शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

काेराेना राेखणाऱ्या पाेलिसांना ना पीपीई कीट, ना वैद्यकीय संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:22 IST

राजापूर : काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी दिवस - रात्र काम करणाऱ्या पाेलिसांनाच विविध समस्यांना सामाेरे जावे लागत असल्याचे विदारक चित्र ...

राजापूर : काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी दिवस - रात्र काम करणाऱ्या पाेलिसांनाच विविध समस्यांना सामाेरे जावे लागत असल्याचे विदारक चित्र समाेर आले आहे. काेराेनाच्या काळात काम करणाऱ्या पाेलिसांना ना पीपीई कीट देण्यात आले आहेत, ना वैद्यकीय संरक्षण देण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर एखाद्या पाेलिसाचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्यास, त्याच्यावर स्वखर्चाने उपचार करण्याची वेळ येत आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील पोलीस दलावर दुकाने बंद करणे, त्यासाठी कारवाई करणे, विनामास्क नागरिकांवर कारवाई करणे अशी कामे सोपवली आहेत. हे कमी म्हणून की काय, आता प्रत्येक पोलीस स्थानकाला पोलिसांनी ग्रामदत्तक योजनेच्या नावाखाली लोकांच्या घरोघरी जाऊन ऑक्सिजन पातळी, तापमान तपासणी करण्याचे काम लादण्यात आले आहे. हे काम सोपविल्यानंतर यात भर म्हणून नव्याने लोकांची अँटिजन तपासणी करण्याचे कामही पोलिसांवर सोपविण्यात आले आहे. मात्र, ही कामे करताना पोलिसांना पीपीई कीट पुरवण्यात आलेली नाहीत, शिवाय प्रत्येक गावात पोलिसांना आपल्या खासगी वाहनांनी जावे लागत असल्याने, पेट्रोलचा खर्च खिशातून करावा लागत आहे. बारा तासांच्या वरील प्रवासाकरिता प्रवास भत्ता देण्याची तरतूद असल्याने पेट्रोलचा खर्च मिळत नसल्याने तुटपुंज्या पगारात पोलिसांना मोठी यातायात करावी लागत आहे.

ही कामे करताना एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर त्याला वैद्यकीय उपचारांच्या संरक्षणाचे कवच देखील नाही. त्यामुळे आपली संघटना नसल्यामुळे जबरदस्तीने लादण्यात येणाऱ्या या अतिरिक्त कामांमुळे अनेक पोलिसांचे मानसिक व शारीरिक आरोग्य ढासळल्याचा सूर ऐकू येत आहे. इतर जिल्ह्यात अशी कामे पोलिसांना करावी लागत नसताना, केवळ रत्नागिरी जिल्ह्यातच अशी कामे पोलिसांवर लादण्यात येत असल्याची कुजबूज सुरू आहे. यामागील कारण हे जिल्हा परिषदेशी निगडित असल्याची चर्चा सुरू आहे.