शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

राज्यातील अंगणवाडी सेविकांवर आता कुपोषणाचे ओझे

By admin | Updated: October 1, 2014 01:06 IST

तीव्र नाराजी : आधीच कामाचा ताण त्यात आणखी एक जबाबदारी

श्रीकांत चाळके / खेडअंगणवाडीतील मुलांचे आरोग्य उत्तम राहावे, याकरिता राज्य सरकारने विविध उपक्रमांचा अवलंब केला आहे. मूठभर धान्य योजनेच्या माध्यमातून या मुलांच्या प्रकृतीला आकार देणे आणि त्याद्वारे कुपोषण टाळणे, हे काम आता अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यात तीव्र नाराजी पसरली आहे.कुपोषणाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सरकारने आता मूठभर धान्य योजना आणली आहे. हे धान्य गावात फिरून या सेविकांनी जमवायचे आहे आणि यापासून पोषण आहार बनवून तो विद्यार्थ्यांना खाण्यास द्यायचा आहे़ ही सारी जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आली आहे, हे कमी म्हणून की काय? गावात ग्रामस्थांच्या बैठका घेऊन कुपोषणाचे दुष्परिणाम समजावून सांगणे आणि त्याविषयी जनजागृती करणे आदी कामे याच सेविकांनी करावयाची आहेत. यामुळे अध्ययनाच्या कामाकडे दुर्लक्ष होणार होत आहे़ या मुलांच्या अध्ययनाची आणि परिपक्वतेची जबाबदारी सरकारने घ्यावी, असा सूर अंगणवाडी सेविकांमधून आळवला जात आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य सुरक्षा कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याच्या २८३१ अंगणवाड्यांतील बालकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येते. जिल्ह्यात ० ते ६ वर्षे वयोगटातील १ लाख ५ हजार २७४ बालके आहेत. त्यातील ३१६ बालके कुपोषित असल्याचे समोर आले आहे. खेडमध्ये तर हे प्रमाण अवघे १ आहे़ जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने कुपोषणाचे हे प्रमाण अत्यल्प असले तरी चिंताजनक आहे़ आवश्यक कॅलरीज आणि पोषक तत्व यांची निरंतर कमतरता किंवा असंतुलन यामुळे मुले कुपोषित राहतात. कमी वजनाची मुले जन्माला येणे, आहार व संगोपनाच्या चुकीच्या पध्दती, अतिसार, न्यूमोनिया, रक्तात लोहाची कमतरता, अ जीवनसत्त्वाची कमतरता, अपूर्ण लसीकरण आणि जंत ही कुपोषणाची प्रमुख कारणे आहेत.प्रकृतीने अशक्त असलेल्या मुलांना पोषक पदार्थ सध्या अंगणवाड्यांमधून पुरविले जात आहेत़ तसेच संबंधित मुलांची तपासणीही तज्ज्ञांकडून केली जाते़ या मुलांसाठी हवा तितका खाऊदेखील अंगणवाडीमध्ये ठेवण्यात आला आहे. आता यामध्ये मूठभर धान्य योजनेची भर पडली आहे़ या योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकांनी गावात जाऊन धान्य जमा करायचे आहे़ या जमा झालेल्या धान्याचे वेगवेगळे पदार्थ तयार करून ते मुलांना खायला द्यायचे आहेत. याची विविध प्रात्यक्षिकेही ग्रामस्थांना वेळोवेळी दाखवायची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर पडली आहे़ दिवसभर या सेविकांना मुलांच्या खाद्याच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करावे लागणार असून, अध्ययनाच्या कामाकडेही दुर्लक्ष होत आहे. मूठभर धान्य योजनेच्या अंमलबजावणीमध्ये ग्रामस्थांमध्ये अद्याप संभ्रम आहे. बहुतांश गावांमध्ये गटतटाचे राजकारण असल्याने किती ग्रामस्थांकडून योजना अंमलबजावणीमध्ये सहकार्य मिळते, त्यावरच योजनेचे भवितव्य अवलंबून आहे. (प्रतिनिधी)