शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

सच्चेपणाला किंमतच नाही?

By admin | Updated: October 12, 2014 00:52 IST

निष्ठावानांची गोची: शिवसैनिकांमधून उमटत आहेत तीव्र प्रतिक्रिया

रत्नागिरी : काल-परवा ज्यांनी ‘जातीयवादी’ पक्ष म्हणून हिणवले, ज्यांनी केवळ विरोधी पक्ष आहे म्हणून प्रत्येक उपक्रमावर टीकास्त्र सोडले, त्यांना केवळ पक्षप्रवेश करताच आमदारकीची आॅफर आणि निष्ठावंतांच्या पाठीत लाथ, हा न्याय कोणता, असा सवाल आता शिवसेनेतूनच केला जात आहे. माजी राज्यमंत्री उदय सामंत आणि त्यांच्या राष्ट्रवादीतील फौजेच्या शिवसेना प्रवेशानंतर शिवसेनेतील निष्ठावान कार्यकर्त्यांची गोची झाली असल्याच्या प्रतिक्रिया शिवसैनिकांमधून उमटत आहेत.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी ज्यांचे भावनिक नाते जुळले होते आणि ज्यांनी त्यांची हयात शिवसेनेसाठी घालवली त्यांना मागे सारुन दुसऱ्या पक्षातून आयात केलेल्या उमेदवाराला थेट ‘खुर्चीची’ आॅफर दिल्याबद्दल सेनेतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.शिवसेनेतील एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने लोकमतशी आपल्या भावना व्यक्त करताना आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पक्षांतराने ज्या उमेदवाराला उमेदवारी मिळाली व त्यांच्याबरोबर जी काही प्यादी शिवसेनेत आली, त्यांचे पारडे आता जड झाले आहे, आम्ही मात्र चार पावले दूर गेलो आहोत. निदान आमची मतं तरी जाणून घ्यायला हवी होती, अशी प्रतिक्रिया या कार्यकर्त्याने दिली आहे.ज्या हेतूने आणि ज्या निष्ठेवर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची उभारणी केली आहे, त्यालाच आता हरताळ फासला जात आहे. सामंत यांच्यासोबत असलेली मोठी फौज ही शिवसेनेसाठी कायमचे दुखणे होऊ शकते. ज्यांच्यावर अनेक आरोप आहेत आणि त्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त शिवसेनेनेच केले आहेत, त्यांना आता शिवसेनाच आपल्यात सामावून घेते आणि निष्ठावानांना दूर सारते, हा कुठला न्याय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या निवडणुकीत सेनेचा विजय झाला तर केवळ उमेदवार विजयी होईल आणि त्यांचे समर्थक मोठे होतील, पण सामान्य कार्यकर्त्यांचे काय? असा प्रश्न या कार्यकर्त्याने केला. त्यामुळे वरकरणी सारं आलबेल असलं तरीही ‘अंदर की बात कुठ और है’, असंच चित्र सध्या दिसत आहे. (प्रतिनिधी)४एकनिष्ठ शिवसैनिकांचा सवाल४सामंतांच्या उमेदवारीमुळे निष्ठावानांना धक्का४थेट खुर्चीची आॅफर दिल्याने सेनेत तीव्र प्रतिक्रिया ४निष्ठेला फासला जातोय हरताळ ४अंदर की बात कुछ और...४ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडून तीव्र भावना ४प्रवेशांनतरचे कवित्व सुरूच...४काय घडणार याकडे लक्षकोणता झेंडा घेऊ हाती?बाळ माने यांना विधानसभा निवडणुकीत दोनवेळा पराभव पत्करावा लागला, तो पराभव का झाला, हे भाजपपेक्षा जास्त शिवसेनेला माहिती आहे. पण तरीही त्यांनी पक्षत्याग केला नाही. उलट ते त्याच पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्य करत राहिले. त्यामुळे आता ‘कोणता झेंडा घेऊ हाती?’ असा सवाल तेकरीत आहेत.