शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कोरोना काळात बंदींची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : येथील विशेष कारागृहात शिक्षा बंदीवर असलेल्या बंदीजनांसाठी गेल्या काही वर्षांपासून भाजीपाला लागवडीचा उपक्रम सुरू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : येथील विशेष कारागृहात शिक्षा बंदीवर असलेल्या बंदीजनांसाठी गेल्या काही वर्षांपासून भाजीपाला लागवडीचा उपक्रम सुरू करण्यात आला होता. परंतु, कोरोना काळात शासनाने बंदीजनांच्या दृष्टीने कोरोनाबाबतची खबरदारीची उपाययोजना म्हणून शिक्षेवर असलेल्या बंदीजनांना पॅरोलवर पाठविण्यात आल्याने सध्या केवळ न्यायाधीन शिक्षेवर असलेले बंदीच या कारागृहात आहेत. त्यामुळे सध्या भाजीपाला लागवड करण्यासाठी शिक्षाबंदी असलेले बंदीजन नसल्यानेच कारागृहात होणारी भाजीपाला लागवड बंद ठेवण्यात आली आहे.

रत्नागिरीचे तत्कालीन कारागृह अधीक्षक राजेश देशमुख यांच्या संकल्पनेतून २०१८ सालापासून जे बंदी साध्या शिक्षेवर आहेत, त्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यास सुरूवात झाली होती. माठ, पालक, मिरच्या आदी विविध भाज्यांची तसेच शेतीची लागवड कारागृहाच्या सुमारे ७ एकर जागेत करण्यात येत होती. तसेच या आवारातील नारळ, फणस यातूनही उत्पन्न मिळत होते. यातून या बंदींची मजुरी काढून उर्वरित खर्च कारागृहासाठी केला जात असे. या भाज्यांची विक्री कारागृहाबाहेर करण्यात येत होती. सकाळी तीन तासातच या ताज्या भाज्या रत्नागिरीतील नागरिक खरेदी करत.

मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. राज्यात अनेक बंदी बाधित झाले. त्यामुळे शासनाने साध्या कैदींना कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत पॅरोलवर सोडण्याचे आदेश ८ मे २०२० रोजी दिले. हे बंदी गेल्याने आता भाजीपाला उपक्रम सध्या बंद आहे.

विशेष बंदीजनांना सवलत नाही

विशेष बंदीजन ५०

पोक्सो किंवा महिलांविषयक गुन्ह्यातील बंदींना बाहेर सोडले जात नाही. त्याचप्रमाणे त्यांना पॅरोल रजा दिली जात नाही. येथील कारागृहात असे ५० बंदी आहेत. त्यांना सात वर्षांपेक्षा अधिक काळासाठी तुरूंगवास झालेला आहे. त्यामुळे हे कैदी शिक्षा कालावधी पूर्ण होईपर्यंत कारागृहातच राहतात.

गंभीर गुन्ह्यातील १००

दरोडा, खून, हत्या आदी गंभीर गुन्ह्यातील बंदींना न्यायालयाकडून शिक्षा झालेली असते. त्यामुळे हे न्यायाधीन बंदी केवळ शिक्षा भोगण्यासाठी कारागृहात दाखल केलेले असतात. त्यांच्यावर कारागृहाची केवळ निगराणी असते. मात्र, या कैद्यांना पॅरोल रजा मंजूर होत नाही.

पॅरोल नको रे बाबा

पॅरोल म्हणजे पळून जाणार नाही, किंवा ठरलेल्या वेळी परत येईन, असे बंदीने दिलेले अभिवचन. मात्र, काही वेळा बंदी हे अभिवचन न पाळता पळून जातात. त्यामुळे त्यांना शोधून पुन्हा आणण्यासाठी अनेक दिव्य करावे लागते. त्यामुळे पॅरोलवर सोडणे, ही जोखीमच असते.

ज्या बंदींना सात वषार्पेक्षा कमी शिक्षा झालेली असते. अशांना पॅरोल रजा घेते येते. बंदींचे वर्तन चांगले झाले तर त्यांच्या शिक्षेचा कालावधी कमी होतो. त्यांचे वर्तन सुधारावे, या हेतुने राज्यातील कारागृहात या बंदीकडून विविध कामे करून पुनर्वसन केले जाते. कोरोना संसर्ग वाढल्याने राज्य शासनाने साध्या बंदींना पॅरोलवर सोडले आहे. त्यामुळे सध्या कारागृह परिसरातील शेती बंंद आहे.

- अमेय पोतदार, सहायक कारागृह अधीक्षक, रत्नागिरी