शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
2
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
3
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
4
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
5
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
6
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
7
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
8
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
9
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
10
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
11
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
12
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
13
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
14
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
15
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
16
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
17
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
18
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
19
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

अतिवृष्टीमुळे विस्थापित कुटुंबांसाठी पुनर्वसन गृहप्रकल्प उभारण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:37 IST

चिपळूण : अतिवृष्टीमुळे जमिनीला भेगा, डोंगर खचणे, दरड कोसळणे असा धोका निर्माण होऊन स्थलांतर आणि पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झालेल्या ...

चिपळूण : अतिवृष्टीमुळे जमिनीला भेगा, डोंगर खचणे, दरड कोसळणे असा धोका निर्माण होऊन स्थलांतर आणि पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झालेल्या कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत चिपळूण येथे झालेल्या बैठकीत याबाबत महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली. एकाच ठिकाणी गृहप्रकल्प उभे करून पुनर्वसन करता येईल का, याचा आढावाही यावेळी घेण्यात आला.

तालुक्यात मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या पुनर्वसन प्रश्नांची दखल घेत खासदार विनायक राऊत यांनी चिपळूण विश्रामगृहात बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी आमदार भास्कर जाधव, शेखर निकम यांच्यासह प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, तसेच सर्व संबंधित प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. अतिवृष्टीमुळे धोका निर्माण होऊन विस्थापित झालेल्या सर्व कुटुंबांच्या पुनर्वसनाबाबत चर्चा करून आढावा घेण्यात आला. भूगर्भतज्ज्ञांच्या पथकाकडून येथील जमिनीची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्याठिकाणी वास्तव्य करणे योग्य नसल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न उभा राहिला. तसेच तालुक्यातील अन्य गावातदेखील अशीच परिस्थिती निर्माण झाली असून, तेथील कुटुंबांचा पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

यावर आमदार भास्कर जाधव यांनी मुंबईतील बैठकीचा दाखला दिला. त्या बैठकीत पुनर्वसनाबाबत चर्चा करताना प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी घरे बांधून देणे शक्य होणार नाही. तसेच त्यासाठी मोठा कालावधीही लागणार आहे. त्यापेक्षा एकाच ठिकाणी गृहप्रकल्प उभे करून त्यामध्ये सर्वांचे पुनर्वसन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यामुळे अशा पद्धतीने तालुक्यात जागा उपलब्ध आहे का?, असे गृहप्रकल्प आपण उभे करू शकतो का? याबाबत आढावा घेण्याच्या सूचना यावेळी प्राधिकरणाला जाधव यांनी दिल्या. त्यानुसार संपूर्ण अहवाल तयार केल्यानंतर पुन्हा एकदा याबाबत बैठक घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. अतिवृष्टीमुळे विस्थापित झालेल्यांच्या पुनर्वसनासाठी आता चालना मिळण्याची शक्यता आहे.

--------------------------

तिवरे प्रकल्पग्रस्तांचे दिवाळीपूर्वी पुनर्वसन

तिवरे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबतही यावेळी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. आतापर्यंत २४ कुटुंबांना घरे देण्यात आली असून, उर्वरित प्रकल्पग्रस्तांचे दिवाळीपूर्वी पुनर्वसन करण्याच्या दृष्टिकाेनातून प्रयत्न करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. तसेच ज्यांना गावातच पुनर्वसन हवे आहे, त्याबाबतही चर्चा करण्यात आली.