शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
4
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
5
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
6
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
7
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
8
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
9
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू
10
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
11
Rahul Gandhi: "मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
12
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
13
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
14
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
15
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
16
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
17
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
19
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
20
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर

अंगणवाड्यांत पटसंख्या नाही, आहार जातो कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 23:48 IST

चिपळूण : तालुक्यातील काही गावांमध्ये अंगणवाड्यांची स्थिती बिकट आहे. तर काही अंगणवाड्यांमध्ये गेले वर्षभर मुलेच नाहीत. काही अंगणवाड्यांमध्ये मुलांची ...

चिपळूण : तालुक्यातील काही गावांमध्ये अंगणवाड्यांची स्थिती बिकट आहे. तर काही अंगणवाड्यांमध्ये गेले वर्षभर मुलेच नाहीत. काही अंगणवाड्यांमध्ये मुलांची पटसंख्या कमी आहे. त्यामुळे या अंगणवाड्यांना दिला जाणारा पोषण आहार जातो कुठे, असा सवाल पंचायत समिती सदस्या धनश्री शिंदे यांनी शुक्रवारी झालेल्या मासिक सभेत उपस्थित केला.चिपळूण पंचायत समितीची मासिक सभा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सभापती पूजा निकम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत प्रारंभी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांची निवड झाल्याबद्दल सर्वानुमते त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. त्यानंतर मागील सभेचे इतिवृत्त वाचन करण्यात आले.या सभेला चिपळूण आगाराचे अधिकारी व राष्टÑीय महामार्ग विभागाचे अधिकारी अनुपस्थित राहिल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली. एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत या विभागाचा आढावा घेण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्या शिंदे यांनी सांगितले की, चिपळूण तालुक्यातील एक-दोन अंगणवाड्यांमध्ये मुलेच नाहीत तर काही अंगणवाड्यांमध्ये मुलांची पटसंख्या कमी आहे. त्यामुळे या अंगणवाड्या चालू ठेवाव्यात की बंद कराव्यात, असा सवाल केला. यावर सभापती पूजा निकम व गटविकास अधिकारी यांनी सांगितले की, ज्या अंगणवाड्यांमध्ये मुले व पटसंख्या कमी आहेत अशा अंगणवाड्यांना भेट देऊन सर्वेक्षण करावे, अशा सूचना यावेळी दिल्या.आॅगस्ट महिन्यामध्ये पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेमार्फत शंभर टक्के अनुदानावर चवळी व हरभरा बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचे वाटप सध्या सुरू आहे. तसेच तालुक्यातील भातशेतीचे पंचनामे पूर्ण झाले असून, लाभार्थ्यांचे खाते क्रमांक घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती कृषी अधिकारी एस. जी. जानवलकर यांनी दिली.योजना मंजूर पण पाणी कुठे आहे?चिपळूण तालुक्यातील तिवरे गावातील नळपाणी योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. मात्र, गावात पाणी आहे कुठे, असा सवाल सदस्य नितीन ठसाळे यांनी केला.वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती जाधव यांनी डिसेंबर महिन्यात राबविण्यात येणारी मिशन इंद्रधनुष्य मोहीम २ डिसेंबरपासून तीन टप्प्यात सुरू होणार असल्याचे सांगितले. त्याचे नियोजन करण्यात आले असून, ० ते २ वर्ष वयोगटातील बालके लसीकरणापासून वंचित राहू नयेत यासाठी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याचे काटेकोर नियोजन झाल्याचेही त्यांनी सांगितले.