविणे अवघड बनले आहे. महागाईवर नियंत्रण असणे आवश्यक आहे.

- शमिका रामाणी, गृहिणी.

दीपावलीपासून बाजारातील खाद्यतेलाच्या किमती भडकल्या आहेत. अशाचप्रकारे तेलाच्या किमतीतील वाढ जर सुरूच राहिली तर भविष्यात तेलाची फोडणी न देता पाण्याची द्यावी लागणार आहे. दरवाढ करताना सर्वसामान्यांचा विचार करणे गरजेचे आहे.

- सायली पवार, गृहिणी.

कोरोनाचे पडसाद सोसावे लागत आहेत. दोन वर्षांत तर महागाईने कहर केला आहे. शासनाचे महागाईवर नियंत्रण राहिलेले नसल्यामुळेच डाळी, खाद्यतेल, कडधान्यांच्या दरात वाढ सुरूच आहे. त्यामुळे दैनंदिन स्वयंपाकात उसळ किंवा डाळपैकी एकच करावे लागत आहे. भाज्यांचे दर वाढल्यामुळे डाळभातालाही महागाईची झळ बसली आहे.

- दीपश्री पाटील, गृहिणी.