शहरं
Join us  
Trending Stories
1
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
3
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
4
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
5
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
6
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
7
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
8
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
9
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
10
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
11
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
12
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
13
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
14
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
15
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
16
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
17
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
18
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
19
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
20
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स

मुंबई-आंगणेवाडी पदयात्रा दाखल

By admin | Updated: February 6, 2015 00:46 IST

बारा दिवसांचा प्रवास : खारदांडा येथील ओमसाई मंडळाचा उपक्रम

नांदगांव : मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी देवीच्या यात्रेनिमित्त खारदांडा मुंबई येथील श्री ओमसाई पदयात्रा मंडळाने मुंबई ते आंगणेवाडी अशी पदयात्रा काढली. ही पदयात्रा बुधवारी तळेरे येथे दाखल झाली. तब्बल बारा दिवसानंतर ही पदयात्रा सिंधुदुर्गात दाखल झाली.आंगणेवाडीच्या भराडी मातेच्या सेवेसाठी अनेक भाविक श्रद्धेने यात्रेला येत असतात. राज्यभरातून या यात्रेला भाविकांचा अक्षरश: महापूर असतो. खारदांडा येथील श्री ओमसाई पदयात्रा मंडळाने यावर्षी प्रथमच खारदांडा (मुंबई) ते आंगणेवाडी असा पायी प्रवास केला आहे. २३ जानेवारीपासून सुरु झालेली ही पदयात्रा ४ फेब्रुवारीला जिल्ह्यात दाखल झाली असून आंगणेवाडी येथे ५ फेब्रुवारीला पोहोचेल.या पदयात्रेत मंडळाचे विविध सभासद, तरुण वयोवृद्धांचा सहभाग आहे. या मंडळचे अध्यक्ष महेश चांगो, उपाध्यक्ष गणेश डिंबळे, प्रमुख सल्लागार चंद्रकांत फोमन, संदीप तुळसकर, भरत धनगर, मंगेश मगर, विकी बेडरे, भावेश बारिया, मनोज सोलंकी, तुषार टिवलेकर, पांडुरंग धावते, भरत लोंढे, भूमेन यामक, मिलिंद मठकर, राकेश कामत, रियाज खान असे १९ जणांचे पथक आले आहे. या यात्रेशिवाय गेली बारा वर्षे हे पथक अष्टविनायक यात्रा, हेदवीचा गणपती, गणपतीपुळे, वैष्णोदेवी, सालासर बालाजी मंदिर, ब्राह्मणदेव मंदिर अशा विविध धार्मिक क्षेत्रांची वारी करीत आहे. आंगणेवाडीच्या या पायी वारीदरम्यान विविध भागातील भाविक या वारीचे स्वागत करीत असून याबद्दल ते समाधानी आहेत. (वार्ताहर)