शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात बंदींची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : येथील विशेष कारागृहात शिक्षा बंदीवर असलेल्या बंदीजनांसाठी गेल्या काही वर्षांपासून भाजीपाला लागवडीचा उपक्रम सुरू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : येथील विशेष कारागृहात शिक्षा बंदीवर असलेल्या बंदीजनांसाठी गेल्या काही वर्षांपासून भाजीपाला लागवडीचा उपक्रम सुरू करण्यात आला होता. परंतु, कोरोना काळात शासनाने बंदीजनांच्या दृष्टीने कोरोनाबाबतची खबरदारीची उपाययोजना म्हणून शिक्षेवर असलेल्या बंदीजनांना पॅरोलवर पाठविण्यात आल्याने सध्या केवळ न्यायाधीन शिक्षेवर असलेले बंदीच या कारागृहात आहेत. त्यामुळे सध्या भाजीपाला लागवड करण्यासाठी शिक्षाबंदी असलेले बंदीजन नसल्यानेच कारागृहात होणारी भाजीपाला लागवड बंद ठेवण्यात आली आहे.

रत्नागिरीचे तत्कालीन कारागृह अधीक्षक राजेश देशमुख यांच्या संकल्पनेतून २०१८ सालापासून जे बंदी साध्या शिक्षेवर आहेत, त्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यास सुरूवात झाली होती. माठ, पालक, मिरच्या आदी विविध भाज्यांची तसेच शेतीची लागवड कारागृहाच्या सुमारे ७ एकर जागेत करण्यात येत होती. तसेच या आवारातील नारळ, फणस यातूनही उत्पन्न मिळत होते. यातून या बंदींची मजुरी काढून उर्वरित खर्च कारागृहासाठी केला जात असे. या भाज्यांची विक्री कारागृहाबाहेर करण्यात येत होती. सकाळी तीन तासातच या ताज्या भाज्या रत्नागिरीतील नागरिक खरेदी करत.

मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. राज्यात अनेक बंदी बाधित झाले. त्यामुळे शासनाने साध्या कैदींना कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत पॅरोलवर सोडण्याचे आदेश ८ मे २०२० रोजी दिले. हे बंदी गेल्याने आता भाजीपाला उपक्रम सध्या बंद आहे.

विशेष बंदीजनांना सवलत नाही

विशेष बंदीजन ५०

पोक्सो किंवा महिलांविषयक गुन्ह्यातील बंदींना बाहेर सोडले जात नाही. त्याचप्रमाणे त्यांना पॅरोल रजा दिली जात नाही. येथील कारागृहात असे ५० बंदी आहेत. त्यांना सात वर्षांपेक्षा अधिक काळासाठी तुरूंगवास झालेला आहे. त्यामुळे हे कैदी शिक्षा कालावधी पूर्ण होईपर्यंत कारागृहातच राहतात.

गंभीर गुन्ह्यातील १००

दरोडा, खून, हत्या आदी गंभीर गुन्ह्यातील बंदींना न्यायालयाकडून शिक्षा झालेली असते. त्यामुळे हे न्यायाधीन बंदी केवळ शिक्षा भोगण्यासाठी कारागृहात दाखल केलेले असतात. त्यांच्यावर कारागृहाची केवळ निगराणी असते. मात्र, या कैद्यांना पॅरोल रजा मंजूर होत नाही.

पॅरोल नको रे बाबा

पॅरोल म्हणजे पळून जाणार नाही, किंवा ठरलेल्या वेळी परत येईन, असे बंदीने दिलेले अभिवचन. मात्र, काही वेळा बंदी हे अभिवचन न पाळता पळून जातात. त्यामुळे त्यांना शोधून पुन्हा आणण्यासाठी अनेक दिव्य करावे लागते. त्यामुळे पॅरोलवर सोडणे, ही जोखीमच असते.

ज्या बंदींना सात वषार्पेक्षा कमी शिक्षा झालेली असते. अशांना पॅरोल रजा घेते येते. बंदींचे वर्तन चांगले झाले तर त्यांच्या शिक्षेचा कालावधी कमी होतो. त्यांचे वर्तन सुधारावे, या हेतुने राज्यातील कारागृहात या बंदीकडून विविध कामे करून पुनर्वसन केले जाते. कोरोना संसर्ग वाढल्याने राज्य शासनाने साध्या बंदींना पॅरोलवर सोडले आहे. त्यामुळे सध्या कारागृह परिसरातील शेती बंंद आहे.

- अमेय पोतदार, सहायक कारागृह अधीक्षक, रत्नागिरी