शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

समिती नसल्याने निराधार वाऱ्यावर

By admin | Updated: February 10, 2015 00:05 IST

रत्नागिरी तालुका : ३४ अपंगांसह ४० विधवांना मिळाला आधार

रत्नागिरी : संजय गांधी निराधार योजनेच्या विविध १६३ प्रस्तावांना प्रांताधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाली असून, तालुक्यातील ३४ अपंगांना आणि ४० निराधार महिलांना या योजनांचा लाभ मिळाला आहे. नव्या पालकमंत्र्यांची निवड झाली असली तरी अजूनही या योजनेच्या समितीचा पत्ताच नाही. समिती स्थापनेला बहुधा मार्चनंतर मुहूर्त मिळेल, असा कयास व्यक्त केला जात आहे.विशेष योजनांतर्गत निराधार घटकांसाठी संजय गांधी निराधार योजना विभागातर्फे मासिक लाभाच्या योजना राबविण्यात येतात. त्यात संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना या दोन राज्य सरकारच्या, तर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन योजना आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना या केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येतात. या योजनांतर्गत लाभार्थीला दरमहा ६०० रूपये अनुदान देण्यात येते, तर राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत कमावत्या व्यक्तिचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला किंवा त्याच्या वारसाला एकरकमी १०,००० रूपये इतके अर्थसहाय देण्यात येते.योजनेचे प्रस्ताव निवडीसाठी पालकमंत्र्यांच्या शिफारशीने तालुकास्तरावर समिती स्थापन करण्यात येते. ही निवड जिल्हाधिकारी करतात. गतवर्षीची समिती पालकमंत्री बदलल्याने बरखास्त करण्यात आली आहे. नवे पालकमंत्री म्हणून रवींद्र वायकर यांची निवड झाली असली तरी अद्याप नवीन समिती स्थापन करण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या प्रस्ताव मंजुरीचे अधिकार संबंधित प्रांताधिकाऱ्यांना दिलेले आहेत. दर तीन महिन्यांनी होणाऱ्या समितीच्या बैठकीत प्रस्तावांची निवड केली जाते.तालुक्यातील प्रस्तावांना मंजुरी देण्यासाठी यावेळी प्रांताधिकाऱ्यांच्या त्रीसदस्यीय समितीसमोर विविध योजनांचे १६५ प्रस्ताव सादर करण्यात आले. त्यापैकी १६३ प्रस्तावांना मंजुरी मिळाली, तर दोन प्रस्तावांमध्ये त्रुटी असल्याने ते पुन्हा सादर करण्यास सांगण्यात आले.एकूण प्रस्तावांपैकी संजय गांधी निराधार योजनेच्या तालुक्यातील तब्बल ८५ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजनेंतर्गत ८ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेचे (दारिद्र्यरेषेच्या यादीत असलेले) १४, तर दारिद्र्यरेषेच्या यादीत नसलेले ५७ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन योजनेचा एक अशा एकूण १६३ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.निराधार घटकांसाठी या विविध योजनांचा लाभ ग्रामीण भागातील निराधारांना मिळवून देण्यासाठी समाजातून प्रयत्न व्हावा, असे आवाहन संजय गांधी निराधार योजना विभागातर्फे करण्यात आले आहे. लवकरच अशा समित्या पुनर्रर्नियुक्त होतील एसो प्रयत््न आ्हेत. (प्रतिनिधी)संजय गांधी निराधार योजनातालुक्यातील तब्बल प्रस्ताव मंजूर.इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन प्रस्ताव.दारिद्र्यरेषेच्या यादीत असलेले श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन प्रस्ताव श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन प्रस्ताव दारिद्र्यरेषेच्या यादीत नसलेले.इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन योजनेचा प्रस्ताव.