शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

काेराेना राेखणाऱ्या पाेलिसांना ना पीपीई कीट, ना वैद्यकीय संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:22 IST

राजापूर : काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी दिवस - रात्र काम करणाऱ्या पाेलिसांनाच विविध समस्यांना सामाेरे जावे लागत असल्याचे विदारक चित्र ...

राजापूर : काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी दिवस - रात्र काम करणाऱ्या पाेलिसांनाच विविध समस्यांना सामाेरे जावे लागत असल्याचे विदारक चित्र समाेर आले आहे. काेराेनाच्या काळात काम करणाऱ्या पाेलिसांना ना पीपीई कीट देण्यात आले आहेत, ना वैद्यकीय संरक्षण देण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर एखाद्या पाेलिसाचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्यास, त्याच्यावर स्वखर्चाने उपचार करण्याची वेळ येत आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील पोलीस दलावर दुकाने बंद करणे, त्यासाठी कारवाई करणे, विनामास्क नागरिकांवर कारवाई करणे अशी कामे सोपवली आहेत. हे कमी म्हणून की काय, आता प्रत्येक पोलीस स्थानकाला पोलिसांनी ग्रामदत्तक योजनेच्या नावाखाली लोकांच्या घरोघरी जाऊन ऑक्सिजन पातळी, तापमान तपासणी करण्याचे काम लादण्यात आले आहे. हे काम सोपविल्यानंतर यात भर म्हणून नव्याने लोकांची अँटिजन तपासणी करण्याचे कामही पोलिसांवर सोपविण्यात आले आहे. मात्र, ही कामे करताना पोलिसांना पीपीई कीट पुरवण्यात आलेली नाहीत, शिवाय प्रत्येक गावात पोलिसांना आपल्या खासगी वाहनांनी जावे लागत असल्याने, पेट्रोलचा खर्च खिशातून करावा लागत आहे. बारा तासांच्या वरील प्रवासाकरिता प्रवास भत्ता देण्याची तरतूद असल्याने पेट्रोलचा खर्च मिळत नसल्याने तुटपुंज्या पगारात पोलिसांना मोठी यातायात करावी लागत आहे.

ही कामे करताना एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर त्याला वैद्यकीय उपचारांच्या संरक्षणाचे कवच देखील नाही. त्यामुळे आपली संघटना नसल्यामुळे जबरदस्तीने लादण्यात येणाऱ्या या अतिरिक्त कामांमुळे अनेक पोलिसांचे मानसिक व शारीरिक आरोग्य ढासळल्याचा सूर ऐकू येत आहे. इतर जिल्ह्यात अशी कामे पोलिसांना करावी लागत नसताना, केवळ रत्नागिरी जिल्ह्यातच अशी कामे पोलिसांवर लादण्यात येत असल्याची कुजबूज सुरू आहे. यामागील कारण हे जिल्हा परिषदेशी निगडित असल्याची चर्चा सुरू आहे.