शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

कोकणात पुन्हा दरड कोसळून कोणाचा जीव जाऊ नये : रामदास कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:29 IST

खेड : कोकणात दरडी कोसळून पुन्हा कोणाचा जीव जाऊ नये, यासाठी सरकारने सर्वेक्षण करावे, अशी मागणी शिवसेना नेते रामदास ...

खेड : कोकणात दरडी कोसळून पुन्हा कोणाचा जीव जाऊ नये, यासाठी सरकारने सर्वेक्षण करावे, अशी मागणी शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली आहे. खेड येथे त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.

माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी खेड सभापती निवास येथे पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, संपूर्ण कोकण या पावसात उद्ध्वस्त झालं आहे. डोंगर खचले आहेत, घरांवर दरड कोसळून माणसे मेली आहेत. परिस्थिती स्थिर करण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. खेड व चिपळूणमध्ये व्यापाऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. मी स्वतः मुख्यमंत्री उद्धवजी यांच्यासोबत याबाबत बोलणार आहे. त्यांनी स्वतः लक्ष घालून ज्याप्रमाणे २००५मध्ये मदत दिली, त्याच प्रकारे पूरग्रस्त, दरडग्रस्त यांना तातडीने मदत देण्याची विनंती करणार आहे. हा निसर्गाचा प्रकोप आहे. मानवी चुकांमुळे हे घडले नसले तरी आता शासनाने संपूर्ण कोकणचे सर्वेक्षण करून दरड कोसळण्याच्या संभाव्य ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी नियोजन करावे, अशी मागणी मी शासनाकडे करत आहे. ज्यामुळे भविष्यात दरड कोसळून कोणाचा जीव जाणार नाही, असे ते म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार योगेश कदम, जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम, माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख विजय जाधव उपस्थित होते.