शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कोकणात पुन्हा दरड कोसळून कोणाचा जीव जाऊ नये : रामदास कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:29 IST

खेड : कोकणात दरडी कोसळून पुन्हा कोणाचा जीव जाऊ नये, यासाठी सरकारने सर्वेक्षण करावे, अशी मागणी शिवसेना नेते रामदास ...

खेड : कोकणात दरडी कोसळून पुन्हा कोणाचा जीव जाऊ नये, यासाठी सरकारने सर्वेक्षण करावे, अशी मागणी शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली आहे. खेड येथे त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.

माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी खेड सभापती निवास येथे पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, संपूर्ण कोकण या पावसात उद्ध्वस्त झालं आहे. डोंगर खचले आहेत, घरांवर दरड कोसळून माणसे मेली आहेत. परिस्थिती स्थिर करण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. खेड व चिपळूणमध्ये व्यापाऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. मी स्वतः मुख्यमंत्री उद्धवजी यांच्यासोबत याबाबत बोलणार आहे. त्यांनी स्वतः लक्ष घालून ज्याप्रमाणे २००५मध्ये मदत दिली, त्याच प्रकारे पूरग्रस्त, दरडग्रस्त यांना तातडीने मदत देण्याची विनंती करणार आहे. हा निसर्गाचा प्रकोप आहे. मानवी चुकांमुळे हे घडले नसले तरी आता शासनाने संपूर्ण कोकणचे सर्वेक्षण करून दरड कोसळण्याच्या संभाव्य ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी नियोजन करावे, अशी मागणी मी शासनाकडे करत आहे. ज्यामुळे भविष्यात दरड कोसळून कोणाचा जीव जाणार नाही, असे ते म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार योगेश कदम, जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम, माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख विजय जाधव उपस्थित होते.