शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
5
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
6
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
7
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
8
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
9
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
10
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
11
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
12
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
13
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
14
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
15
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
16
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
17
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
18
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
19
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
20
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा

लाॅकडाऊनमुळे १० रोजीची राष्ट्रीय लोकअदालत स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:31 IST

रत्नागिरी : कोरोनाच्या अनुषंगाने सुरू झालेल्या लाॅकडाऊनमुळे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई ...

रत्नागिरी : कोरोनाच्या अनुषंगाने सुरू झालेल्या लाॅकडाऊनमुळे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या सुचनेनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे १० एप्रिल रोजी आयोजित केलेली राष्ट्रीय लोकअदालत पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. येथील जिल्हा न्यायालय, जिल्हयातील सर्व तालुका न्यायालय येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

लोकअदालतमध्ये न्यायालयातील दिवाणी प्रलंबित प्रकरणे, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, पराकाम्य दस्तऐवज अधिनियमाच्या कलम १३८ची प्रकरणे, वसुली प्रकरणे, मोटार अपघात दावा प्रकरणे, कामगारसंबंधीचे निस्तारणीसंबंधीचे दावे, कौटुंबिक / वैवाहिक वादासंदर्भात न्यायालयीन प्रकरणे, भूसंपादन, दिवाणी, किरकोळ दिवाणी अर्ज इत्यादी तडजोडीसाठी ठेवणेत आली होती. त्याचबरोबर या लोकअदालतीमध्ये वादपूर्व प्रकरण म्हणजे विदयुत कंपनी, विविध बँका, भारत संचार निगम यांचे थकीत बाकी येणेबाबतची दाखलपूर्व प्रकरणे, तसेच नगर परिषद यांचे विविध विभागाचे थकीत रकमेबाबतची प्रकरणे, वाटपासंदर्भातील दाखल न झालेली प्रकरणे, जमिनीवरील अतिकमणासंदर्भातील प्रकरणे, वैवाहिक वाद ज्यासंदर्भात न्यायालयात कोणताही वाद प्रलंबित नाही, अशी प्रकरणे ठेवण्यात आली होती.

परंतु सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्यामुळे महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. १० रोजी लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे या दिवशीची राष्ट्रीय लोकअदालत पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. पुढील तारीख निश्‍चित होताच त्याची सुचना संबंधितांना देणेत येणार आहे, अशी सूचना वरिष्ठ न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव आनंद सामंत यांनी केली आहे.