शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

राष्ट्रवादीचे नेते संशयाच्या फेऱ्यात

By admin | Updated: October 23, 2016 00:28 IST

‘तो’ नेता कोण? : जिल्ह्यात केवळ एकाच विषयाची चर्चा

सुभाष कदम -- चिपळूण -राष्ट्रवादी काँग्रेसचे येथील प्रभावी नेते पक्षांतर करणार, अशा प्रकारचे एसएमएस सोशल मीडियाच्या माध्यमातून गेले काही दिवस पसरले आहेत. या मेसेजबाबत नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने हे नेते संशयाच्या फेऱ्यात असून, जिल्ह्यात याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. नगर परिषद, नगरपंचायत व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण टोकाला पोहोचले आहे. चिपळूण नगर परिषद निवडणुकीचे अधिकार थेट पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी माजी आमदार रमेश कदम यांना दिल्याने जिल्हा प्रभारी आमदार भास्कर जाधव व जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्यामध्ये नाराजीचा सूर होता. सर्व नेत्यांना एकत्र बसवून निवडणुकीबाबत निर्णय घेता आला असता, परंतु, तसे झाले नाही. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी थेट माजी आमदार कदम यांना अधिकार दिले, तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राज्याच्या सर्व जिल्हाध्यक्षांना पत्र देत जिल्हाध्यक्ष व जिल्हा प्रभारी यांनी स्वतंत्र निवड मंडळ तयार करावे, अशा सूचना दिल्या. त्यामुळे गोंधळात अधिकच भर पडली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नक्की अधिकार कोणाला, यावरुनच संभ्रम वाढला. अखेर जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी या प्रकरणात आपण पडणार नाही. प्रत्येक तालुक्यातील नेत्यांनी आपापल्या भागातील निवडणुकीची जबाबदारी घेऊन राष्ट्रवादीची सत्ता आणावी, असे आवाहन केले. जिल्हा प्रभारी आमदार जाधव हे या काळात मुंबईत होते. परंतु, त्यांनीही याबाबत मौन धारण केले. दरम्यान, आमदार जाधव भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार, अशी जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली होती. अगदी मुहूर्त ठरल्याप्रमाणे याची छातीठोक खात्रीही देण्यात येत होती. परंतु, तसे काहीच घडले नाही. आमदार जाधव यांनी सध्या ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ असा पवित्रा घेतला आहे, तर सावर्डे परिसरात जिल्हाध्यक्ष निकम हे शिवसेनेत प्रवेश करणार, असे संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविले जात आहेत. अगदी दि. २५ रोजीचा मुहूर्तही ठरल्याचे छातीठोकपणे सांगितले जात आहे. परंतु, निकमही अन्य पक्षात प्रवेश करतील अशी स्थिती आजतरी नाही. यापूर्वी माजी आमदार रमेश कदम हे शिवसेनेत प्रवेश करणार, अशा आवई उठल्या होत्या. परंतु, प्रत्यक्षात कदम यांनी पक्ष तर सोडला नाहीच पण त्यांना नगर परिषदेच्या निवडणुकीची सुत्रे मिळाली. आमदार जाधव, माजी आमदार कदम, जिल्हाध्यक्ष निकम यांच्याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या काही अफवा पसरल्या. त्यात फारसे काही तथ्य असेल असे अजिबात नाही. कारण या तिन्ही नेत्यांना राष्ट्रवादी पक्षाने भरभरुन दिले आहे. एखादा निर्णय मनाविरुध्द झाला म्हणून पक्षांतर करण्याइतपतची मानसिकता त्यांच्यात नाही. काहीवेळा काही कार्यकर्ते मुद्दामहून या कंड्या पिकवत असल्याचे निदर्शनास येत आहे. एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेला महिनाभर संभ्रमावस्था आहे. नगर परिषद निवडणुकीची सूत्र माजी आमदार कदम यांच्याकडे असली, तरी कदम विरुध्द शिवसेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी अशी स्थिती राहणार आहे. त्यामुळे माजी आमदार कदम ही जबाबदारी कशी पार पाडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूणच चिपळूण नगर परिषदेत राष्ट्रवादी काँगे्रसची सत्ता असली, तरी ही निवडणूक राष्ट्रवादी व कदम गटाला तितकीशी सोपी नाही. अन्य पक्षांबरोबरच स्वकियांशीही त्यांना छुपा सामना करावा लागणार आहे. चिपळूण हा रत्नागिरी जिल्ह्याचा राजकीय आखाडा मानला जातो. येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व अलबेल आहे असे मुळीच नाही. राष्ट्रवादीच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी पेटलेल्या या आगीत तेल टाकण्याचे काम केले आहे. त्यामुळे कालपर्यंत वरकरणी शांत दिसणाऱ्या राष्ट्रवादी पक्षात आता धुराचे सावट दिसत आहे. हे ढग असेच राहिले तर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला नगर परिषद निवडणूक थोडी कठीण जाईल आणि यशासाठी झुंजावे लागेल.