शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

कोयना धरण क्षेत्रातील डोंगर खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:34 IST

शिरगाव : कोयनानगर नवजानजीक मोठा डोंगराळ भूभाग खचल्याने संपूर्ण शिवसागर गढूळ झाला आहे. तेथूनच पोफळी व कोळकेवाडी येथे होणाऱ्या ...

शिरगाव : कोयनानगर नवजानजीक मोठा डोंगराळ भूभाग खचल्याने संपूर्ण शिवसागर गढूळ झाला आहे. तेथूनच पोफळी व कोळकेवाडी येथे होणाऱ्या वीज निर्मितीचे इंटेक टनेल असल्याने वीज निर्मितीला येणारे पाणी गढूळ आले. शिवाय चौथ्या टप्प्यातून वीज निर्मितीचे पाणी ज्या बोगद्यातून बाहेर पडते त्याठिकाणी कोळकेवाडी येथेही तसाच डोंगर खचल्याची दुसरी घटना घडली. त्यामुळे या पाण्यावर अवलंबून असलेल्या पाणी योजनांतून गढूळ पाणी पुरवठा होत आहे.

चिपळूणला २१ व २२ जुलै रोजी महापूर आला, त्याचदिवशी कोयनानगर व कोळकेवाडी येथे ही घटना घडली. या घटनेमुळे पोफळी अलोरे, नागावे, कोळकेवाडी, पेंढाबे या गावांमध्ये २४ जुलैपासून गढूळ पाणी येत आहे. या घटनेमुळे पाण्याचे पारंपरिक स्रोत आणि पावसाच्या पाण्यावर ग्रामस्थांना आपली तहान भागवावी लागत आहे. पोसरे येथील स्थलांतरित २८ कुटुंब ही अलोरेत शासकीय वसाहतीत राहात आहेत. त्यांना टँकरने पाणी देण्याची व्यवस्था करतानाच जिल्हा परिषद सदस्य विनोद झगडे यांनी जिल्हा परिषदेचा टँकर अलोरे गावासाठी उपलब्ध केला आहे. नागावे सरपंच प्रकाश चिपळूणकर यांनी वस्तुस्थितीची पाहणी करून स्वच्छ पाणी मिळवण्यासाठी गावातील बोअर दुरुस्तीबाबत तत्काळ उपाययोजना सुरू केली आहे. ग्रामपंचायत निधीतून रक्कम खर्च करून ग्रामस्थांना पाणी देण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. केवळ पावसाळा असल्याने पिण्याचे पाणी आणि वापराच्या पाण्याची प्रासंगिक व्यवस्था करण्यात येत आहे.

याच पद्धतीने चिपळूण शहर, खेर्डी व कळंबस्ते येथील पाणी योजनांनाही अजून गढूळ पाणी येत आहे. शहरातील पाणी योजनेंतर्गत वाशिष्ठी नदीवर खेर्डी व गोवळकोट येथे जॅकवेल असून, तेथून पाणी उचलले जाते. मात्र महापूर ओसरल्यानंतरही शहरातील नागरिकांनाही गढूळ पाणी मिळत असल्याने याविषयी आता नागरिकांमधून ओरड सुरू झाली आहे.