शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
3
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
4
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
5
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
6
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
7
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
8
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
9
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
10
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
11
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
12
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
13
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
14
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
15
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
16
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
17
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
18
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
19
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
20
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...

अतिवृष्टीमुळे विस्थापित कुटुंबांसाठी पुनर्वसन गृहप्रकल्प उभारण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:37 IST

चिपळूण : अतिवृष्टीमुळे जमिनीला भेगा, डोंगर खचणे, दरड कोसळणे असा धोका निर्माण होऊन स्थलांतर आणि पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झालेल्या ...

चिपळूण : अतिवृष्टीमुळे जमिनीला भेगा, डोंगर खचणे, दरड कोसळणे असा धोका निर्माण होऊन स्थलांतर आणि पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झालेल्या कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत चिपळूण येथे झालेल्या बैठकीत याबाबत महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली. एकाच ठिकाणी गृहप्रकल्प उभे करून पुनर्वसन करता येईल का, याचा आढावाही यावेळी घेण्यात आला.

तालुक्यात मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या पुनर्वसन प्रश्नांची दखल घेत खासदार विनायक राऊत यांनी चिपळूण विश्रामगृहात बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी आमदार भास्कर जाधव, शेखर निकम यांच्यासह प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, तसेच सर्व संबंधित प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. अतिवृष्टीमुळे धोका निर्माण होऊन विस्थापित झालेल्या सर्व कुटुंबांच्या पुनर्वसनाबाबत चर्चा करून आढावा घेण्यात आला. भूगर्भतज्ज्ञांच्या पथकाकडून येथील जमिनीची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्याठिकाणी वास्तव्य करणे योग्य नसल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न उभा राहिला. तसेच तालुक्यातील अन्य गावातदेखील अशीच परिस्थिती निर्माण झाली असून, तेथील कुटुंबांचा पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

यावर आमदार भास्कर जाधव यांनी मुंबईतील बैठकीचा दाखला दिला. त्या बैठकीत पुनर्वसनाबाबत चर्चा करताना प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी घरे बांधून देणे शक्य होणार नाही. तसेच त्यासाठी मोठा कालावधीही लागणार आहे. त्यापेक्षा एकाच ठिकाणी गृहप्रकल्प उभे करून त्यामध्ये सर्वांचे पुनर्वसन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यामुळे अशा पद्धतीने तालुक्यात जागा उपलब्ध आहे का?, असे गृहप्रकल्प आपण उभे करू शकतो का? याबाबत आढावा घेण्याच्या सूचना यावेळी प्राधिकरणाला जाधव यांनी दिल्या. त्यानुसार संपूर्ण अहवाल तयार केल्यानंतर पुन्हा एकदा याबाबत बैठक घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. अतिवृष्टीमुळे विस्थापित झालेल्यांच्या पुनर्वसनासाठी आता चालना मिळण्याची शक्यता आहे.

--------------------------

तिवरे प्रकल्पग्रस्तांचे दिवाळीपूर्वी पुनर्वसन

तिवरे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबतही यावेळी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. आतापर्यंत २४ कुटुंबांना घरे देण्यात आली असून, उर्वरित प्रकल्पग्रस्तांचे दिवाळीपूर्वी पुनर्वसन करण्याच्या दृष्टिकाेनातून प्रयत्न करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. तसेच ज्यांना गावातच पुनर्वसन हवे आहे, त्याबाबतही चर्चा करण्यात आली.