शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

नितीन देसाईंचे 'कोकणचे वैभव' आजही चिपळूणकरांच्या आठवणीत

By संदीप बांद्रे | Updated: August 3, 2023 15:37 IST

८६ वे अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी महिनाभर घेतले होते परिश्रम

संदीप बांद्रे 

चिपळूण : दापोलीचे सुपुत्र, जागतिक किर्तीचे कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या कलाकृतीमुळे राज्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरलेले जानेवारी २०१३ चे ८६ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन आजही चिपळूणकरांच्या स्मरणात असून देसाई यांच्या निधनानंतर त्याविषयीच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या. या संमेलनासाठी महिनाभर अतिशय परिश्रमातून त्यांनी कोकणचे वैभव उभे केले होते. त्यासाठी सलग १५ दिवस चिपळूणात तळ ठोकून असलेल्या देसाई यांचा सहवास आजही अनेकांच्या आठवणीत राहिला आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच येथील अनेकांच्या भावना अनावर झाल्या.  येथील लोकमान्य टिळक वाचन स्मारक मंदिराच्या पुढाकाराने शहरातील पवनतलाव मैदानात 86 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते.  या संमेलनात देखावे व प्राचीन कोकणचे वैभव दिग्ददर्शक नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला होता. संमेलनाच्या आधी महिनाभर हे काम सुरू होते. संमेलन भव्य दिव्य होण्यासाठी त्यांचे मोठे योगदान होते. कोकणचे प्रतिबिंब उमटवणारी स्वागत कमान, मोठ मोठे हत्ती, भव्य रंगमंच, मंदिर, कोकणी परंपरा व कार्यक्रम प्रतिकृतीद्वारे दर्शवले होते. यातून त्यांनी आपल्या कला कौशल्याने संबंध कोकण उभे केले होते. कोकणातील जीवन पध्दती त्यांनी आपल्या कलेने जिवंत केली होती. नितीन देसाई यांच्या कला दिग्दर्शनाचे त्यावेळी अनेकांनी कौतुक केले होते. स्वागताध्यक्ष सुनिल तटकरे, माजी आमदार कै. नाना जोशी यांनीही त्यांच्या कलाकृतीला दाद दिली होती. नितीन देसाई यांनी अत्यंत आपुलकीने साहित्य संमेलनात संमेलन नगरी सजविण्याचे काम केले होते. कोकणचे ते सुपुत्र असल्याने त्यांना कोकणविषयी आपुलकी होती, जिव्हाळा होता. अत्यंत प्रेमाने त्यांनी संमेलन नगरी उभी करण्याचे भव्यदिव्य काम केले व देशभर त्याचे कौतुक झाले. चिपळूणसारखे स्वच्छ व्यवहार मला कुठेही दिसले नाहीत, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली होती, असे लोकमान्य टिळक वाचनालाचे तत्कालीन कार्याध्यक्ष प्रकाश देशापांडे यांनी सांगितले. स्वातंत्र दिनी दिल्लीत चित्ररथाच्या माध्यमातून नितीन देसाई यांनी महाराष्ट्राची संस्कृती जगभर पोहोचवली, असे सांगत कोकणातील एक हिरा गमावल्याची भावनाही देशापांडे यांनी व्यक्त केली. नितीन देसाई यांचे निधन अनेकांना चटका लावून गेले आणि चिपळूणमधील साहित्य संमेलनातील आठवणी जाग्या झाल्या.देसाई यांचे नाव कलाक्षेत्रात गाजलेले असताना एक दिवस ते येथे आले आणि चिपळूणकरच झाले. मी मोठा कला दिग्दर्शक आहे, असला कसलाही आविर्भाव त्यांच्या वागण्यात नसायचा. दिवस-रात्र कामात व्यस्त असायचे. एक प्रवेशद्वार तयार झाले आणि अचानक दूरदर्शनची गाडी त्या दारातून येणार नाही, असा निरोप आला. आम्ही अस्वस्थ झालो. देसाई शांतपणे पुढे आले आणि म्हणाले, काळजी नको, गाडी मध्यरात्रीनंतर येणार आहे ना... येऊ द्या, करतो व्यवस्था. लगेच कामगार बोलावले स्वतः उभे राहून कमान उतरवली आणि गाडी सहज आत येईल, एवढी उंच केली.

या संमेलनाला खासदार शरद पवार आले असताना सुनिल तटकरे यांनी देसाई यांची खास ओळख करून दिली.  एवढेच नव्हे तर त्यांची कलाकृती पाहून भरभरून दादही दिली होती. कला क्षेत्रात काम करतांना वेगवेगळ्या स्वभावाची असंख्य  माणसं भेटतात. गेले महिनाभर मी तुमच्यासारख्या चांगल्या माणसांचा अनुभव बरोबर घेऊन जातोय. मी तुमचा आहे कधीही हाक मारा, निश्‍चित येईन. असा शब्द त्यांनी चिपळूणकरांना जाहीरपणे दिला होता. मात्र आता देसाई हाकेच्या पलिकडे गेले, चिपळूणकरांच्या मनात कायम आठवण ठेवून, अशी भावना प्रकाश देशापांडे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNitin Chandrakant Desaiनितीन चंद्रकांत देसाईChiplunचिपळुण