शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणातील पाणीटंचाई आराखड्यासाठी एक कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:51 IST

चिपळूण : तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने तालुक्याचा टंचाई आराखडा तयार करून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. या आराखड्याअंतर्गत ...

चिपळूण : तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने तालुक्याचा टंचाई आराखडा तयार करून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. या आराखड्याअंतर्गत तालुक्यातील १९ गावांच्या नळ पाणी योजनांची दुरुस्ती तर एका गावच्या पाणी योजनेला मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी १ कोटी ३ लाख ५२ हजार २९३ रुपये खर्च केला जाणार आहे. निविदा प्रक्रियेनंतर तत्काळ या कामांना सुरुवात केली जाणार असल्याने ग्रामस्थांची तहाण भागविणाऱ्या नळ पाणीपुरवठा योजनांना संजीवनी मिळणार आहे.

तालुक्यात दरवर्षी मार्चनंतर पाणीटंचाईला सुरुवात होते. पाणी योजनेवर कोट्यवधींचा निधी खर्च झाला तरी तालुक्यातील पाणीटंचाई नित्याचीच ठरली आहे. पाणीटंचाईची समस्या असलेल्या गावांचा अभ्यास करून तालुक्याचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला होता. या आराखड्यात ५३ गावे व ९६ वाड्यांचा समावेश होता. हा आराखडा जिल्हा परिषदतर्फे कोकण आयुक्तांकडे गेल्यानंतर त्यास मंजुरी मिळाली होती. त्यापैकी चिपळूण तालुक्यातील २० गावांतील पाणी योजनांच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ३ लाख ५२ हजार २९३ रुपयांचा निधी मंजूर झाला. यामध्ये एका गावात तात्पुरती पूरक योजना राबविण्यात येणार आहे.

पाणी योजनांच्या दुरुस्तीमध्ये उभळे आगरगाव, गोसावीवाडी, कापसाळ येथील खोरकरवाडी, पोफळी सय्यदवाडी, धामणवणे दत्तवाडी, शिरळ मोरेवाडी, रेहेळवैजी पवारवाडी, तिवरे येथील कुंभारवाडी पुनर्वसन, तिवडी मधलीवाडी, कळवंडे, बामणेवाडी, तावडेवाडी, निर्व्हाळ वाघेवाडी, डुगवे बौद्धवाडी, भोम खालचीवाडी कालुस्ते कुपेवाडी, कादवड धनगरवाडी, पोसरे आदावडेवाडी या गावांचा समावेश आहे.

..........................................

शिरगाव-धनगरवाडीत तात्पुरती पूरक नळ पाणीपुरवठा याेजना

शिरगाव येथील धनगरवाडीमध्ये तात्पुरती पूरक नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. योजनांची कामे मार्गी लागण्यासाठी निविदाप्रक्रिया राबवली जात आहे. निविदाप्रक्रिया झाल्यानंतर पाणी योजनांच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा होणार आहे. या गावांमधील पाणी योजना जीर्ण झाल्याने त्याची दुरुस्ती करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. मात्र योजनेच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी मिळत नसल्याने ग्रामपंचायतीकडून नाराजी व्यक्त केली जात होती. मात्र आता २० गावांतील पाणी योजनांच्या दुरुस्तीकरिता निधी मिळाल्याने त्या-त्या गावांतील पाणी योजना नियमित सुरू राहण्यास मदत होणार आहे.