शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

राष्ट्रवादीचे नेते संशयाच्या फेऱ्यात

By admin | Updated: October 23, 2016 00:28 IST

‘तो’ नेता कोण? : जिल्ह्यात केवळ एकाच विषयाची चर्चा

सुभाष कदम -- चिपळूण -राष्ट्रवादी काँग्रेसचे येथील प्रभावी नेते पक्षांतर करणार, अशा प्रकारचे एसएमएस सोशल मीडियाच्या माध्यमातून गेले काही दिवस पसरले आहेत. या मेसेजबाबत नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने हे नेते संशयाच्या फेऱ्यात असून, जिल्ह्यात याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. नगर परिषद, नगरपंचायत व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण टोकाला पोहोचले आहे. चिपळूण नगर परिषद निवडणुकीचे अधिकार थेट पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी माजी आमदार रमेश कदम यांना दिल्याने जिल्हा प्रभारी आमदार भास्कर जाधव व जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्यामध्ये नाराजीचा सूर होता. सर्व नेत्यांना एकत्र बसवून निवडणुकीबाबत निर्णय घेता आला असता, परंतु, तसे झाले नाही. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी थेट माजी आमदार कदम यांना अधिकार दिले, तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राज्याच्या सर्व जिल्हाध्यक्षांना पत्र देत जिल्हाध्यक्ष व जिल्हा प्रभारी यांनी स्वतंत्र निवड मंडळ तयार करावे, अशा सूचना दिल्या. त्यामुळे गोंधळात अधिकच भर पडली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नक्की अधिकार कोणाला, यावरुनच संभ्रम वाढला. अखेर जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी या प्रकरणात आपण पडणार नाही. प्रत्येक तालुक्यातील नेत्यांनी आपापल्या भागातील निवडणुकीची जबाबदारी घेऊन राष्ट्रवादीची सत्ता आणावी, असे आवाहन केले. जिल्हा प्रभारी आमदार जाधव हे या काळात मुंबईत होते. परंतु, त्यांनीही याबाबत मौन धारण केले. दरम्यान, आमदार जाधव भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार, अशी जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली होती. अगदी मुहूर्त ठरल्याप्रमाणे याची छातीठोक खात्रीही देण्यात येत होती. परंतु, तसे काहीच घडले नाही. आमदार जाधव यांनी सध्या ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ असा पवित्रा घेतला आहे, तर सावर्डे परिसरात जिल्हाध्यक्ष निकम हे शिवसेनेत प्रवेश करणार, असे संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविले जात आहेत. अगदी दि. २५ रोजीचा मुहूर्तही ठरल्याचे छातीठोकपणे सांगितले जात आहे. परंतु, निकमही अन्य पक्षात प्रवेश करतील अशी स्थिती आजतरी नाही. यापूर्वी माजी आमदार रमेश कदम हे शिवसेनेत प्रवेश करणार, अशा आवई उठल्या होत्या. परंतु, प्रत्यक्षात कदम यांनी पक्ष तर सोडला नाहीच पण त्यांना नगर परिषदेच्या निवडणुकीची सुत्रे मिळाली. आमदार जाधव, माजी आमदार कदम, जिल्हाध्यक्ष निकम यांच्याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या काही अफवा पसरल्या. त्यात फारसे काही तथ्य असेल असे अजिबात नाही. कारण या तिन्ही नेत्यांना राष्ट्रवादी पक्षाने भरभरुन दिले आहे. एखादा निर्णय मनाविरुध्द झाला म्हणून पक्षांतर करण्याइतपतची मानसिकता त्यांच्यात नाही. काहीवेळा काही कार्यकर्ते मुद्दामहून या कंड्या पिकवत असल्याचे निदर्शनास येत आहे. एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेला महिनाभर संभ्रमावस्था आहे. नगर परिषद निवडणुकीची सूत्र माजी आमदार कदम यांच्याकडे असली, तरी कदम विरुध्द शिवसेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी अशी स्थिती राहणार आहे. त्यामुळे माजी आमदार कदम ही जबाबदारी कशी पार पाडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूणच चिपळूण नगर परिषदेत राष्ट्रवादी काँगे्रसची सत्ता असली, तरी ही निवडणूक राष्ट्रवादी व कदम गटाला तितकीशी सोपी नाही. अन्य पक्षांबरोबरच स्वकियांशीही त्यांना छुपा सामना करावा लागणार आहे. चिपळूण हा रत्नागिरी जिल्ह्याचा राजकीय आखाडा मानला जातो. येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व अलबेल आहे असे मुळीच नाही. राष्ट्रवादीच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी पेटलेल्या या आगीत तेल टाकण्याचे काम केले आहे. त्यामुळे कालपर्यंत वरकरणी शांत दिसणाऱ्या राष्ट्रवादी पक्षात आता धुराचे सावट दिसत आहे. हे ढग असेच राहिले तर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला नगर परिषद निवडणूक थोडी कठीण जाईल आणि यशासाठी झुंजावे लागेल.