शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली, मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात
4
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
5
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
6
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
7
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
8
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
9
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
10
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
11
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
12
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
13
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
14
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
15
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
16
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
17
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
18
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
20
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी

जिल्ह्यात नऊ हजार ग्राहक अंधारात

By admin | Updated: July 15, 2014 23:44 IST

झाडांंच्या फांद्या कोसळल्याने स्थिती

रत्नागिरी : सोमवारी सायंकाळपासून संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील आठ हजार ९६७ ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला. वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या कोसळून वीजपुरवठा ठप्प झाल्याचे महावितरणच्या सुत्रांनी सांगितले.शृंगारतळी उपकेंद्रातील गुहागर वाहिनी रात्री ७.३६ ते ९.४५ पर्यंत बंद होती. येथील ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मोडका आगार वाहिनीवरून पर्यायी वीजपुरवठा करण्यात आला होता. केळशी फाटा वाहिनी रात्री ७.४६ ते १० ४० पर्यंत ठप्प झाली होती.धारतळे (ता. राजापूर) उपकेंद्रातील नाटे वाहिनी सोमवारी दुपारी १.५५ ते मंगळवारी सकाळी ९ वाजेपर्यंत बंद होती. याच उपकेंद्रातील भालावली वाहिनी दुपारी १.२८ ते ते सकाळी ९ वाजेपर्यंत बंद होती. शृंगारतळी उपकेंद्रातील पालशेत वाहिनी दुपारी २.५० ते सायंकाळी ७.५० पर्यंत बंद होती. लांजा उपकेंद्रातील पूनस वाहिनी दुपारी १.१० ते सायंकाळी ५.५५ वाजेपर्यंत बंद होती. मार्गताम्हाणे उपकेंद्रातील मालघर वाहिनी दुपारी १२.३० ते ८.४० पर्यंत बंद होती. त्याचा ८ हजार ९६७ ग्राहकांना याचा फटका बसला आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आवश्यक त्या ठिकाणी पर्यायी वीजपुरवठा सुरू केला, तर नादुरूस्त वाहिनी दुरूस्त करून वीजपुरवठा पूर्ववत केला आहे. अन्य ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न युध्दपातळीवर सुरु आहेत.संततधार पाऊस कोसळूनही विजेचे खांब कोसळणे, पीन किंवा डिस्क इन्स्युलेटर पंक्चर होणे, डीपी नादुरूस्त होणे, यांसारखे प्रकार जिल्ह्यात कोठेही घडलेले नाहीत. त्यामुळे महावितरणचे नुकसान मात्र टळले आहे. (प्रतिनिधी)