शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

मुंबई-आंगणेवाडी पदयात्रा दाखल

By admin | Updated: February 6, 2015 00:46 IST

बारा दिवसांचा प्रवास : खारदांडा येथील ओमसाई मंडळाचा उपक्रम

नांदगांव : मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी देवीच्या यात्रेनिमित्त खारदांडा मुंबई येथील श्री ओमसाई पदयात्रा मंडळाने मुंबई ते आंगणेवाडी अशी पदयात्रा काढली. ही पदयात्रा बुधवारी तळेरे येथे दाखल झाली. तब्बल बारा दिवसानंतर ही पदयात्रा सिंधुदुर्गात दाखल झाली.आंगणेवाडीच्या भराडी मातेच्या सेवेसाठी अनेक भाविक श्रद्धेने यात्रेला येत असतात. राज्यभरातून या यात्रेला भाविकांचा अक्षरश: महापूर असतो. खारदांडा येथील श्री ओमसाई पदयात्रा मंडळाने यावर्षी प्रथमच खारदांडा (मुंबई) ते आंगणेवाडी असा पायी प्रवास केला आहे. २३ जानेवारीपासून सुरु झालेली ही पदयात्रा ४ फेब्रुवारीला जिल्ह्यात दाखल झाली असून आंगणेवाडी येथे ५ फेब्रुवारीला पोहोचेल.या पदयात्रेत मंडळाचे विविध सभासद, तरुण वयोवृद्धांचा सहभाग आहे. या मंडळचे अध्यक्ष महेश चांगो, उपाध्यक्ष गणेश डिंबळे, प्रमुख सल्लागार चंद्रकांत फोमन, संदीप तुळसकर, भरत धनगर, मंगेश मगर, विकी बेडरे, भावेश बारिया, मनोज सोलंकी, तुषार टिवलेकर, पांडुरंग धावते, भरत लोंढे, भूमेन यामक, मिलिंद मठकर, राकेश कामत, रियाज खान असे १९ जणांचे पथक आले आहे. या यात्रेशिवाय गेली बारा वर्षे हे पथक अष्टविनायक यात्रा, हेदवीचा गणपती, गणपतीपुळे, वैष्णोदेवी, सालासर बालाजी मंदिर, ब्राह्मणदेव मंदिर अशा विविध धार्मिक क्षेत्रांची वारी करीत आहे. आंगणेवाडीच्या या पायी वारीदरम्यान विविध भागातील भाविक या वारीचे स्वागत करीत असून याबद्दल ते समाधानी आहेत. (वार्ताहर)