शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
5
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
6
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
7
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
8
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
9
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
10
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
11
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
12
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
13
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
14
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
15
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
16
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
17
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
18
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
19
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
20
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

जंगले वाचवणे काळाची गरज

By admin | Updated: February 13, 2015 23:00 IST

पर्यावरणप्रेमींची निराशा : झाडे लावा, झाडे जगवा कागदावरच

फुणगूस : ‘झाडे लावा, झाडे जगवा’ ही मोहीम रत्नागिरी जिल्ह्यात कागदावरच राहिली आहे. जिल्ह्यात राजरोसपणे हिरव्यागार जंगलावर कुऱ्हाडीचे घाव घालून जंगलाचा सर्वनाश केला जात असून, याला आळा कोण घालणार, असा प्रश्न पर्यावरण विभाग तसेच निसर्गप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.वृक्षतोडीच्या प्रमाणात तेवढीच झाडे लावण्यात यावीत, हा कागदावरचा नियम वाचून दाखविला जातो. मात्र, हे सर्व नियम थेट धाब्यावर बसवून प्रचंड प्रमाणात वृक्षतोड केली जात असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वृक्षतोडीमुळे जंगलात सापडणाऱ्या हिरडा, बेहडा, आवळा, कुडा, वावडींग, पांगार, जांभूळ, पळस, कळलावी, शेवर, बिब्बा, पोटदुखी आणि त्वचारोगासाठी तसेच महिलांच्या विविध आजारांसाठी उपयुक्त असणाऱ्या औषधी वनस्पती नष्ट होत आहेत. जंगलात राहणारी वानरे मानवी वस्तीमध्ये येऊन त्रास देत आहेत. वृक्षसंपदा कमी झाल्यामुळे यावर वास्तव्य करणारे पक्षी, किटक हे शेतपिकावर येतात. त्यामुळे, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.यापूर्वी, शेतकरी फक्त स्वत:च्या वापरासाठी अथवा आर्थिक अडचणीत स्वत:च्या मालकीची झाडे तोडायचा. परंतु, अलीकडे वृक्षतोडीमुळे पैसा मिळत असल्याने या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. आज रत्नागिरी जिल्ह्यातून दिवसागणीक १०० ते १२५ ट्रक लाकूड परजिल्ह््यात रवाना होत आहे. या प्रसंगी वृक्षसंवर्धनाबाबत शेतकऱ्यांनी जागरूक होऊन लढा देणे काळाची गरज बनली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात १३ चौरस किलोमीटर क्षेत्र राखीव वनविभाग असून, सुमारे ४९ चौरस किलोमीटर ‘अ’ वर्गीकृत तर एकूण ६४ किलोमीटर जंगल आहे. स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे, अशी मागणीही जोर धरु लागली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न होताना दिसतात. तसेच जनजागृती केली जाते. वृक्षतोड थांबवण्यासाठी जनजागृतीची मोहीम का राबवण्यात येत नाही?, असा सवाल प्रभातफेऱ्या काढणाऱ्या तसेच सामील होणाऱ्या विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे. (वार्ताहर)