शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

राज्यातील अंगणवाडी सेविकांवर आता कुपोषणाचे ओझे

By admin | Updated: October 1, 2014 01:06 IST

तीव्र नाराजी : आधीच कामाचा ताण त्यात आणखी एक जबाबदारी

श्रीकांत चाळके / खेडअंगणवाडीतील मुलांचे आरोग्य उत्तम राहावे, याकरिता राज्य सरकारने विविध उपक्रमांचा अवलंब केला आहे. मूठभर धान्य योजनेच्या माध्यमातून या मुलांच्या प्रकृतीला आकार देणे आणि त्याद्वारे कुपोषण टाळणे, हे काम आता अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यात तीव्र नाराजी पसरली आहे.कुपोषणाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सरकारने आता मूठभर धान्य योजना आणली आहे. हे धान्य गावात फिरून या सेविकांनी जमवायचे आहे आणि यापासून पोषण आहार बनवून तो विद्यार्थ्यांना खाण्यास द्यायचा आहे़ ही सारी जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आली आहे, हे कमी म्हणून की काय? गावात ग्रामस्थांच्या बैठका घेऊन कुपोषणाचे दुष्परिणाम समजावून सांगणे आणि त्याविषयी जनजागृती करणे आदी कामे याच सेविकांनी करावयाची आहेत. यामुळे अध्ययनाच्या कामाकडे दुर्लक्ष होणार होत आहे़ या मुलांच्या अध्ययनाची आणि परिपक्वतेची जबाबदारी सरकारने घ्यावी, असा सूर अंगणवाडी सेविकांमधून आळवला जात आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य सुरक्षा कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याच्या २८३१ अंगणवाड्यांतील बालकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येते. जिल्ह्यात ० ते ६ वर्षे वयोगटातील १ लाख ५ हजार २७४ बालके आहेत. त्यातील ३१६ बालके कुपोषित असल्याचे समोर आले आहे. खेडमध्ये तर हे प्रमाण अवघे १ आहे़ जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने कुपोषणाचे हे प्रमाण अत्यल्प असले तरी चिंताजनक आहे़ आवश्यक कॅलरीज आणि पोषक तत्व यांची निरंतर कमतरता किंवा असंतुलन यामुळे मुले कुपोषित राहतात. कमी वजनाची मुले जन्माला येणे, आहार व संगोपनाच्या चुकीच्या पध्दती, अतिसार, न्यूमोनिया, रक्तात लोहाची कमतरता, अ जीवनसत्त्वाची कमतरता, अपूर्ण लसीकरण आणि जंत ही कुपोषणाची प्रमुख कारणे आहेत.प्रकृतीने अशक्त असलेल्या मुलांना पोषक पदार्थ सध्या अंगणवाड्यांमधून पुरविले जात आहेत़ तसेच संबंधित मुलांची तपासणीही तज्ज्ञांकडून केली जाते़ या मुलांसाठी हवा तितका खाऊदेखील अंगणवाडीमध्ये ठेवण्यात आला आहे. आता यामध्ये मूठभर धान्य योजनेची भर पडली आहे़ या योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकांनी गावात जाऊन धान्य जमा करायचे आहे़ या जमा झालेल्या धान्याचे वेगवेगळे पदार्थ तयार करून ते मुलांना खायला द्यायचे आहेत. याची विविध प्रात्यक्षिकेही ग्रामस्थांना वेळोवेळी दाखवायची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर पडली आहे़ दिवसभर या सेविकांना मुलांच्या खाद्याच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करावे लागणार असून, अध्ययनाच्या कामाकडेही दुर्लक्ष होत आहे. मूठभर धान्य योजनेच्या अंमलबजावणीमध्ये ग्रामस्थांमध्ये अद्याप संभ्रम आहे. बहुतांश गावांमध्ये गटतटाचे राजकारण असल्याने किती ग्रामस्थांकडून योजना अंमलबजावणीमध्ये सहकार्य मिळते, त्यावरच योजनेचे भवितव्य अवलंबून आहे. (प्रतिनिधी)