शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

लाॅकडाऊनमुळे १० रोजीची राष्ट्रीय लोकअदालत स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:31 IST

रत्नागिरी : कोरोनाच्या अनुषंगाने सुरू झालेल्या लाॅकडाऊनमुळे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई ...

रत्नागिरी : कोरोनाच्या अनुषंगाने सुरू झालेल्या लाॅकडाऊनमुळे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या सुचनेनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे १० एप्रिल रोजी आयोजित केलेली राष्ट्रीय लोकअदालत पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. येथील जिल्हा न्यायालय, जिल्हयातील सर्व तालुका न्यायालय येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

लोकअदालतमध्ये न्यायालयातील दिवाणी प्रलंबित प्रकरणे, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, पराकाम्य दस्तऐवज अधिनियमाच्या कलम १३८ची प्रकरणे, वसुली प्रकरणे, मोटार अपघात दावा प्रकरणे, कामगारसंबंधीचे निस्तारणीसंबंधीचे दावे, कौटुंबिक / वैवाहिक वादासंदर्भात न्यायालयीन प्रकरणे, भूसंपादन, दिवाणी, किरकोळ दिवाणी अर्ज इत्यादी तडजोडीसाठी ठेवणेत आली होती. त्याचबरोबर या लोकअदालतीमध्ये वादपूर्व प्रकरण म्हणजे विदयुत कंपनी, विविध बँका, भारत संचार निगम यांचे थकीत बाकी येणेबाबतची दाखलपूर्व प्रकरणे, तसेच नगर परिषद यांचे विविध विभागाचे थकीत रकमेबाबतची प्रकरणे, वाटपासंदर्भातील दाखल न झालेली प्रकरणे, जमिनीवरील अतिकमणासंदर्भातील प्रकरणे, वैवाहिक वाद ज्यासंदर्भात न्यायालयात कोणताही वाद प्रलंबित नाही, अशी प्रकरणे ठेवण्यात आली होती.

परंतु सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्यामुळे महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. १० रोजी लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे या दिवशीची राष्ट्रीय लोकअदालत पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. पुढील तारीख निश्‍चित होताच त्याची सुचना संबंधितांना देणेत येणार आहे, अशी सूचना वरिष्ठ न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव आनंद सामंत यांनी केली आहे.