शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

मुंबई विद्यापीठाचे स्थलांतर प्रमाणपत्र घरबसल्या मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:28 IST

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाचे स्थलांतर प्रमाणपत्र आता घरबसल्या मिळणार आहे. स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्याबरोबरच विद्यार्थ्यांना ...

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाचे स्थलांतर प्रमाणपत्र आता घरबसल्या मिळणार आहे. स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्याबरोबरच विद्यार्थ्यांना घरपोच स्थलांतर प्रमाणपत्र देण्यासाठी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सभेने परवानगी दिली आहे.

विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी इतर विद्यापीठात किंवा परदेशी शिक्षण संस्थेत प्रवेश घेण्याकरिता स्थलांतर प्रमाणपत्र अत्यावश्यक असते. आवश्यक शुल्क विद्यापीठात भरल्यानंतर काही दिवसांत विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र प्राप्त होते. मात्र, अनेकदा विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रांमध्ये विद्यापीठाकडून चुका करण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना चुका दुरुस्तीसाठी विद्यापीठामध्ये तीन ते चार फेऱ्या माराव्या लागतात. मुंबई विद्यापीठाची भौगोलिक व्याप्ती मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मुंबईत यावे लागते. यासाठी किमान दोन ते तीन हजार रुपये खर्च होतो, तसेच वेळेचा अपव्यय होऊन त्यांना मानसिक त्रासही सहन करावा लागतो. विद्यार्थ्यांना होणारा हा त्रास दूर करण्यासाठी युवासेनेने स्थलांतर प्रमाणपत्र ऑनलाइन देण्याची मागणी केली होती. त्यानुसार स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्याबरोबरच विद्यार्थ्यांना घरपोच स्थलांतर प्रमाणपत्र देण्याला विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सभेने मंजुरी दिली.

त्यामुळे आता विद्यार्थ्यांना घरबसल्या स्थलांतर प्रमाणपत्र मिळणे सोपे होणार आहे. विद्यार्थी देश-विदेशात असला तरी त्या पत्त्यावर स्थलांतर प्रमाणपत्र विद्यापीठाकडून कुरियरमार्फत पाठवण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना पाचशे रुपये शुल्क भरावे लागणार आहे.