शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

कोरोना काळात बंदींची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : येथील विशेष कारागृहात शिक्षा बंदीवर असलेल्या बंदीजनांसाठी गेल्या काही वर्षांपासून भाजीपाला लागवडीचा उपक्रम सुरू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : येथील विशेष कारागृहात शिक्षा बंदीवर असलेल्या बंदीजनांसाठी गेल्या काही वर्षांपासून भाजीपाला लागवडीचा उपक्रम सुरू करण्यात आला होता. परंतु, कोरोना काळात शासनाने बंदीजनांच्या दृष्टीने कोरोनाबाबतची खबरदारीची उपाययोजना म्हणून शिक्षेवर असलेल्या बंदीजनांना पॅरोलवर पाठविण्यात आल्याने सध्या केवळ न्यायाधीन शिक्षेवर असलेले बंदीच या कारागृहात आहेत. त्यामुळे सध्या भाजीपाला लागवड करण्यासाठी शिक्षाबंदी असलेले बंदीजन नसल्यानेच कारागृहात होणारी भाजीपाला लागवड बंद ठेवण्यात आली आहे.

रत्नागिरीचे तत्कालीन कारागृह अधीक्षक राजेश देशमुख यांच्या संकल्पनेतून २०१८ सालापासून जे बंदी साध्या शिक्षेवर आहेत, त्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यास सुरूवात झाली होती. माठ, पालक, मिरच्या आदी विविध भाज्यांची तसेच शेतीची लागवड कारागृहाच्या सुमारे ७ एकर जागेत करण्यात येत होती. तसेच या आवारातील नारळ, फणस यातूनही उत्पन्न मिळत होते. यातून या बंदींची मजुरी काढून उर्वरित खर्च कारागृहासाठी केला जात असे. या भाज्यांची विक्री कारागृहाबाहेर करण्यात येत होती. सकाळी तीन तासातच या ताज्या भाज्या रत्नागिरीतील नागरिक खरेदी करत.

मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. राज्यात अनेक बंदी बाधित झाले. त्यामुळे शासनाने साध्या कैदींना कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत पॅरोलवर सोडण्याचे आदेश ८ मे २०२० रोजी दिले. हे बंदी गेल्याने आता भाजीपाला उपक्रम सध्या बंद आहे.

विशेष बंदीजनांना सवलत नाही

विशेष बंदीजन ५०

पोक्सो किंवा महिलांविषयक गुन्ह्यातील बंदींना बाहेर सोडले जात नाही. त्याचप्रमाणे त्यांना पॅरोल रजा दिली जात नाही. येथील कारागृहात असे ५० बंदी आहेत. त्यांना सात वर्षांपेक्षा अधिक काळासाठी तुरूंगवास झालेला आहे. त्यामुळे हे कैदी शिक्षा कालावधी पूर्ण होईपर्यंत कारागृहातच राहतात.

गंभीर गुन्ह्यातील १००

दरोडा, खून, हत्या आदी गंभीर गुन्ह्यातील बंदींना न्यायालयाकडून शिक्षा झालेली असते. त्यामुळे हे न्यायाधीन बंदी केवळ शिक्षा भोगण्यासाठी कारागृहात दाखल केलेले असतात. त्यांच्यावर कारागृहाची केवळ निगराणी असते. मात्र, या कैद्यांना पॅरोल रजा मंजूर होत नाही.

पॅरोल नको रे बाबा

पॅरोल म्हणजे पळून जाणार नाही, किंवा ठरलेल्या वेळी परत येईन, असे बंदीने दिलेले अभिवचन. मात्र, काही वेळा बंदी हे अभिवचन न पाळता पळून जातात. त्यामुळे त्यांना शोधून पुन्हा आणण्यासाठी अनेक दिव्य करावे लागते. त्यामुळे पॅरोलवर सोडणे, ही जोखीमच असते.

ज्या बंदींना सात वषार्पेक्षा कमी शिक्षा झालेली असते. अशांना पॅरोल रजा घेते येते. बंदींचे वर्तन चांगले झाले तर त्यांच्या शिक्षेचा कालावधी कमी होतो. त्यांचे वर्तन सुधारावे, या हेतुने राज्यातील कारागृहात या बंदीकडून विविध कामे करून पुनर्वसन केले जाते. कोरोना संसर्ग वाढल्याने राज्य शासनाने साध्या बंदींना पॅरोलवर सोडले आहे. त्यामुळे सध्या कारागृह परिसरातील शेती बंंद आहे.

- अमेय पोतदार, सहायक कारागृह अधीक्षक, रत्नागिरी