शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणातील पाणीटंचाई आराखड्यासाठी एक कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:51 IST

चिपळूण : तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने तालुक्याचा टंचाई आराखडा तयार करून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. या आराखड्याअंतर्गत ...

चिपळूण : तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने तालुक्याचा टंचाई आराखडा तयार करून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. या आराखड्याअंतर्गत तालुक्यातील १९ गावांच्या नळ पाणी योजनांची दुरुस्ती तर एका गावच्या पाणी योजनेला मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी १ कोटी ३ लाख ५२ हजार २९३ रुपये खर्च केला जाणार आहे. निविदा प्रक्रियेनंतर तत्काळ या कामांना सुरुवात केली जाणार असल्याने ग्रामस्थांची तहाण भागविणाऱ्या नळ पाणीपुरवठा योजनांना संजीवनी मिळणार आहे.

तालुक्यात दरवर्षी मार्चनंतर पाणीटंचाईला सुरुवात होते. पाणी योजनेवर कोट्यवधींचा निधी खर्च झाला तरी तालुक्यातील पाणीटंचाई नित्याचीच ठरली आहे. पाणीटंचाईची समस्या असलेल्या गावांचा अभ्यास करून तालुक्याचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला होता. या आराखड्यात ५३ गावे व ९६ वाड्यांचा समावेश होता. हा आराखडा जिल्हा परिषदतर्फे कोकण आयुक्तांकडे गेल्यानंतर त्यास मंजुरी मिळाली होती. त्यापैकी चिपळूण तालुक्यातील २० गावांतील पाणी योजनांच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ३ लाख ५२ हजार २९३ रुपयांचा निधी मंजूर झाला. यामध्ये एका गावात तात्पुरती पूरक योजना राबविण्यात येणार आहे.

पाणी योजनांच्या दुरुस्तीमध्ये उभळे आगरगाव, गोसावीवाडी, कापसाळ येथील खोरकरवाडी, पोफळी सय्यदवाडी, धामणवणे दत्तवाडी, शिरळ मोरेवाडी, रेहेळवैजी पवारवाडी, तिवरे येथील कुंभारवाडी पुनर्वसन, तिवडी मधलीवाडी, कळवंडे, बामणेवाडी, तावडेवाडी, निर्व्हाळ वाघेवाडी, डुगवे बौद्धवाडी, भोम खालचीवाडी कालुस्ते कुपेवाडी, कादवड धनगरवाडी, पोसरे आदावडेवाडी या गावांचा समावेश आहे.

..........................................

शिरगाव-धनगरवाडीत तात्पुरती पूरक नळ पाणीपुरवठा याेजना

शिरगाव येथील धनगरवाडीमध्ये तात्पुरती पूरक नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. योजनांची कामे मार्गी लागण्यासाठी निविदाप्रक्रिया राबवली जात आहे. निविदाप्रक्रिया झाल्यानंतर पाणी योजनांच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा होणार आहे. या गावांमधील पाणी योजना जीर्ण झाल्याने त्याची दुरुस्ती करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. मात्र योजनेच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी मिळत नसल्याने ग्रामपंचायतीकडून नाराजी व्यक्त केली जात होती. मात्र आता २० गावांतील पाणी योजनांच्या दुरुस्तीकरिता निधी मिळाल्याने त्या-त्या गावांतील पाणी योजना नियमित सुरू राहण्यास मदत होणार आहे.