शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

राष्ट्रवादीचे नेते संशयाच्या फेऱ्यात

By admin | Updated: October 23, 2016 00:28 IST

‘तो’ नेता कोण? : जिल्ह्यात केवळ एकाच विषयाची चर्चा

सुभाष कदम -- चिपळूण -राष्ट्रवादी काँग्रेसचे येथील प्रभावी नेते पक्षांतर करणार, अशा प्रकारचे एसएमएस सोशल मीडियाच्या माध्यमातून गेले काही दिवस पसरले आहेत. या मेसेजबाबत नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने हे नेते संशयाच्या फेऱ्यात असून, जिल्ह्यात याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. नगर परिषद, नगरपंचायत व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण टोकाला पोहोचले आहे. चिपळूण नगर परिषद निवडणुकीचे अधिकार थेट पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी माजी आमदार रमेश कदम यांना दिल्याने जिल्हा प्रभारी आमदार भास्कर जाधव व जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्यामध्ये नाराजीचा सूर होता. सर्व नेत्यांना एकत्र बसवून निवडणुकीबाबत निर्णय घेता आला असता, परंतु, तसे झाले नाही. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी थेट माजी आमदार कदम यांना अधिकार दिले, तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राज्याच्या सर्व जिल्हाध्यक्षांना पत्र देत जिल्हाध्यक्ष व जिल्हा प्रभारी यांनी स्वतंत्र निवड मंडळ तयार करावे, अशा सूचना दिल्या. त्यामुळे गोंधळात अधिकच भर पडली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नक्की अधिकार कोणाला, यावरुनच संभ्रम वाढला. अखेर जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी या प्रकरणात आपण पडणार नाही. प्रत्येक तालुक्यातील नेत्यांनी आपापल्या भागातील निवडणुकीची जबाबदारी घेऊन राष्ट्रवादीची सत्ता आणावी, असे आवाहन केले. जिल्हा प्रभारी आमदार जाधव हे या काळात मुंबईत होते. परंतु, त्यांनीही याबाबत मौन धारण केले. दरम्यान, आमदार जाधव भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार, अशी जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली होती. अगदी मुहूर्त ठरल्याप्रमाणे याची छातीठोक खात्रीही देण्यात येत होती. परंतु, तसे काहीच घडले नाही. आमदार जाधव यांनी सध्या ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ असा पवित्रा घेतला आहे, तर सावर्डे परिसरात जिल्हाध्यक्ष निकम हे शिवसेनेत प्रवेश करणार, असे संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविले जात आहेत. अगदी दि. २५ रोजीचा मुहूर्तही ठरल्याचे छातीठोकपणे सांगितले जात आहे. परंतु, निकमही अन्य पक्षात प्रवेश करतील अशी स्थिती आजतरी नाही. यापूर्वी माजी आमदार रमेश कदम हे शिवसेनेत प्रवेश करणार, अशा आवई उठल्या होत्या. परंतु, प्रत्यक्षात कदम यांनी पक्ष तर सोडला नाहीच पण त्यांना नगर परिषदेच्या निवडणुकीची सुत्रे मिळाली. आमदार जाधव, माजी आमदार कदम, जिल्हाध्यक्ष निकम यांच्याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या काही अफवा पसरल्या. त्यात फारसे काही तथ्य असेल असे अजिबात नाही. कारण या तिन्ही नेत्यांना राष्ट्रवादी पक्षाने भरभरुन दिले आहे. एखादा निर्णय मनाविरुध्द झाला म्हणून पक्षांतर करण्याइतपतची मानसिकता त्यांच्यात नाही. काहीवेळा काही कार्यकर्ते मुद्दामहून या कंड्या पिकवत असल्याचे निदर्शनास येत आहे. एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेला महिनाभर संभ्रमावस्था आहे. नगर परिषद निवडणुकीची सूत्र माजी आमदार कदम यांच्याकडे असली, तरी कदम विरुध्द शिवसेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी अशी स्थिती राहणार आहे. त्यामुळे माजी आमदार कदम ही जबाबदारी कशी पार पाडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूणच चिपळूण नगर परिषदेत राष्ट्रवादी काँगे्रसची सत्ता असली, तरी ही निवडणूक राष्ट्रवादी व कदम गटाला तितकीशी सोपी नाही. अन्य पक्षांबरोबरच स्वकियांशीही त्यांना छुपा सामना करावा लागणार आहे. चिपळूण हा रत्नागिरी जिल्ह्याचा राजकीय आखाडा मानला जातो. येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व अलबेल आहे असे मुळीच नाही. राष्ट्रवादीच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी पेटलेल्या या आगीत तेल टाकण्याचे काम केले आहे. त्यामुळे कालपर्यंत वरकरणी शांत दिसणाऱ्या राष्ट्रवादी पक्षात आता धुराचे सावट दिसत आहे. हे ढग असेच राहिले तर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला नगर परिषद निवडणूक थोडी कठीण जाईल आणि यशासाठी झुंजावे लागेल.