शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

जंगले वाचवणे काळाची गरज

By admin | Updated: February 13, 2015 23:00 IST

पर्यावरणप्रेमींची निराशा : झाडे लावा, झाडे जगवा कागदावरच

फुणगूस : ‘झाडे लावा, झाडे जगवा’ ही मोहीम रत्नागिरी जिल्ह्यात कागदावरच राहिली आहे. जिल्ह्यात राजरोसपणे हिरव्यागार जंगलावर कुऱ्हाडीचे घाव घालून जंगलाचा सर्वनाश केला जात असून, याला आळा कोण घालणार, असा प्रश्न पर्यावरण विभाग तसेच निसर्गप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.वृक्षतोडीच्या प्रमाणात तेवढीच झाडे लावण्यात यावीत, हा कागदावरचा नियम वाचून दाखविला जातो. मात्र, हे सर्व नियम थेट धाब्यावर बसवून प्रचंड प्रमाणात वृक्षतोड केली जात असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वृक्षतोडीमुळे जंगलात सापडणाऱ्या हिरडा, बेहडा, आवळा, कुडा, वावडींग, पांगार, जांभूळ, पळस, कळलावी, शेवर, बिब्बा, पोटदुखी आणि त्वचारोगासाठी तसेच महिलांच्या विविध आजारांसाठी उपयुक्त असणाऱ्या औषधी वनस्पती नष्ट होत आहेत. जंगलात राहणारी वानरे मानवी वस्तीमध्ये येऊन त्रास देत आहेत. वृक्षसंपदा कमी झाल्यामुळे यावर वास्तव्य करणारे पक्षी, किटक हे शेतपिकावर येतात. त्यामुळे, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.यापूर्वी, शेतकरी फक्त स्वत:च्या वापरासाठी अथवा आर्थिक अडचणीत स्वत:च्या मालकीची झाडे तोडायचा. परंतु, अलीकडे वृक्षतोडीमुळे पैसा मिळत असल्याने या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. आज रत्नागिरी जिल्ह्यातून दिवसागणीक १०० ते १२५ ट्रक लाकूड परजिल्ह््यात रवाना होत आहे. या प्रसंगी वृक्षसंवर्धनाबाबत शेतकऱ्यांनी जागरूक होऊन लढा देणे काळाची गरज बनली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात १३ चौरस किलोमीटर क्षेत्र राखीव वनविभाग असून, सुमारे ४९ चौरस किलोमीटर ‘अ’ वर्गीकृत तर एकूण ६४ किलोमीटर जंगल आहे. स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे, अशी मागणीही जोर धरु लागली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न होताना दिसतात. तसेच जनजागृती केली जाते. वृक्षतोड थांबवण्यासाठी जनजागृतीची मोहीम का राबवण्यात येत नाही?, असा सवाल प्रभातफेऱ्या काढणाऱ्या तसेच सामील होणाऱ्या विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे. (वार्ताहर)