शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

कोयना धरण क्षेत्रातील डोंगर खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:34 IST

शिरगाव : कोयनानगर नवजानजीक मोठा डोंगराळ भूभाग खचल्याने संपूर्ण शिवसागर गढूळ झाला आहे. तेथूनच पोफळी व कोळकेवाडी येथे होणाऱ्या ...

शिरगाव : कोयनानगर नवजानजीक मोठा डोंगराळ भूभाग खचल्याने संपूर्ण शिवसागर गढूळ झाला आहे. तेथूनच पोफळी व कोळकेवाडी येथे होणाऱ्या वीज निर्मितीचे इंटेक टनेल असल्याने वीज निर्मितीला येणारे पाणी गढूळ आले. शिवाय चौथ्या टप्प्यातून वीज निर्मितीचे पाणी ज्या बोगद्यातून बाहेर पडते त्याठिकाणी कोळकेवाडी येथेही तसाच डोंगर खचल्याची दुसरी घटना घडली. त्यामुळे या पाण्यावर अवलंबून असलेल्या पाणी योजनांतून गढूळ पाणी पुरवठा होत आहे.

चिपळूणला २१ व २२ जुलै रोजी महापूर आला, त्याचदिवशी कोयनानगर व कोळकेवाडी येथे ही घटना घडली. या घटनेमुळे पोफळी अलोरे, नागावे, कोळकेवाडी, पेंढाबे या गावांमध्ये २४ जुलैपासून गढूळ पाणी येत आहे. या घटनेमुळे पाण्याचे पारंपरिक स्रोत आणि पावसाच्या पाण्यावर ग्रामस्थांना आपली तहान भागवावी लागत आहे. पोसरे येथील स्थलांतरित २८ कुटुंब ही अलोरेत शासकीय वसाहतीत राहात आहेत. त्यांना टँकरने पाणी देण्याची व्यवस्था करतानाच जिल्हा परिषद सदस्य विनोद झगडे यांनी जिल्हा परिषदेचा टँकर अलोरे गावासाठी उपलब्ध केला आहे. नागावे सरपंच प्रकाश चिपळूणकर यांनी वस्तुस्थितीची पाहणी करून स्वच्छ पाणी मिळवण्यासाठी गावातील बोअर दुरुस्तीबाबत तत्काळ उपाययोजना सुरू केली आहे. ग्रामपंचायत निधीतून रक्कम खर्च करून ग्रामस्थांना पाणी देण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. केवळ पावसाळा असल्याने पिण्याचे पाणी आणि वापराच्या पाण्याची प्रासंगिक व्यवस्था करण्यात येत आहे.

याच पद्धतीने चिपळूण शहर, खेर्डी व कळंबस्ते येथील पाणी योजनांनाही अजून गढूळ पाणी येत आहे. शहरातील पाणी योजनेंतर्गत वाशिष्ठी नदीवर खेर्डी व गोवळकोट येथे जॅकवेल असून, तेथून पाणी उचलले जाते. मात्र महापूर ओसरल्यानंतरही शहरातील नागरिकांनाही गढूळ पाणी मिळत असल्याने याविषयी आता नागरिकांमधून ओरड सुरू झाली आहे.