शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
3
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
4
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
5
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
6
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
7
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
8
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
9
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
10
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
11
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
12
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
13
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
14
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
15
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
16
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
17
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
18
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
19
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
20
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर

राज्यातील अंगणवाडी सेविकांवर आता कुपोषणाचे ओझे

By admin | Updated: October 1, 2014 01:06 IST

तीव्र नाराजी : आधीच कामाचा ताण त्यात आणखी एक जबाबदारी

श्रीकांत चाळके / खेडअंगणवाडीतील मुलांचे आरोग्य उत्तम राहावे, याकरिता राज्य सरकारने विविध उपक्रमांचा अवलंब केला आहे. मूठभर धान्य योजनेच्या माध्यमातून या मुलांच्या प्रकृतीला आकार देणे आणि त्याद्वारे कुपोषण टाळणे, हे काम आता अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यात तीव्र नाराजी पसरली आहे.कुपोषणाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सरकारने आता मूठभर धान्य योजना आणली आहे. हे धान्य गावात फिरून या सेविकांनी जमवायचे आहे आणि यापासून पोषण आहार बनवून तो विद्यार्थ्यांना खाण्यास द्यायचा आहे़ ही सारी जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आली आहे, हे कमी म्हणून की काय? गावात ग्रामस्थांच्या बैठका घेऊन कुपोषणाचे दुष्परिणाम समजावून सांगणे आणि त्याविषयी जनजागृती करणे आदी कामे याच सेविकांनी करावयाची आहेत. यामुळे अध्ययनाच्या कामाकडे दुर्लक्ष होणार होत आहे़ या मुलांच्या अध्ययनाची आणि परिपक्वतेची जबाबदारी सरकारने घ्यावी, असा सूर अंगणवाडी सेविकांमधून आळवला जात आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य सुरक्षा कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याच्या २८३१ अंगणवाड्यांतील बालकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येते. जिल्ह्यात ० ते ६ वर्षे वयोगटातील १ लाख ५ हजार २७४ बालके आहेत. त्यातील ३१६ बालके कुपोषित असल्याचे समोर आले आहे. खेडमध्ये तर हे प्रमाण अवघे १ आहे़ जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने कुपोषणाचे हे प्रमाण अत्यल्प असले तरी चिंताजनक आहे़ आवश्यक कॅलरीज आणि पोषक तत्व यांची निरंतर कमतरता किंवा असंतुलन यामुळे मुले कुपोषित राहतात. कमी वजनाची मुले जन्माला येणे, आहार व संगोपनाच्या चुकीच्या पध्दती, अतिसार, न्यूमोनिया, रक्तात लोहाची कमतरता, अ जीवनसत्त्वाची कमतरता, अपूर्ण लसीकरण आणि जंत ही कुपोषणाची प्रमुख कारणे आहेत.प्रकृतीने अशक्त असलेल्या मुलांना पोषक पदार्थ सध्या अंगणवाड्यांमधून पुरविले जात आहेत़ तसेच संबंधित मुलांची तपासणीही तज्ज्ञांकडून केली जाते़ या मुलांसाठी हवा तितका खाऊदेखील अंगणवाडीमध्ये ठेवण्यात आला आहे. आता यामध्ये मूठभर धान्य योजनेची भर पडली आहे़ या योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकांनी गावात जाऊन धान्य जमा करायचे आहे़ या जमा झालेल्या धान्याचे वेगवेगळे पदार्थ तयार करून ते मुलांना खायला द्यायचे आहेत. याची विविध प्रात्यक्षिकेही ग्रामस्थांना वेळोवेळी दाखवायची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर पडली आहे़ दिवसभर या सेविकांना मुलांच्या खाद्याच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करावे लागणार असून, अध्ययनाच्या कामाकडेही दुर्लक्ष होत आहे. मूठभर धान्य योजनेच्या अंमलबजावणीमध्ये ग्रामस्थांमध्ये अद्याप संभ्रम आहे. बहुतांश गावांमध्ये गटतटाचे राजकारण असल्याने किती ग्रामस्थांकडून योजना अंमलबजावणीमध्ये सहकार्य मिळते, त्यावरच योजनेचे भवितव्य अवलंबून आहे. (प्रतिनिधी)