शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘नीट’ परीक्षा गरजेचीच, बारावीच्या गुणांवर प्रवेश नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:39 IST

मेहरुन नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : ‘नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रस टेस्ट फाॅर अंडर ग्रॅज्युएट’व्दारे राज्य, सीबीएसई, आयसीएसई बाेर्डातून ...

मेहरुन नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : ‘नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रस टेस्ट फाॅर अंडर ग्रॅज्युएट’व्दारे राज्य, सीबीएसई, आयसीएसई बाेर्डातून बारावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक्रमासाठी परीक्षा देण्यात येते. देशपातळीवर ही परीक्षा घेण्यात येत असून जागा कमी व प्रवेशासाठी इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यामुळेच प्रवेश परीक्षा घ्यावी लागते. परंतु जर ‘नीट’ परीक्षाच घेतली गेली नाही, तर मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शिवाय, परीक्षेची विश्वासार्हताही राखणे गरजेचे आहे.

वैद्यकीय प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येते. जागा कमी व विद्यार्थी जास्त असल्याने साहजिकच बारावीच्या गुणांपेक्षा ‘नीट’च्या गुणांवर विद्यार्थ्यांचा कस लागतो. त्यामुळे ‘तामिळनाडू’च्या धर्तीवर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय अयोग्य असेल. अकरावीपासूनच विद्यार्थी ‘नीट’च्या परीक्षेची तयारी करीत असतात. गुणांकन मिळविण्यासाठी सखोल अभ्यास करावा लागतो, त्यासाठी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम घ्यावे लागतात. यावर्षी बारावीची परीक्षा न होता मूल्यांकनावर निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे ‘नीट’ रद्द करणे चुकीचे ठरेल.

परीक्षेची विश्वासार्हता जपावी

‘नीट’ परीक्षेशिवाय बारावीच्या गुणांवर वैद्यकीय महाविद्यालय प्रवेश चुकीचा निर्णय आहे. विविध मंडळाच्या बारावी परीक्षा दिलेले विद्यार्थी ‘नीट’साठी देशपातळीवर एका समान व्यासपीठावर येतात. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रवेश दिला जातो. त्यामुळे तामिळनाडूचे अनुकरण आपल्याकडे तरी होऊ नयेच ‘नीट’ परीक्षा होणे गरजेचे आहे.

- डाॅ. किशोर सुटखटणकर

‘नीट’ वैद्यकीय प्रवेशासाठी निश्चित केली आहे. बारावीच्या गुणांवर स्पेशलायझेशनची क्षमता कळणार नाही. अन्य राज्यांच्या निर्णयाची ‘री’ आपल्या राज्यात ओढून शिक्षणाचे बाजारीकरण करू नये. प्रत्येक क्षेत्रासाठी परीक्षा निश्चित आहे. परीक्षा घेत असतानाच परीक्षेची विश्वासार्हता जपणे तितकेच गरजेचे आहे. अन्यथा गुणवत्ता धुळीस मिळेल.

- ॲड. विलास पाटणे

परीक्षा रद्द करू नये

प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम निश्चित आहे. ठरावीक जागा असल्याने प्रवेश परीक्षा घ्यावी लागते. ती जबाबदारी एका संस्थेकडे देण्यात येते. बारावीची परीक्षा विविध मंडळांकडून दिलेले विद्यार्थी असतात. परंतु प्रवेश परीक्षेसाठी एका व्यासपीठावर यावे लागते. ‘नीट’ रद्दचा निर्णय निश्चितच चुकीचा असून यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होईल.

- साहिल जोशी

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविण्याकरिता प्रवेश परीक्षा निश्चित केली आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करून बारावीच्या गुणवत्तेवर प्रवेश प्रक्रिया राबविणे अयोग्य आहे. वैद्यकीय महाविद्यालये कमी असल्याने प्रवेश मिळविण्यासाठी अभ्यासातून विद्यार्थ्यांचा कस लागतो. बारावीच्या गुणांवर प्रवेशामुळे बाजारीकरणाचा धोका आहे.

- अन्वया पाध्ये

‘नीट’ रद्द निर्णय अयाेग्य

कोरोनामुळे यावर्षी बारावीची परीक्षा न घेताच निकाल जाहीर करण्यात आला आहे. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश बारावीच्या गुणवत्तेवर देण्याचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकते. तामिळनाडू विधानसभेत ‘नीट’ परीक्षा रद्द करून बारावीच्या गुणांवर प्रवेशाचे विधेयक संमत केले आहे. यापूर्वी तेलंगणा, आंध्र प्रदेश, जम्मू-काश्मीरमध्येही असाच निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्याने पुन्हा निर्णय रद्द करून ‘नीट’ परीक्षेचा मार्ग अवलंबला आहे. बारावीची परीक्षा प्रत्यक्ष घेणे शक्य न झाल्याने मूल्यांकनाव्दारे निकाल घोषित करण्यात आला. त्यामुळे या गुणांवर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश देणे चुकीचे ठरेल.

प्रवेश परीक्षा हव्याच

प्रत्येक अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा निश्चित असून जबाबदारीही संस्थांकडे देण्यात आली आहे.

विशेष अभ्यासक्रमांसाठी जागा कमी असल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा कस परीक्षेतून लागतो.

‘नीट’ परीक्षेची तयारी करण्यासाठी दोन ते अडीच वर्षे विद्यार्थी अभ्यास करीत असतात. त्यामुळे प्रवेश परीक्षा गरजेचीच आहे.