शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

श्री भैरीची पालखी खेळविली जाणार नाही : रवींद्र सुर्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:32 IST

रत्नागिरी : शासकीय नियमावलीचे पालन करून भैरीबुवाचा शिमगोत्सव साजरा केला जाणार आहे. ग्रामप्रदक्षिणा व सहाणेवर पालखी कोठेही खेळविण्याचा कार्यक्रम ...

रत्नागिरी : शासकीय नियमावलीचे पालन करून भैरीबुवाचा शिमगोत्सव साजरा केला जाणार आहे. ग्रामप्रदक्षिणा व सहाणेवर पालखी कोठेही खेळविण्याचा कार्यक्रम होणार नसल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष रवींद्र ऊर्फ मुन्ना सुर्वे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

ग्रामदैवत श्रीदेव भैरीची पालखी बारा वाड्यांमध्ये रथामधून ग्रामप्रदक्षिणा करणार आहे. मात्र, ज्या ठिकाणी रथ जाऊ शकणार नाही, तेथे पालखी खांद्यावरून नेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत भैरी मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे. मात्र, त्यानंतर कोणालाही मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. देवळाच्या बाहेर बॅरिकेडस् लावली जाणार आहेत. जाकिमिऱ्या व सडामिऱ्या येथील पालख्या या देवळात भेटणार नाहीत. मात्र, भैरी मंदिरात त्यांच्या सोयीनुसार देवाची भेट घेऊ शकतात. तसेच रात्री बारा वाजता मंदिरातून दरवर्षीप्रमाणे भैरीची पालखी बाहेर पडणार आहे.

भैरीच्या पालखीच्या नगर प्रदर्शनाच्या वेळी उलपे स्वीकारले जाणार नाहीत. पौर्णिमा ते धूलिवंदन या कालावधीत सहाणेवर ओटी भरता येणार आहे. सहाणेवर पालखी बसल्यानंतर ठराविक अंतर ठेवून उलपे घेण्यात येणार आहेत. शिमगोत्सवापूर्वी दोन दिवस अगोदर बारा वाड्यांत रिक्षा फिरवून याची कल्पना भाविकांना देण्यात येणार आहे. यावर्षी होळीची उंची कमी ठेवण्यात येणार आहे. ठराविक लोकांच्या उपस्थितीत झाडगाव येथील सहाणेवर होळी उभी केली जाणार आहे.

भैरीच्या भेटीसाठी गावागावांतून पालख्या येतात. पालखीसाेबत माेजकीच मंडळी ठेवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यानुसार माेजकीच मंडळी या पालखीसाेबत राहणार असल्याचे सुर्वेे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेसाठी दिनेश सावंत, अंकुश शिवलकर, दीपक कीर, राजन जोशी, प्रकाश पिलणकर, विकास मयेकर, प्रकाश घुडे, राजन फगरे, जितू भोंगले, बाळकृष्ण शिवलकर उपस्थित होते.