शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

सच्चेपणाला किंमतच नाही?

By admin | Updated: October 12, 2014 00:52 IST

निष्ठावानांची गोची: शिवसैनिकांमधून उमटत आहेत तीव्र प्रतिक्रिया

रत्नागिरी : काल-परवा ज्यांनी ‘जातीयवादी’ पक्ष म्हणून हिणवले, ज्यांनी केवळ विरोधी पक्ष आहे म्हणून प्रत्येक उपक्रमावर टीकास्त्र सोडले, त्यांना केवळ पक्षप्रवेश करताच आमदारकीची आॅफर आणि निष्ठावंतांच्या पाठीत लाथ, हा न्याय कोणता, असा सवाल आता शिवसेनेतूनच केला जात आहे. माजी राज्यमंत्री उदय सामंत आणि त्यांच्या राष्ट्रवादीतील फौजेच्या शिवसेना प्रवेशानंतर शिवसेनेतील निष्ठावान कार्यकर्त्यांची गोची झाली असल्याच्या प्रतिक्रिया शिवसैनिकांमधून उमटत आहेत.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी ज्यांचे भावनिक नाते जुळले होते आणि ज्यांनी त्यांची हयात शिवसेनेसाठी घालवली त्यांना मागे सारुन दुसऱ्या पक्षातून आयात केलेल्या उमेदवाराला थेट ‘खुर्चीची’ आॅफर दिल्याबद्दल सेनेतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.शिवसेनेतील एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने लोकमतशी आपल्या भावना व्यक्त करताना आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पक्षांतराने ज्या उमेदवाराला उमेदवारी मिळाली व त्यांच्याबरोबर जी काही प्यादी शिवसेनेत आली, त्यांचे पारडे आता जड झाले आहे, आम्ही मात्र चार पावले दूर गेलो आहोत. निदान आमची मतं तरी जाणून घ्यायला हवी होती, अशी प्रतिक्रिया या कार्यकर्त्याने दिली आहे.ज्या हेतूने आणि ज्या निष्ठेवर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची उभारणी केली आहे, त्यालाच आता हरताळ फासला जात आहे. सामंत यांच्यासोबत असलेली मोठी फौज ही शिवसेनेसाठी कायमचे दुखणे होऊ शकते. ज्यांच्यावर अनेक आरोप आहेत आणि त्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त शिवसेनेनेच केले आहेत, त्यांना आता शिवसेनाच आपल्यात सामावून घेते आणि निष्ठावानांना दूर सारते, हा कुठला न्याय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या निवडणुकीत सेनेचा विजय झाला तर केवळ उमेदवार विजयी होईल आणि त्यांचे समर्थक मोठे होतील, पण सामान्य कार्यकर्त्यांचे काय? असा प्रश्न या कार्यकर्त्याने केला. त्यामुळे वरकरणी सारं आलबेल असलं तरीही ‘अंदर की बात कुठ और है’, असंच चित्र सध्या दिसत आहे. (प्रतिनिधी)४एकनिष्ठ शिवसैनिकांचा सवाल४सामंतांच्या उमेदवारीमुळे निष्ठावानांना धक्का४थेट खुर्चीची आॅफर दिल्याने सेनेत तीव्र प्रतिक्रिया ४निष्ठेला फासला जातोय हरताळ ४अंदर की बात कुछ और...४ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडून तीव्र भावना ४प्रवेशांनतरचे कवित्व सुरूच...४काय घडणार याकडे लक्षकोणता झेंडा घेऊ हाती?बाळ माने यांना विधानसभा निवडणुकीत दोनवेळा पराभव पत्करावा लागला, तो पराभव का झाला, हे भाजपपेक्षा जास्त शिवसेनेला माहिती आहे. पण तरीही त्यांनी पक्षत्याग केला नाही. उलट ते त्याच पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्य करत राहिले. त्यामुळे आता ‘कोणता झेंडा घेऊ हाती?’ असा सवाल तेकरीत आहेत.