शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

यापुढे एकालाही वाळीत टाकायचं नाही...

By admin | Updated: February 8, 2015 01:03 IST

बहिष्कार प्रथेवर बहिष्कार : आडेपाडलेत १९ गावांची बैठक, आज अंनिसची महाडमध्ये ऐतिहासिक परिषद

शिवाजी गोरे ल्ल दापोली अंधश्रध्दा निर्मूलन समितीने केलेली सुरूवात आणि त्याला ‘लोकमत’ने दिलेली साथ यामुळे सामाजिक बहिष्काराच्या एका प्रकरणाला सकारात्मक अंतिम स्वरूप आले. आता कोणालाही वाळीत टाकायची अनिष्ट प्रथा यापुढे कायमची बंद करायची, असा निर्णय तालुक्यातील आडे येथील १९ गावांच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, जात पंचायतीविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एल्गार पुकारला असून, उद्या रविवारी महाड येथे होणाऱ्या सभेकरिता कोकणातून १०० हून अधिक वाळीत प्रकरणे चर्चेला येणार आहेत. जात पंचायतीची आडे गटाची १९ गावांची वार्षिक बैठक शुक्रवारी आडे- पाडले येथे झाली. या बैठकीला १९ गावांतील पदाधिकारी उपस्थित होते. आडे गट अध्यक्ष सुरेश म्हादोकर, उपाध्यक्ष नरेंद्र आगे्र, सेक्रेटरी जगदीश कलमकर या पदाधिकाऱ्यांनी जात पंचायतीच्या वार्षिक सभेत समाज प्रबोधनाचे काम केले. समाजहितासाठी सर्वांनी एकत्र यावे. वाळीत प्रकरणाची गंभीर दखल जात पंचायतीने घेतली आहे. यापुढील काळात गावातील एकही कुटुंब वाळीत राहणार नाही, यासाठी प्रयत्न करण्यावर भर दिला जाईल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. आता या गटातील एखाद्या गावात कोणी बहिष्कृत असेल तर तेथील बहिष्कार मागे घेण्याचेही निश्चित करण्यात आले. लोणवडी गावातील मोहन रांगले यांना काही क्षुल्लक कारणावरून गावाने १५ वर्षांपूर्वी वाळीत टाकले होते. वाळीत प्रकरणाच्या सामाजिक बहिष्काराची अंनिसच्या मुक्ता दाभोलकर व अनिस पटवर्धन यांनी दखल घेतली. हे प्रकरण अंनिस व दापोली पोलिसांकडे आल्यानंतर ‘लोकमत’ने या प्रकरणाला वाचा फोडण्याचे काम केले. हे प्रकरण दापोली पोलिसात दाखल झाल्यावर वाळीत कुटुंबाची बाजू ‘लोकमत’ने मांडली. अखेर २२ जानेवारी रोजी दापोलीचे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी पीडित कुटुंब व ग्रामस्थ यांना पोलीस स्थानकामध्ये बोलावून तोडगा काढला. वाळीत कुटुंबाला ‘लोकमत’च्या सडेतोड वृत्तामुळे १५ वर्षांनी न्याय मिळाला. जात पंचायतीने आडे गटातील सभेत वाळीत प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आडे, पाडले, लोणवडी, माळवी, येळणे, वाघिवणे, बोरथळ, चाचवल, आंजर्ले, मुर्डी, केळशी, आतगाव, रोवले, आंबवली, उंबरशेत या गावातील वाळीत प्रकरणे संपवण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत समाजहिताचे अनेक निर्णय घेण्यात आले. आजही अनेक गावात वाळीत टाकण्याची अनेक प्रकरणे आहेत. एखाद्याला वाळीत टाकून सामाजिक बहिष्कार घालणे हा गुन्हा आहे. यापूर्वी परंपरेने चालत आलेल्या जुन्या, अनिष्ठ रुढी बंद करुन भविष्यात समाजाची प्रगती होईल, त्यादृष्टीने पाऊल टाकण्यासंदर्भात चर्चा झाली. कोकणात वाळीत टाकण्याची प्रथा मोठ्या प्रमाणात आहे. वाळीत टाकण्याची नवनवीन प्रकरणे दिवसेंदिवस समोर येऊ लागली असून, वाळीत टाकणे हा प्रकार फार गंभीर असल्याचे कोर्टाने फटकारल्यानंतर प्रशासनाला जाग आली. कोर्टाच्या आदेशाने रायगड जिल्ह्यात अनेक प्रकरणात गुन्हे दाखल झाले. वाळीत टाकल्याप्रकरणी गुन्हे दाखल होऊ लागल्याने पीडित कुटुंब तक्रार दाखल करण्यासाठ पुढे येऊ लागली आहेत. कोकणातील वाळीत प्रकरणाची गंभीर दखल कोर्टाने घेतल्यानंतर प्रशासन जागे झाले. तसेच कोकणातील वाळीत प्रकरणे मोडीत काढण्यासाठी अंधश्रध्दा निर्मूलन समितीने जात पंचायतीविरोधात एल्गार पुकारला असून, वाळीत कुटुंबांना न्याय देण्यासाठी ८ फेब्रुवारी रोजी महाड येथे जाहीर मेळावा होणार आहे. जात पंचायतीच्या सामाजिक बहिष्कारात अनेक कुटुंबे शापित जीवन जगत आहेत. सामाजिक बहिष्काराचे असहाय्य चटके बसल्याने अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झाली. सामाजिक बहिष्काराबाबत समाज व प्रशासन गंभीर नसल्याच्या घटना वारंवार पुढे येऊ लागल्या आहेत.