शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचे ‘मिशन आयपीडीएस’ यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : महावितरणने वीज वितरण यंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या एकात्मिक ऊर्जा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : महावितरणने वीज वितरण यंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेची कामे राज्यातील २५४ शहरांमध्ये पूर्ण केली आहेत. त्यामुळे एक कोटी १५ लाख शहरी वीज ग्राहकांचा वीज पुरवठा दर्जेदार झाला आहे.

शहरी भागातील वाढती ग्राहक संख्या व आधुनिक जीवनशैलीमुळे विजेचा वाढता वापर लक्षात घेत, केंद्र शासनाच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत महावितरणने ४४ मंडलांतर्गत २५४ शहरांमध्ये २,३०० कोटी रूपयांची कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये प्रस्तावित १२० नवीन उपकेंद्रांंपैकी ११९ उपकेंद्र कार्यान्वित झाली आहेत. १००पैकी १०० उपकेंद्राची क्षमतावाढ करण्यात आली आहे. नवीन वितरण रोहित्रांची ४,९८७पैकी ४,९७० कामे पूर्ण झाली असून, प्रस्तावित सर्वच ४,२०७ रोहित्रांची क्षमतावाढ करण्यात आली आहे. उच्च व लघुदाबाच्या ३,३४७पैकी ३,०४२ किलोमीटर वीज वाहिन्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे तर तब्बल ६,६९४ किलोमीटरच्या भूमिगत वीज वाहिन्यांच्या एरियल बंचचे कामही पूर्ण झाले आहे. शिवाय शहरी भागात ५ लाख ३० हजार ३४० नवीन वीज जोडण्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे.

एकात्मिक ऊर्जा विकास योजनेतून महावितरणने देशात सर्वाधिक ४,३६४ किलोमीटर लांबीच्या वीज वाहिन्या प्रस्तावित केल्या आणि त्याची कामे १०० टक्के पूर्ण केली आहेत. शहरी भागातील उपरी वाहिन्यांचे जाळे कमी करणे, यंत्रणेतील बिघाडाचे प्रमाण कमी व्हावे तसेच शहराच्या सौंदर्यीकरणाला चालना देण्यासाठी भूमिगत वीज वाहिन्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे.